शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

समांतर जलवाहिनीच्या १४३ कोटींच्या निधीवर औरंगाबाद मनपाला मिळाले तब्बल ११३ कोटींचे व्याज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 18:17 IST

शहराची तहान भागविण्यासाठी जायकवाडीहून औरंगाबादपर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी महापालिकेला १४३ कोटींचा निधी दिला होता. या निधीवर तब्बल ११३ कोटींचे व्याजच जमा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी जायकवाडीहून औरंगाबादपर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी महापालिकेला १४३ कोटींचा निधी दिला होता. या निधीवर तब्बल ११३ कोटींचे व्याजच जमा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेने मूळ रक्कम बँकेत एक वर्षासाठी फिक्स डिपॉझिट केली. दरवर्षी याची मुदत वाढविण्यात येते. त्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत आहे. २५७ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत अक्षरश: पडून आहेत. शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. युद्धपातळीवर मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करावे, अशी अचानक मागणी आज महापालिकेतील भाजपच्या पदाधिका-यांतर्फे करण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

शहरातील पाणीपुरवठ्याचे मनपाकडून खाजगीकरण करण्यात आले होते. खाजगी कंपनीमार्फतच मुख्य जलवाहिनीचे काम करून घेण्यात येत असताना अचानक कंपनीची हकालपट्टी करण्यात आली. मागील दीड वर्षापासून शहराचा पाणीपुरवठा महापालिकेतर्फेच सांभाळण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद युटिलिटी कंपनीने आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याची संधी मनपा सभागृहात द्यावी, अशी विनंती केली. या विनंतीला केराची टोपली दाखविण्यात आली. बुधवारी अचानक स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे यांनी समांतर जलवाहिनीचा मुद्या उपस्थित केला. मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम कोणीही करावे, पण या शहरात मोठ्या प्रमाणात पाणी आणावे, अशी मागणी त्यांनी केली. युटिलिटी कंपनी आणि मनपा यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दोघांनी सहमतीने लवादही स्थापन केला आहे. शहराच्या हितासाठी न्यायालय, लवादाच्या बाहेर जाऊन वाद संपुष्टात आणावा आणि काम सुरू करावे, असे दोघांनी कंपनीचे नाव न घेता सूचित केले. आजपर्यंत आम्हाला समांतरच्या मुद्यावर बोलण्याची कुठे संधीच मिळाली नाही. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता समितीच्या बैठकीत हा मुद्या आम्ही खा. चंद्रकांत खैरे यांच्यासमोर मांडला असल्याचेही बारवाल, औताडे यांनी नमूद केले.

२००७ मध्ये निधी प्राप्तकेंद्र व राज्य शासनाने महापालिकेला समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी १४३ कोटींचा निधी दिला होता. जेव्हा निधी मिळाला तेव्हा प्रकल्पाची मूळ किंमत ४०० कोटी होती. नंतर मनपाने हा प्रकल्प पीपीपी मॉडेलवर नेला. यात खाजगी कंपनीला आणण्यात आले. ४०० कोटींचा प्रकल्प १००० कोटींपर्यंत नेण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका