शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबाद महानगरपालिका जोतिबा फुलेंच्या बाजूला लवकरच उभारणार सावित्रीबार्इंचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:04 IST

औरंगपुऱ्यात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला लागूनच सावित्रीबाई फुले यांचाही पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.

औरंगाबाद : औरंगपुऱ्यात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला लागूनच सावित्रीबाई फुले यांचाही पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुतळ्यांसाठी नियुक्त समितीने सावित्रीबाई फुले यांच्यासह शहागंज येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मंजुरी दिली. महापालिकेतर्फे पुढील कारवाई लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

दहा वर्षांपूर्वी महानगरपालिकेने शहागंजमधील चमनमध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि औरंगपुऱ्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या बाजूलाच सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव घेतला होता. ठरावाच्या अनुषंगाने मनपाने या महापुरुषांचे पुतळे तयार करून घेतले; परंतु राज्य सरकारच्या गृह विभागाकडून पुतळे उभारण्यास परवानगी मिळत नसल्याने पुतळे उभारण्याचे काम रखडले होते. त्यानंतर राज्य सरकारने पुतळे उभारण्यासाठी परवानगी देण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार पुतळे उभारण्याची परवानगी जिल्हास्तरीय समितीकडून मिळणार असल्याने मनपाने जिल्हास्तरीय समितीकडे महापुरुषांचे पुतळे उभारण्याची परवानगी मागितली. जिल्हास्तरीय समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठकीस सदस्य सचिव निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त दीपाली घाडगे, मनपाचे कार्यकारी अभियंता सय्यद सिकंदर अली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भगत यांची उपस्थिती होती. समितीने शहागंज चमन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूणार्कृती पुतळा उभारणे आणि महात्मा फुले यांच्या बाजूलाच सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्याचा  निर्णय झाला. लवकर पुतळे उभारण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असे महापौरांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद