शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

औरंगाबाद मनपा निवडणूक : सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:58 IST

महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने केलेली वॉर्ड रचना आणि काढलेले वॉर्ड आरक्षण यावर आक्षेप घेत माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात ॲड. देवदत्त पालोदकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देवॉर्ड रचना करताना काही वॉर्डांचे अस्तित्वच संपवण्यात आले.विशिष्ट व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून वॉर्डांची रचना आणि वॉर्डांचे आरक्षण हे सर्व करताना राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली, असा दावा याचिकेत

औरंगाबाद : महापालिका निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील प्रलंबित खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य सरकार, साखर आयुक्त आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना चार आठवड्यांची शेवटची संधी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने शपथपत्र दाखल करण्यासाठी मागितलेली मुदतवाढ प्रबंधकांनी नामंजूर केली. ४ आठवड्यात शपथपत्र दाखल न झाल्यास, आहे त्या स्थितीत याचिका सुनावणीसाठी न्यायालयासमोर ठेवण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे प्रबंधकांची आदेशात नमूद केले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने केलेली वॉर्ड रचना आणि काढलेले वॉर्ड आरक्षण यावर आक्षेप घेत माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात ॲड. देवदत्त पालोदकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे. ही याचिका २० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांसमोर आली. याचिकेत दाखल न झालेल्या शपथपत्रांची दखल घेत प्रबंधकांनी आदेश पारित केले आहेत. प्रबंधकांनी पारित केलेल्या आदेशांबद्दल ॲड. देवदत्त पालोदकर म्हणाले, प्रतिवादी क्रमांक १ राज्य सरकार, प्रतिवादी क्रमांक ५ साखर आयुक्त व प्रतिवादी क्रमांक ७ औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांनी निवडणूक याचिकेच्या संदर्भात आपले शपथपत्र अद्याप सर्वोच्च न्यायालयात सादर केले नाही. त्यामुळे प्रबंधकांनी या तिन्हीही प्रतिवादींना शपथपत्र दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची शेवटची संधी दिली आहे. प्रतिवादी क्रमांक २, राज्य निवडणूक आयोग यांना शपथपत्र दाखल करण्यासाठी यापूर्वीच्या तारखेपर्यंतचीच शेवटची संधी होती. त्यांनी या वेळेत शपथपत्र दाखल केले नाही. शपथपत्र दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने अधिकचा वेळ मिळावा, अशी विनंती केली होती, ही विनंती सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी नामंजूर केली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या वॉर्ड रचनेबद्दल समीर राजूरकर यांचा मुख्य आक्षेप आहे. वॉर्ड रचना करताना काही वॉर्डांचे अस्तित्वच संपवण्यात आले. काही विशिष्ट व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून वॉर्डांची रचना करण्यात आली आणि वॉर्डांचे आरक्षण काढण्यात आले. हे सर्व करताना राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली झाली, असा दावा याचिकेत केला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद