शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रक्रियेत औरंगाबाद मनपाचे ‘विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:37 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनच ‘विघ्न’ निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे कचºयावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागील एक महिन्यापासून पडून आहे. महापालिका प्रशासनाला साधे शेड उभारता आलेले नाहीत. अधिकाºयांमधील बेबनाव, नियोजनाचा अभाव आदी कारणांमुळे कचरा प्रक्रिया केंद्र उभे राहण्यापूर्वीच वादाच्या भोवºयात अडकले आहेत. युद्धपातळीवर शेड उभारणी, मशिनरी बसविणे ही कामे प्रशासनाकडूनच कासवगतीने सुरू आहेत. येणाºया दोन महिन्यांपर्यंत एक किलो कचºयावरही प्रक्रिया होणे अशक्य आहे.

ठळक मुद्देयंत्र सामग्री एक महिन्यापासून पडून : चिकलठाणा, रमानगर, जकात नाक्यावर शेडच नाही

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनच ‘विघ्न’ निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे कचºयावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागील एक महिन्यापासून पडून आहे. महापालिका प्रशासनाला साधे शेड उभारता आलेले नाहीत. अधिकाºयांमधील बेबनाव, नियोजनाचा अभाव आदी कारणांमुळे कचरा प्रक्रिया केंद्र उभे राहण्यापूर्वीच वादाच्या भोवºयात अडकले आहेत. युद्धपातळीवर शेड उभारणी, मशिनरी बसविणे ही कामे प्रशासनाकडूनच कासवगतीने सुरू आहेत. येणाºया दोन महिन्यांपर्यंत एक किलो कचºयावरही प्रक्रिया होणे अशक्य आहे.चार दिवसांमध्ये कचºयावर प्रक्रिया सुरू होईल, असा दावा महापालिका प्रशासन पदाधिकारी १५ आॅगस्टपासून करीत आहेत. हा दावा किती खरा आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने शहरातील प्रमुख कचरा प्रक्रिया केंद्रांवर पाहणी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे प्रत्येकी १६ टन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी नागपूर येथील कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने २ आॅगस्टपासून मध्यवर्ती जकात नाक्यावर यंत्रसामग्री अक्षरश: धूळखात पडून आहे. जकात नाक्यावर मनपा प्रशासनाने शेड उभारले. या शेडमध्ये मशीन बसूच शकत नाही. आता दुसरे शेड उभारण्यात येणार आहे. चिकलठाण्यात शेड उभारणीचे काम जमिनीतच आहे. या ठिकाणी केंद्रीय कचरा प्रक्रिया केंद्र, छोट्या मशीनसाठी स्वतंत्र शेड उभारण्याचा विचार आहे. आणखी दोन ते तीन महिने मनपाकडून शेड उभारणे, थ्री फेस लाईटचे मीटर आणून देणे, पाणी या सुविधा देणे अशक्य आहे. रमानगर स्मशानभूमी येथे शेड उभारणीचे कामच सुरू झालेले नाही.चिकलठाण्याची अवस्था नारेगावसारखीमागील तीन महिन्यांपासून महापालिका चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेवर कचरा टाकत आहे. या कचºयात मेलेली जनावरे, दुर्गंधी, कचºयातून बाहेर निघणारे घाण पाणी यामुळे परिस्थिती अत्यंत विदारक बनली आहे.या भागातील नागरिकांकडून होणारा विरोध अत्यंत रास्त असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी मनपाने कचºयाचा डोंगर तयार केला आहे, तेथे दोन मिनिटेही थांबणे अशक्य आहे.पडेगाव, चिकलठाण्याचे काय?पडेगाव, चिकलठाणा येथे १५० मेट्रिक टनाचे दोन मोठे प्रकल्प उभारण्याचे काम मायोवेसल कंपनीला दिले आहे. या कंपनीवर होत असलेले आरोप, स्थायी समिती सदस्यांनी केलेले बंड, कंपनीसोबत होणारा करार वादाच्या भोवºयात सापडला आहे.आणखी सहा महिने तरी ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू होणार नाही. २४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाºया शेडच्या कामाचा श्रीगणेशाच झालेला नाही. शेड उभारणीसाठी कंत्राटदाराला मनपा अधिकारीच अजिबात सहकार्य करायला तयार नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न