शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

औरंगाबाद मनपा लावणार ‘उधळपट्टी’चे दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:50 IST

शहरातील ५० हजार पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल ९ कंत्राटदार नेमले आहेत.

ठळक मुद्देपथदिवे दुरुस्तीसाठी कंत्राटदार नेमले आचारसंहितेत दिले कार्यारंभ आदेश

औरंगाबाद : शहरातील ५० हजार पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल ९ कंत्राटदार नेमले आहेत. या कंत्राटदारांनी मनपाच्या अंदाजपत्रकीय दरापेक्षा २० ते २५ टक्के अधिक दराने निविदा भरल्या. आचारसंहितेत त्यांना वर्कआॅर्डरही देऊन टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर प्रशासन तब्बल ३ कोटी रुपयांची उधळपट्टी करणार आहे. 

विद्युत विभागातर्फे सध्या करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाची सखोल चौकशी त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत केल्यास कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येतील. चांगले पथदिवे काढून नवीन बसविण्याचा उद्योग मागील काही दिवसांपासून सुरू केला आहे. आता पथदिवे दुरुस्तीच्या नावावर तब्बल ३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. काम न करता बिले उचलणाऱ्या नऊ जुन्या कंत्राटदारांची निवड प्रशासनाने केली आहे. सहा महिन्यांसाठी हे काम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बंद पथदिवे दुरुस्त करणे एवढेच काम कंत्राटदरांकडे राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात दिल्ली येथील कंपनी नवीन एलईडी पथदिवे बसवीत आहे. कंपनीने आतापर्यंत २५ हजार पथदिवे बसविले आहेत. उर्वरित तीन महिन्यांमध्ये १५ हजार दिवे कंपनी बसविणार आहे. कंपनी पुढील दहा वर्षे ४० हजार पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती स्वत: करणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून शहरातील जुने आणि कंपनीने बसविलेले नवीन अशा सर्व पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती स्वत: कंपनीच करीत आहे. या देखभाल दुरुस्तीपोटी मनपा प्रशासनाने कंपनीला एक रुपयाही दिला नाही. कंपनीने तशी मागणीही केली नाही. ४० हजार पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती कंपनी मोफत करण्यास तयार असेल तर मनपा ९ कंत्राटदार नेमून तब्बल ३ कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी करीत आहे...? मागील तीन महिन्यांत ८ हजार बंद असलेले पथदिवे कंपनीने सुरू केले. 

दरम्यान, महापालिका प्रशासनाने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नऊ झोनमध्ये नऊ कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेत त्यांना वर्कआॅर्डरही देऊन टाकली. आता त्यांच्याकडून विद्युत विभाग शपथपत्र घेणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.  

कोणते दिवे दुरुस्त करणार...?शहरातील ४० हजारांपैकी २५ हजार पथदिवे अगोदरच दिल्लीच्या खाजगी कंपनीकडे आहेत. उर्वरित १५ हजार पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नऊ कंत्राटदारांची गरज नाही. मनपाने या कंत्राटदारांना वर्कआॅर्डर दिली. कामही सुरू झाले तर ते नेमके कोणत्या पथदिव्यांची देखभाल करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीElectionनिवडणूक