शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

औरंगाबाद महापालिकेने निवडणूक आयोगालाही दिली खोटी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:58 IST

वॉर्ड रचना तयार करताना प्रत्येक वॉर्ड दहा हजारांचा ठेवा, असे आयोगाने सांगितलेले असताना तब्बल २१ वॉर्डांमध्ये कमाल-किमान लोकसंख्येचा निकष डावलण्यात आला आहे.

ठळक मुद्देरोटेशननुसार आरक्षण, चक्रानुक्रमे टाकलेले आरक्षण ही सर्व धूळफेक आहे. या घोटाळ्यांंना तोंड देण्यासाठी मनपाच्या निवडणूक विभागाकडे उत्तर नाही.

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणूक विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगालाही खोटी माहिती देण्याचे काम केले आहे. वॉर्ड आरक्षित आणि खुले करण्यासाठी शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला प्रगणक गट नेण्यात आले आहेत. अधिकारी एवढ्यावरच थांबले नाहीत, काही ठिकाणी प्रगणक गटाच्या लोकसंख्येचे लिंग, जात बदलण्यात आल्याची माहिती आज सेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ, भाजपचे समीर राजूरकर, राष्टÑवादीचे अनिल विधाते यांनी दिली.

महापालिका निवडणुकीत तरुण कार्यकर्ते निवडून येऊ नयेत, पारंपरिक मोजकेच काही नेते निवडून यावेत यादृष्टीने संपूर्ण व्यूहरचना आखण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागील आठ दिवसांपासून शहरातील काही होतकरू तरुणांनी रात्रंदिवस अभ्यास करून प्रगणक गटातील अनेक घोटाळे शोधून काढले आहेत. या घोटाळ्यांंना तोंड देण्यासाठी मनपाच्या निवडणूक विभागाकडे उत्तर नाही. प्रगणक गट शहराच्या एका वॉर्डातून चक्क चार वॉर्ड ओलांडत सोयीच्या वॉर्डात नेण्यात आले. २०१५ मध्ये आणलेले हे प्रगणक गट २०२० च्या निवडणुकीत परत जेथून आणले तेथे नेऊन फेकण्यात आले.

वारंवार चार ते पाच वेळेस काही विशिष्ट लोक निवडून येण्याचे कारण म्हणजे प्रगणक गटांचा सोयीनुसार वापर सुरू आहे. त्यामुळे रोटेशननुसार आरक्षण, चक्रानुक्रमे टाकलेले आरक्षण ही सर्व धूळफेक आहे. आमचे वॉर्ड आरक्षित झाले म्हणून आम्ही हा सर्व खटाटोप करीत नाही. आमचे वॉर्ड नियमानुसारच आरक्षित झालेले आहेत. शहरातील इतर तरुण कार्यकर्त्यांसाठी ही लढाई असल्याचे जंजाळ, राजूरकर यांनी नमूद केले. निवडणूक आयोग १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेणार आहे. यासाठी जमावबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांची नियुक्ती केली असून, आयोग योग्य न्याय देईल. मनपातील कनिष्ट कर्मचाऱ्यांनी संघटित गुन्हेगारीप्रमाणे काम केल्याचा गंभीर आरोप सर्वपक्षीय मंडळींनी केला. पत्रपरिषदेत गणेश दीक्षित, नंदलाल गवळी यांची उपस्थिती होती. 

संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर आरोपवॉर्ड रचना तयार करताना गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असा आदेश आयोगाने २ जुलै २००३ रोजी काढला आहे. औरंगाबाद मनपाची वॉर्ड रचना तयार होण्यापूर्वी वर्तमानपत्रांसह, सोशल मीडियात कशी प्रसिद्ध झाली, यातील दोषींवर कडक कारवाई होणार आहे का? प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर कोणतीच कागदपत्रे गोपनीय नाहीत. उलट सर्व कागदपत्रे प्रगणक गटासह वेबसाईटवर टाकायला हवीत. जेणेकरून नागरिक आक्षेप दाखल करू शकतील. मनपा निवडणूक विभाग उपमहापौरांना परिशिष्ट १ ते ११ देण्यास तयार नाही. वॉर्ड रचना तयार करताना प्रत्येक वॉर्ड दहा हजारांचा ठेवा, असे आयोगाने सांगितलेले असताना तब्बल २१ वॉर्डांमध्ये कमाल-किमान लोकसंख्येचा निकष डावलण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग