शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

मनपाने नेमलेल्या इको प्रो कंपनीचा कचरा प्रक्रियेचा आराखडा चुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 12:52 IST

यामुळे कचरा निर्मूलनाची प्रक्रिया आणखी लांबणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्दे५२ कोटीऐवजी २४ कोटींचा प्रस्ताव कचरा प्रक्रियेस होणार आणखी उशीरआणखी ६० कोटी रुपये शासनाकडे मागावे लागणार

औरंगाबाद : कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या इको प्रो या इंदूरच्या कंपनीने तयार केलेला आराखडा सपशेल चुकला असून, या आराखड्यामुळे कचरा निर्मूलनाची प्रक्रिया आणखी लांबणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ७ महिन्यांपूर्वी महापालिकेला तब्बल ९० कोटी रुपये दिले. इको प्रो या प्रकल्प सल्लागार समितीने अंदाजपत्रक तयार केले.  कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी महापालिकेला तब्बल ५२ कोटी रुपये खर्च येत असताना समितीने २४ कोटींचा आराखडा तयार केला. नारेगाव येथील कचरा नष्ट करण्यासाठी फक्त २५ कोटी रुपये गृहीत धरले. ६० कोटींचा खर्च यासाठी लागणार आहे. राज्य शासनाकडे सुधारित आराखडा सादर करून आणखी ६० कोटींची मागणी मनपा करणार आहे.

नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे आज अचानक महापालिकेत दाखल झाले. त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी जिथे जिथे कचऱ्याचे मोठमोठे डोंगर बघितले होते. त्या सर्व भागात जाऊन पाहणी केली. पदमपुरा, रोशनगेट, जकातनाका आदी ठिकाणी कचरा कमी झाल्याचे त्यांना दिसून आले. घनकचऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेली इको प्रो ही प्रकल्प सल्लागार संस्थेची बेफिकीरी बोबडे यांच्यासमोर निदर्शनास आणून देण्यात आली.

मागील आठ महिन्यांत ही संस्था अजिबात काम करीत नाही. उलट चुकीचे अंदाजपत्रक तयार करून महापालिकेला संकटात टाकण्याचे काम केले. चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचे मोठे प्रकल्प उभे करायचे आहेत. या कामांसाठी मनपाला ५२ कोटी रुपये लागणार आहेत. पीएमसीने २४ कोटींचे अंदाजपत्रक केले. आता काम करताना अनेक अडचणी येत आहेत. नारेगाव येथील कचरा नष्ट करणे गरजेचे आहे. त्यासाठी ६० कोटींचा खर्च असताना २५ कोटींची तरतूद केली आहे. पीएमसीकडे तज्ज्ञ कर्मचारी नसल्याची माहितीही समोर येत आहे.

मुख्यमंत्र्यांकडे अपील करणारपडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पास सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी स्थगिती दिली आहे. मनपाला कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे अत्यावश्यक झाले आहे. कांबळे यांनी दिलेली स्थगिती उठविण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले स्वत: मुख्यमंत्र्यांकडे अपील दाखल करणार आहेत. कांबळे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडण्याचे काम आयुक्त डॉ. निपुण विनायक करणार आहेत.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका