शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महापालिकेने निवडणूक आयोगालाही दिली खोटी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:58 IST

वॉर्ड रचना तयार करताना प्रत्येक वॉर्ड दहा हजारांचा ठेवा, असे आयोगाने सांगितलेले असताना तब्बल २१ वॉर्डांमध्ये कमाल-किमान लोकसंख्येचा निकष डावलण्यात आला आहे.

ठळक मुद्देरोटेशननुसार आरक्षण, चक्रानुक्रमे टाकलेले आरक्षण ही सर्व धूळफेक आहे. या घोटाळ्यांंना तोंड देण्यासाठी मनपाच्या निवडणूक विभागाकडे उत्तर नाही.

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणूक विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगालाही खोटी माहिती देण्याचे काम केले आहे. वॉर्ड आरक्षित आणि खुले करण्यासाठी शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला प्रगणक गट नेण्यात आले आहेत. अधिकारी एवढ्यावरच थांबले नाहीत, काही ठिकाणी प्रगणक गटाच्या लोकसंख्येचे लिंग, जात बदलण्यात आल्याची माहिती आज सेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ, भाजपचे समीर राजूरकर, राष्टÑवादीचे अनिल विधाते यांनी दिली.

महापालिका निवडणुकीत तरुण कार्यकर्ते निवडून येऊ नयेत, पारंपरिक मोजकेच काही नेते निवडून यावेत यादृष्टीने संपूर्ण व्यूहरचना आखण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागील आठ दिवसांपासून शहरातील काही होतकरू तरुणांनी रात्रंदिवस अभ्यास करून प्रगणक गटातील अनेक घोटाळे शोधून काढले आहेत. या घोटाळ्यांंना तोंड देण्यासाठी मनपाच्या निवडणूक विभागाकडे उत्तर नाही. प्रगणक गट शहराच्या एका वॉर्डातून चक्क चार वॉर्ड ओलांडत सोयीच्या वॉर्डात नेण्यात आले. २०१५ मध्ये आणलेले हे प्रगणक गट २०२० च्या निवडणुकीत परत जेथून आणले तेथे नेऊन फेकण्यात आले.

वारंवार चार ते पाच वेळेस काही विशिष्ट लोक निवडून येण्याचे कारण म्हणजे प्रगणक गटांचा सोयीनुसार वापर सुरू आहे. त्यामुळे रोटेशननुसार आरक्षण, चक्रानुक्रमे टाकलेले आरक्षण ही सर्व धूळफेक आहे. आमचे वॉर्ड आरक्षित झाले म्हणून आम्ही हा सर्व खटाटोप करीत नाही. आमचे वॉर्ड नियमानुसारच आरक्षित झालेले आहेत. शहरातील इतर तरुण कार्यकर्त्यांसाठी ही लढाई असल्याचे जंजाळ, राजूरकर यांनी नमूद केले. निवडणूक आयोग १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेणार आहे. यासाठी जमावबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांची नियुक्ती केली असून, आयोग योग्य न्याय देईल. मनपातील कनिष्ट कर्मचाऱ्यांनी संघटित गुन्हेगारीप्रमाणे काम केल्याचा गंभीर आरोप सर्वपक्षीय मंडळींनी केला. पत्रपरिषदेत गणेश दीक्षित, नंदलाल गवळी यांची उपस्थिती होती. 

संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर आरोपवॉर्ड रचना तयार करताना गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असा आदेश आयोगाने २ जुलै २००३ रोजी काढला आहे. औरंगाबाद मनपाची वॉर्ड रचना तयार होण्यापूर्वी वर्तमानपत्रांसह, सोशल मीडियात कशी प्रसिद्ध झाली, यातील दोषींवर कडक कारवाई होणार आहे का? प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर कोणतीच कागदपत्रे गोपनीय नाहीत. उलट सर्व कागदपत्रे प्रगणक गटासह वेबसाईटवर टाकायला हवीत. जेणेकरून नागरिक आक्षेप दाखल करू शकतील. मनपा निवडणूक विभाग उपमहापौरांना परिशिष्ट १ ते ११ देण्यास तयार नाही. वॉर्ड रचना तयार करताना प्रत्येक वॉर्ड दहा हजारांचा ठेवा, असे आयोगाने सांगितलेले असताना तब्बल २१ वॉर्डांमध्ये कमाल-किमान लोकसंख्येचा निकष डावलण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग