शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

कॅगच्या कक्षेत नसल्याने जलसंधारणात धुमाकूळ, जल नव्हे अर्थसंधारण

By विकास राऊत | Updated: February 10, 2023 18:53 IST

२७६ कोटींच्या कामांच्या चौकशीची मागणी

औरंगाबाद: महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने मराठवाडा आणि विदर्भातील कामांच्या एकत्रीकरणाचा घाट घालण्यामागे टक्केवारीचा पॅटर्न असल्याची चर्चा असून ‘कॅग’ (कॉप्म्ट्रोलर ॲण्ड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) च्या कक्षेत महामंडळ येत नाही. त्यामुळे जलसंधारण महामंडळात अनागोंदी कामांचा धुमाकूळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. ‘कॅग’ ऐवजी वित्त विभागाकडून महामंडळाच्या कामाचे ऑडिट होते. त्यामुळे महामंडळात काहीही अनागोंदी झाली तरी चौकशीपर्यंतच प्रकरण जाते.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे यांचे नाव लाचखोरीच्या प्रकरणात आल्याने विभागातील सुमारे २७६ कोटींच्या कामांच्या चौकशीची मागणी होत आहे. एका कामाचे बिल अदा करण्यासाठी एकूण बिलाच्या ७.५० टक्के रक्कम कुशिरे यांना देण्याच्या नावाखाली उपअभियंता ऋषिकेश देशमुख, लिपिक भाऊसाहेब गोरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडल्यानंतर या महामंडळातील सगळ्याच कामांच्या देयके, निविदांबाबत संशय निर्माण झाला आहे.

सगळ्या कामांची चौकशी व्हावी.....जलसंधारण विभागातील लाचखोरी पाहता जलचळवळीत काम करणाऱ्यांमध्ये नैराश्य येऊ शकते. मराठवाडा आणि विदर्भातील कामांचे एकत्रीकरण करण्यामागे संशय आहे. ‘कॅग’च्या कक्षेत महामंडळ येत नाही. त्यामुळे महामंडळाने आजवर केलेल्या कामांची नि:पक्षपाती चौकशी झाल्यास सगळे गैरव्यवहार समोर येतील. सचिन कुळकर्णी, जलहक्क कार्यकर्ते, वाशिम-विदर्भ 

महामंडळ नव्हे, पांढरे हत्ती...राज्यपालांनी निर्देशित केलेल्या दोन महामंडळांची कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आहेत. मराठवाडा विकास महामंडळ आणि दुसरे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ. ही दोन्ही कार्यालये पांढरे हत्ती पोसण्यासारखीच आहे. जलसंधारण महामंडळाची स्थापना १९९९-२००० साली करण्यात आली. २३ वर्षांपासून डझनभर कर्मचाऱ्यांचा ताफा या कार्यालयात आहे.

२३ वर्षांत किती केले सिंचन?सन २००० ते २०२३ या २३ वर्षांमध्ये महामंडळाने काय काम केले, किती निधी मिळाला, सिंचनाचा किती हेक्टरला फायदा झाला, याबाबत सध्या कुणीही बोलत नाही. २०१० पर्यंत सुमारे ६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणल्याचा दावा मध्यंतरी करण्यात आला होता. गेल्या दशकात किती कामे झाली, याचा लेखाजोखा पुणे कार्यालयाकडे असल्याचे सांगण्यात आले.

जलयुक्त २.० च्या गुणवत्तेवर प्रश्न....जलयुक्त शिवार अभियान २.० ची कामे जलसंधारणकडून होणार आहेत. यापूर्वी कृषी विभागाकडून योजनेची कामे केली जात होती. आता जलसंधारण विभागाकडे कामाची सूत्रे देण्यात आली आहेत. जलसंधारण विभागाकडे जबाबदारी देण्यात आल्यामुळे कामांच्या गुणवत्तेबाबत जिल्हा प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद