शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

औरंगाबाद मनपा आयुक्त दीर्घ रजेवर; कामकाज ठप्प होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 19:16 IST

विकासकामांसाठी एक रुपयाही तिजोरीत नाही, अशा गंभीर परिस्थितीत आयुक्त डॉ. निपुण विनायक बुधवारपासून दीर्घ रजेवर जात आहेत.

औरंगाबाद : कचऱ्यावर प्रक्रिया करणारे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प अजूनही कागदावर आहेत. हे प्रकल्प उभारणे महापालिकेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. कचरा प्रश्नाला मागील आठ महिन्यांपासून औरंगाबादकर तोंड देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही रस्त्यांच्या कामाच्या निविदा अंतिम करण्यात आलेल्या नाहीत, महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १६६ कोटींचा अधिभार येऊन ठेपला आहे. विकासकामांसाठी एक रुपयाही तिजोरीत नाही, अशा गंभीर परिस्थितीत आयुक्त डॉ. निपुण विनायक बुधवारपासून दीर्घ रजेवर जात आहेत. दहा दिवस महापालिकेचा कारभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

महापालिकेतील लहान-मोठा निर्णय आयुक्तांच्या संमतीनेच घ्यावा लागतो. प्रभारी आयुक्त दैनंदिन कामकाज, टपाल पाहण्याचे काम करीत असतात. धोरणात्मक कोणताही निर्णय प्रभारी आयुक्त घेत नाहीत. १७ आॅक्टोबर रोजी महापालिकेचे थोडेफार काम पाहून आयुक्त बाहेरगावी रवाना होणार आहेत. १८ रोजी दसऱ्यानिमित्त सुटीच आहे. १९ ते २९ आॅक्टोबरपर्यंत ते सुटीवर राहणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले. दोन अतिरिक्त आयुक्त महापालिकेत कार्यरत असतानाही शासनाने आयुक्तांचा अतिरिक्त पदभार उदय चौैधरी यांच्याकडे सोपविला आहे. डॉ. निपुण विनायक रुजू होण्यापूर्वी चौैधरी यांच्याकडे काही दिवस अतिरिक्त कार्यभार होता. महापालिकेच्या कामकाजाचा चौैधरी यांना चांगलाच अनुभव आहे.

सर्वसाधारण सभेपूर्वी सुटीमनपा आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी ‘महापालिकेत नागरिक कमी आणि दलाल जास्त येतात,’ असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून राजकीय मंडळी २० आॅक्टोबर रोजी सर्वसाधारण सभेत त्यांची कोंडी करणार होते. मनपात येणाऱ्या दलालांची नावेच जाहीर करा, असा आग्रह आयुक्तांकडे धरण्यात येणार होता. त्यापूर्वीच आयुक्त दीर्घ सुटीवर निघून गेले आहेत.

शेड उभारणीचा श्रीगणेशा नाहीचिकलठाणा आणि पडेगाव येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे दोन प्रकल्प मनपाला उभे करायचे आहेत. शहरात जमा होणाऱ्या ८० टक्के कचऱ्यावर या दोन केंद्रांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामांच्या वर्कआॅर्डरही दोन महिन्यांपूर्वी झाल्या आहेत. प्रत्यक्षात घटनास्थळी शेड उभारणीचा श्रीगणेशा झालेला नाही. हे दोन मोठे प्रकल्प उभारल्याशिवाय शहरातील कचराकोंडी संपणार नाही, हे विशेष.

रस्त्यांचा प्रश्न प्रलंबितमागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२५ कोटींच्या रस्त्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करा, असे आदेश दिले होते. कंत्राटदारांनीही अंदाजपत्रकीय दराने काम करण्याची हमी दिली आहे. मनपा प्रशासनाकडून प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादState Governmentराज्य सरकार