शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
2
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत गुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
7
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
8
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
9
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !
10
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
11
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
12
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
13
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
14
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
15
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
16
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
17
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
18
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
19
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
20
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: माझा पाय मोडला अन् त्यानंतर...; स्वागत न स्वीकारण्यामागं राज ठाकरेंनी सांगितलं कार्यकर्त्यांना कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 09:29 IST

संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाबा पेट्रोल पंप चौकात दाखल झाले. त्याठिकाणी ढोलताशे, मोटारसायकल रॅली आणि फुलांचे हार असं जंगी कार्यक्रम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होणार होता.

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून सध्या ते औरंगाबादमध्ये २ दिवसीय कार्यक्रमात आहेत. याठिकाणी राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. सोमवारी रात्री राज ठाकरेंचे शहरात आगमन झालं. राज ठाकरे शहरात येणार असल्यानं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. बाबा चौकात कार्यकर्ते जमले होते. परंतु राज ठाकरे यांनी स्वागत न स्वीकारता थेट शासकीय विश्रामगृह गाठलं. त्यामुळे कार्यकर्त्यांना हिरमोड झाला. परंतु त्यानंतर राज ठाकरेंनी असं का केले याचं कारणही सांगितले.

संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाबा पेट्रोल पंप चौकात दाखल झाले. त्याठिकाणी ढोलताशे, मोटारसायकल रॅली आणि फुलांचे हार असं जंगी कार्यक्रम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होणार होता. पण त्यावेळी भलतेच घडले. राज ठाकरे बाबा पेट्रोप पंप चौकात न थांबता थेट शासकीय विश्रामगृहात निघून गेले. त्यानंतर कार्यकर्त्यांना माझा पाय मोडला त्यानंतर हात मोडला एक एक करत विघ्नं येत गेले म्हणून स्वागत स्वीकारु शकलो नाही असं कारण राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.

कसा आहे राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवसभर औरंगाबादमध्ये असून सकाळी १० वाजता मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास ते पत्रकार परिषद घेतील. संध्याकाळी ५ वाजता एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावून ते पुण्यासाठी रवाना होतील.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे 'राजदूत' उतरणार

राज ठाकरे यांच्या पक्षाची मागील काही वर्षातील परिस्थिती पाहिली तर नक्कीच ती समाधानकारक नाही. पक्षाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे पक्षात पुन्हा ताकद निर्माण करण्यासाठी राज ठाकरे यांनी नवी योजना आखली आहे. यानुसार मनसे 'राजदूत' नेमणार आहे. आगामी निवडणुकांत पक्षाची ध्येय धोरणे आणि पदाधिकाऱ्यांनी केलेली कामे हे 'राजदूत' घरोघरी पोहचवणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षाची गेल्या अनेक वर्षापासून स्थिती ढासळत चालल्याची चर्चा आहे. राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटतचं नाहीत अशीही चर्चा मागील काही वर्षात सातत्याने राजकीय वर्तुळात रंगत आहे. परंतु, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने कदाचित या सर्व चर्चांना पूर्ण विराम बसण्याची शक्यता आहे. कारण, या सर्वच प्रकारांना आळा घालण्यासाठी राज ठाकरे यांनी आता एक नवा प्लॅन तयार केल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे