शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

औरंगाबाद महापालिकेने निवडणूक आयोगालाही दिली खोटी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:58 IST

वॉर्ड रचना तयार करताना प्रत्येक वॉर्ड दहा हजारांचा ठेवा, असे आयोगाने सांगितलेले असताना तब्बल २१ वॉर्डांमध्ये कमाल-किमान लोकसंख्येचा निकष डावलण्यात आला आहे.

ठळक मुद्देरोटेशननुसार आरक्षण, चक्रानुक्रमे टाकलेले आरक्षण ही सर्व धूळफेक आहे. या घोटाळ्यांंना तोंड देण्यासाठी मनपाच्या निवडणूक विभागाकडे उत्तर नाही.

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणूक विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगालाही खोटी माहिती देण्याचे काम केले आहे. वॉर्ड आरक्षित आणि खुले करण्यासाठी शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला प्रगणक गट नेण्यात आले आहेत. अधिकारी एवढ्यावरच थांबले नाहीत, काही ठिकाणी प्रगणक गटाच्या लोकसंख्येचे लिंग, जात बदलण्यात आल्याची माहिती आज सेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ, भाजपचे समीर राजूरकर, राष्टÑवादीचे अनिल विधाते यांनी दिली.

महापालिका निवडणुकीत तरुण कार्यकर्ते निवडून येऊ नयेत, पारंपरिक मोजकेच काही नेते निवडून यावेत यादृष्टीने संपूर्ण व्यूहरचना आखण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागील आठ दिवसांपासून शहरातील काही होतकरू तरुणांनी रात्रंदिवस अभ्यास करून प्रगणक गटातील अनेक घोटाळे शोधून काढले आहेत. या घोटाळ्यांंना तोंड देण्यासाठी मनपाच्या निवडणूक विभागाकडे उत्तर नाही. प्रगणक गट शहराच्या एका वॉर्डातून चक्क चार वॉर्ड ओलांडत सोयीच्या वॉर्डात नेण्यात आले. २०१५ मध्ये आणलेले हे प्रगणक गट २०२० च्या निवडणुकीत परत जेथून आणले तेथे नेऊन फेकण्यात आले.

वारंवार चार ते पाच वेळेस काही विशिष्ट लोक निवडून येण्याचे कारण म्हणजे प्रगणक गटांचा सोयीनुसार वापर सुरू आहे. त्यामुळे रोटेशननुसार आरक्षण, चक्रानुक्रमे टाकलेले आरक्षण ही सर्व धूळफेक आहे. आमचे वॉर्ड आरक्षित झाले म्हणून आम्ही हा सर्व खटाटोप करीत नाही. आमचे वॉर्ड नियमानुसारच आरक्षित झालेले आहेत. शहरातील इतर तरुण कार्यकर्त्यांसाठी ही लढाई असल्याचे जंजाळ, राजूरकर यांनी नमूद केले. निवडणूक आयोग १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेणार आहे. यासाठी जमावबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांची नियुक्ती केली असून, आयोग योग्य न्याय देईल. मनपातील कनिष्ट कर्मचाऱ्यांनी संघटित गुन्हेगारीप्रमाणे काम केल्याचा गंभीर आरोप सर्वपक्षीय मंडळींनी केला. पत्रपरिषदेत गणेश दीक्षित, नंदलाल गवळी यांची उपस्थिती होती. 

संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर आरोपवॉर्ड रचना तयार करताना गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असा आदेश आयोगाने २ जुलै २००३ रोजी काढला आहे. औरंगाबाद मनपाची वॉर्ड रचना तयार होण्यापूर्वी वर्तमानपत्रांसह, सोशल मीडियात कशी प्रसिद्ध झाली, यातील दोषींवर कडक कारवाई होणार आहे का? प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर कोणतीच कागदपत्रे गोपनीय नाहीत. उलट सर्व कागदपत्रे प्रगणक गटासह वेबसाईटवर टाकायला हवीत. जेणेकरून नागरिक आक्षेप दाखल करू शकतील. मनपा निवडणूक विभाग उपमहापौरांना परिशिष्ट १ ते ११ देण्यास तयार नाही. वॉर्ड रचना तयार करताना प्रत्येक वॉर्ड दहा हजारांचा ठेवा, असे आयोगाने सांगितलेले असताना तब्बल २१ वॉर्डांमध्ये कमाल-किमान लोकसंख्येचा निकष डावलण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग