शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

औरंगाबाद मनपा लावणार ‘उधळपट्टी’चे दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:50 IST

शहरातील ५० हजार पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल ९ कंत्राटदार नेमले आहेत.

ठळक मुद्देपथदिवे दुरुस्तीसाठी कंत्राटदार नेमले आचारसंहितेत दिले कार्यारंभ आदेश

औरंगाबाद : शहरातील ५० हजार पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल ९ कंत्राटदार नेमले आहेत. या कंत्राटदारांनी मनपाच्या अंदाजपत्रकीय दरापेक्षा २० ते २५ टक्के अधिक दराने निविदा भरल्या. आचारसंहितेत त्यांना वर्कआॅर्डरही देऊन टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर प्रशासन तब्बल ३ कोटी रुपयांची उधळपट्टी करणार आहे. 

विद्युत विभागातर्फे सध्या करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाची सखोल चौकशी त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत केल्यास कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येतील. चांगले पथदिवे काढून नवीन बसविण्याचा उद्योग मागील काही दिवसांपासून सुरू केला आहे. आता पथदिवे दुरुस्तीच्या नावावर तब्बल ३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. काम न करता बिले उचलणाऱ्या नऊ जुन्या कंत्राटदारांची निवड प्रशासनाने केली आहे. सहा महिन्यांसाठी हे काम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बंद पथदिवे दुरुस्त करणे एवढेच काम कंत्राटदरांकडे राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात दिल्ली येथील कंपनी नवीन एलईडी पथदिवे बसवीत आहे. कंपनीने आतापर्यंत २५ हजार पथदिवे बसविले आहेत. उर्वरित तीन महिन्यांमध्ये १५ हजार दिवे कंपनी बसविणार आहे. कंपनी पुढील दहा वर्षे ४० हजार पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती स्वत: करणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून शहरातील जुने आणि कंपनीने बसविलेले नवीन अशा सर्व पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती स्वत: कंपनीच करीत आहे. या देखभाल दुरुस्तीपोटी मनपा प्रशासनाने कंपनीला एक रुपयाही दिला नाही. कंपनीने तशी मागणीही केली नाही. ४० हजार पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती कंपनी मोफत करण्यास तयार असेल तर मनपा ९ कंत्राटदार नेमून तब्बल ३ कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी करीत आहे...? मागील तीन महिन्यांत ८ हजार बंद असलेले पथदिवे कंपनीने सुरू केले. 

दरम्यान, महापालिका प्रशासनाने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नऊ झोनमध्ये नऊ कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेत त्यांना वर्कआॅर्डरही देऊन टाकली. आता त्यांच्याकडून विद्युत विभाग शपथपत्र घेणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.  

कोणते दिवे दुरुस्त करणार...?शहरातील ४० हजारांपैकी २५ हजार पथदिवे अगोदरच दिल्लीच्या खाजगी कंपनीकडे आहेत. उर्वरित १५ हजार पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नऊ कंत्राटदारांची गरज नाही. मनपाने या कंत्राटदारांना वर्कआॅर्डर दिली. कामही सुरू झाले तर ते नेमके कोणत्या पथदिव्यांची देखभाल करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीElectionनिवडणूक