शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

औरंगाबाद मनपा आयुक्त दीर्घ रजेवर; कामकाज ठप्प होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 19:16 IST

विकासकामांसाठी एक रुपयाही तिजोरीत नाही, अशा गंभीर परिस्थितीत आयुक्त डॉ. निपुण विनायक बुधवारपासून दीर्घ रजेवर जात आहेत.

औरंगाबाद : कचऱ्यावर प्रक्रिया करणारे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प अजूनही कागदावर आहेत. हे प्रकल्प उभारणे महापालिकेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. कचरा प्रश्नाला मागील आठ महिन्यांपासून औरंगाबादकर तोंड देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही रस्त्यांच्या कामाच्या निविदा अंतिम करण्यात आलेल्या नाहीत, महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १६६ कोटींचा अधिभार येऊन ठेपला आहे. विकासकामांसाठी एक रुपयाही तिजोरीत नाही, अशा गंभीर परिस्थितीत आयुक्त डॉ. निपुण विनायक बुधवारपासून दीर्घ रजेवर जात आहेत. दहा दिवस महापालिकेचा कारभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

महापालिकेतील लहान-मोठा निर्णय आयुक्तांच्या संमतीनेच घ्यावा लागतो. प्रभारी आयुक्त दैनंदिन कामकाज, टपाल पाहण्याचे काम करीत असतात. धोरणात्मक कोणताही निर्णय प्रभारी आयुक्त घेत नाहीत. १७ आॅक्टोबर रोजी महापालिकेचे थोडेफार काम पाहून आयुक्त बाहेरगावी रवाना होणार आहेत. १८ रोजी दसऱ्यानिमित्त सुटीच आहे. १९ ते २९ आॅक्टोबरपर्यंत ते सुटीवर राहणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले. दोन अतिरिक्त आयुक्त महापालिकेत कार्यरत असतानाही शासनाने आयुक्तांचा अतिरिक्त पदभार उदय चौैधरी यांच्याकडे सोपविला आहे. डॉ. निपुण विनायक रुजू होण्यापूर्वी चौैधरी यांच्याकडे काही दिवस अतिरिक्त कार्यभार होता. महापालिकेच्या कामकाजाचा चौैधरी यांना चांगलाच अनुभव आहे.

सर्वसाधारण सभेपूर्वी सुटीमनपा आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी ‘महापालिकेत नागरिक कमी आणि दलाल जास्त येतात,’ असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून राजकीय मंडळी २० आॅक्टोबर रोजी सर्वसाधारण सभेत त्यांची कोंडी करणार होते. मनपात येणाऱ्या दलालांची नावेच जाहीर करा, असा आग्रह आयुक्तांकडे धरण्यात येणार होता. त्यापूर्वीच आयुक्त दीर्घ सुटीवर निघून गेले आहेत.

शेड उभारणीचा श्रीगणेशा नाहीचिकलठाणा आणि पडेगाव येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे दोन प्रकल्प मनपाला उभे करायचे आहेत. शहरात जमा होणाऱ्या ८० टक्के कचऱ्यावर या दोन केंद्रांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामांच्या वर्कआॅर्डरही दोन महिन्यांपूर्वी झाल्या आहेत. प्रत्यक्षात घटनास्थळी शेड उभारणीचा श्रीगणेशा झालेला नाही. हे दोन मोठे प्रकल्प उभारल्याशिवाय शहरातील कचराकोंडी संपणार नाही, हे विशेष.

रस्त्यांचा प्रश्न प्रलंबितमागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२५ कोटींच्या रस्त्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करा, असे आदेश दिले होते. कंत्राटदारांनीही अंदाजपत्रकीय दराने काम करण्याची हमी दिली आहे. मनपा प्रशासनाकडून प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादState Governmentराज्य सरकार