शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

औरंगाबाद महापालिका निवडणूक रणसंग्राम: विशिष्ट राजकारण्यांसाठी प्रभाग होणार नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 19:44 IST

Aurangabad Municipal Corporation Election: राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला तीन सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करून ठेवणार आहे.

ठळक मुद्देमनपा प्रशासकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेला नवीन प्रभागरचना तयार करण्याची कवायत सुरू करावी लागणार आहे. त्याची रंगीत तालीम करण्यापूर्वी बुधवारी मनपा ( Aurangabad Municipal Corporation Election) प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा केली. प्रभाग तयार करताना २०११च्या जनगणनेनुसार तयार करण्यात आलेले प्रगणक गट (ईबी) जशास तसे ठेवण्यावर मनपा अधिकाऱ्यांचा कल राहील. विशिष्ट राजकीय मंडळींना डोळ्यासमोर ठेवून प्रभाग तयार केले जाणार नाहीत.

राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला तीन सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करून ठेवणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी अंतिम आराखडा तयार करतील. औरंगाबाद महापालिकेच्या वॉर्डरचनेचा आणि आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ही याचिका निकाली निघाली तरच पुढील वाटचाल सोपी होणार आहे. त्यापूर्वी महापालिका आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत आहे. बुधवारी प्रभागरचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी मनपा प्रशासक यांच्या उपस्थितीत प्राथमिक चर्चा करण्यात आली. या बैठकीत कच्चा आराखडा तयार करण्यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. झोन कार्यालयात नियुक्त नगररचना विभागाचे अभियंते, इतर विभागाचे अभियंते, कर्मचारी यांच्यावर प्रभागनिहाय कच्चे नकाशे तयार करण्याची जबाबदारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रशासनाचा सावध पवित्राआता प्रभागरचना करताना तीन वॉर्डांची जुळवाजुळव करताना प्रगणक गट विचारात घ्यावे लागणार आहेत. प्रगणक गट फोडता येणार नाहीत किंवा जवळचे वॉर्ड सोडून इतर वॉर्डालाही गट जोडता येणार नाहीत. वॉर्डाच्या सीमारेषा तयार करताना प्रगणक गटाचा विचार करूनच नकाशाचे काम करावे लागणार आहे. झोन कार्यालयांतर्गत असलेले वॉर्ड एकत्र करून त्यांचे प्रभाग तयार केले जाणार आहेत. तीन वॉर्डांचा एक प्रभाग बनवला जाणार असल्यामुळे वॉर्डांच्या सीमा मोठ्या प्रमाणात बदलल्या जाण्याची शक्यता आहे. प्रगणक गटांची अदलाबदल करायची झाल्यास वॉर्ड आणि प्रभाग सोडून करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या जवळपास सारखी राहण्याची शक्यता आहे.

प्रगणक गट म्हणजे काय?महापालिकेची निवडणूक २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारावर होणार आहे. जनगणना करताना प्रत्येक वॉर्डात १ हजार नागरिकांचा एक ‘प्रगणक गट’ तयार करण्यात आला. प्रत्येक प्रगणक गटाला एक विशिष्ट क्रमांक देण्यात येतो. त्यानुसार त्या प्रगणक गटाची ओळख असते. वॉर्डातील लोकसंख्या ठरविताना हे प्रगणक गट उपयोगात आणले जातात.

सोयीच्या प्रभागासाठी इच्छुकांची कसरत; महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करणार

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक