शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

औरंगाबाद मनपा निवडणूक : सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:58 IST

महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने केलेली वॉर्ड रचना आणि काढलेले वॉर्ड आरक्षण यावर आक्षेप घेत माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात ॲड. देवदत्त पालोदकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देवॉर्ड रचना करताना काही वॉर्डांचे अस्तित्वच संपवण्यात आले.विशिष्ट व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून वॉर्डांची रचना आणि वॉर्डांचे आरक्षण हे सर्व करताना राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली, असा दावा याचिकेत

औरंगाबाद : महापालिका निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील प्रलंबित खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य सरकार, साखर आयुक्त आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना चार आठवड्यांची शेवटची संधी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने शपथपत्र दाखल करण्यासाठी मागितलेली मुदतवाढ प्रबंधकांनी नामंजूर केली. ४ आठवड्यात शपथपत्र दाखल न झाल्यास, आहे त्या स्थितीत याचिका सुनावणीसाठी न्यायालयासमोर ठेवण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे प्रबंधकांची आदेशात नमूद केले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने केलेली वॉर्ड रचना आणि काढलेले वॉर्ड आरक्षण यावर आक्षेप घेत माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात ॲड. देवदत्त पालोदकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे. ही याचिका २० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांसमोर आली. याचिकेत दाखल न झालेल्या शपथपत्रांची दखल घेत प्रबंधकांनी आदेश पारित केले आहेत. प्रबंधकांनी पारित केलेल्या आदेशांबद्दल ॲड. देवदत्त पालोदकर म्हणाले, प्रतिवादी क्रमांक १ राज्य सरकार, प्रतिवादी क्रमांक ५ साखर आयुक्त व प्रतिवादी क्रमांक ७ औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांनी निवडणूक याचिकेच्या संदर्भात आपले शपथपत्र अद्याप सर्वोच्च न्यायालयात सादर केले नाही. त्यामुळे प्रबंधकांनी या तिन्हीही प्रतिवादींना शपथपत्र दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची शेवटची संधी दिली आहे. प्रतिवादी क्रमांक २, राज्य निवडणूक आयोग यांना शपथपत्र दाखल करण्यासाठी यापूर्वीच्या तारखेपर्यंतचीच शेवटची संधी होती. त्यांनी या वेळेत शपथपत्र दाखल केले नाही. शपथपत्र दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने अधिकचा वेळ मिळावा, अशी विनंती केली होती, ही विनंती सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी नामंजूर केली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या वॉर्ड रचनेबद्दल समीर राजूरकर यांचा मुख्य आक्षेप आहे. वॉर्ड रचना करताना काही वॉर्डांचे अस्तित्वच संपवण्यात आले. काही विशिष्ट व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून वॉर्डांची रचना करण्यात आली आणि वॉर्डांचे आरक्षण काढण्यात आले. हे सर्व करताना राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली झाली, असा दावा याचिकेत केला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद