शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

औरंगाबाद मनपा लावणार ‘उधळपट्टी’चे दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:50 IST

शहरातील ५० हजार पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल ९ कंत्राटदार नेमले आहेत.

ठळक मुद्देपथदिवे दुरुस्तीसाठी कंत्राटदार नेमले आचारसंहितेत दिले कार्यारंभ आदेश

औरंगाबाद : शहरातील ५० हजार पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल ९ कंत्राटदार नेमले आहेत. या कंत्राटदारांनी मनपाच्या अंदाजपत्रकीय दरापेक्षा २० ते २५ टक्के अधिक दराने निविदा भरल्या. आचारसंहितेत त्यांना वर्कआॅर्डरही देऊन टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर प्रशासन तब्बल ३ कोटी रुपयांची उधळपट्टी करणार आहे. 

विद्युत विभागातर्फे सध्या करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाची सखोल चौकशी त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत केल्यास कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येतील. चांगले पथदिवे काढून नवीन बसविण्याचा उद्योग मागील काही दिवसांपासून सुरू केला आहे. आता पथदिवे दुरुस्तीच्या नावावर तब्बल ३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. काम न करता बिले उचलणाऱ्या नऊ जुन्या कंत्राटदारांची निवड प्रशासनाने केली आहे. सहा महिन्यांसाठी हे काम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बंद पथदिवे दुरुस्त करणे एवढेच काम कंत्राटदरांकडे राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात दिल्ली येथील कंपनी नवीन एलईडी पथदिवे बसवीत आहे. कंपनीने आतापर्यंत २५ हजार पथदिवे बसविले आहेत. उर्वरित तीन महिन्यांमध्ये १५ हजार दिवे कंपनी बसविणार आहे. कंपनी पुढील दहा वर्षे ४० हजार पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती स्वत: करणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून शहरातील जुने आणि कंपनीने बसविलेले नवीन अशा सर्व पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती स्वत: कंपनीच करीत आहे. या देखभाल दुरुस्तीपोटी मनपा प्रशासनाने कंपनीला एक रुपयाही दिला नाही. कंपनीने तशी मागणीही केली नाही. ४० हजार पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती कंपनी मोफत करण्यास तयार असेल तर मनपा ९ कंत्राटदार नेमून तब्बल ३ कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी करीत आहे...? मागील तीन महिन्यांत ८ हजार बंद असलेले पथदिवे कंपनीने सुरू केले. 

दरम्यान, महापालिका प्रशासनाने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नऊ झोनमध्ये नऊ कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेत त्यांना वर्कआॅर्डरही देऊन टाकली. आता त्यांच्याकडून विद्युत विभाग शपथपत्र घेणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.  

कोणते दिवे दुरुस्त करणार...?शहरातील ४० हजारांपैकी २५ हजार पथदिवे अगोदरच दिल्लीच्या खाजगी कंपनीकडे आहेत. उर्वरित १५ हजार पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नऊ कंत्राटदारांची गरज नाही. मनपाने या कंत्राटदारांना वर्कआॅर्डर दिली. कामही सुरू झाले तर ते नेमके कोणत्या पथदिव्यांची देखभाल करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीElectionनिवडणूक