शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
2
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
3
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
4
Video - संतापजनक! "म्हातारे, मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू..."; वृद्ध महिलेला पोलिसाची धमकी
5
महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; Whatsapp स्टेटसमुळे घटना उघडकीस, हत्येचा दावा
6
दिल्ली बॉम्बस्फोटाचं हमास कनेक्शन! हल्ल्यासाठी ड्रोन वापरायचा कट; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मोठा खुलासा
7
IPL 2026: ग्लेन मॅक्सवेलची कारकीर्द धोक्यात? पंजाबने सोडलं, आता लिलावातून बाहेर, कारण काय?
8
"सरकार-बँका मला आणि जनतेला किती काळ फसवत राहणार?" विजय माल्ल्याचे सरकारला पुन्हा सवाल
9
"धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराजांनी वाचवलेलं"; रत्नाकर गुट्टेंचा मोठा गौप्यस्फोट
10
पाकिस्तानात आज अचानक काय घडतंय?, राष्ट्रपतींनी बोलावली संसदेची बैठक; शहबाज परदेशातून परतले
11
अरे देवा! "...म्हणूनच तो हनिमूनच्या रात्री पळून गेला", ५ दिवसांनी सापडला गायब झालेला नवरदेव
12
Crime: बायकोचं लफडं कळताच पती संतापला; मित्राला ट्रॅक्टरखाली चिरडून मारलं!
13
"अख्खा सिनेमा मी केला पण तू...", झीशान अय्यूबच्या कॅमिओवर धनुषची प्रतिक्रिया चर्चेत
14
LOC वर ६९ लॉन्चिंग पॅड, १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; भारत पुन्हा 'ऑपरेशन सिंदूर' राबवणार?
15
हनीमूनच्या आधीच लव्हस्टोरीचा 'दि एन्ड'! नवरीने पतीला दिला धोका; मिठाईच्या बहाण्याने पतीला दुकानात पाठवलं अन्.. 
16
११ महिन्यांत १.३५ लाख मालमत्ता विक्रीचा उच्चांक, मुंबईकरांकडून राज्य सरकारला मिळाला १२ हजार २२४ कोटींचा महसूल
17
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट पुन्हा विक्रीसाठी! १.१७ कोटींची बोली लावणाऱ्याचं पुढे काय झालं?
18
ठाण्यातील बेकायदा बांधकामे आतापर्यंत का पाडली नाहीत? बाळकुम, येऊरबाबत हायकोर्टाची विचारणा
19
Karad Bus Accident: नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा कराडजवळ अपघात; २० फूट खड्ड्यात कोसळली, ४५ जण जखमी
20
आता आणखी एका सरकारी बँकेतील हिस्सा विकणार सरकार; कोणती आहे बँक, किती कमाई होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलील-खैरेंचे प्रचारात बरेच अंदाज चुकले; लोकसभा पराभवाला जबाबदार कोण, कारणे काय?

By मुजीब देवणीकर | Updated: June 10, 2024 15:14 IST

Aurangabad Lok Sabha Result 2024: चंद्रकांत खैरे यांनी ज्या ताकदीने निवडणूक लढायला हवी होती, त्या पद्धतीने निवडणूक लढलीच नसल्याचे समोर येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यंदाही तिरंगी लढत झाली. शिंदेसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांना मोठे यश मिळाले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील आणि उद्धवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभूत दोन्ही उमेदवारांचे प्रचारातील अंदाज पूर्णपणे चुकले. पराभवाला एक नव्हे तर अनेक कारणे असल्याचे आता समोर येत आहे.

चंद्रकांत खैरे यांनी ज्या ताकदीने निवडणूक लढायला हवी होती, त्या पद्धतीने निवडणूक लढलीच नसल्याचे समोर येत आहे. १९८० ते २००० पर्यंत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने निवडणूक लढत असत त्या पद्धतीने निवडणूक लढताना कार्यकर्ते दिसून आले नाहीत. माझी ही शेवटची निवडणूक असल्याचे खैरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्याचा किंचितही फायदा त्यांना या निवडणुकीत झाला नाही. खैरे यांच्यासाठी मतदानापूर्वी किमान १५ दिवस अगोदर अत्यंत पोषक वातावरण होते. हे पोषक वातावरण त्यांना ‘कॅश’ करता आले नाही. शिंदेसेनेने राजकारणातील ही पोकळी आपल्या प्रचारतंत्राद्वारे भरून काढल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत रनर अप ठरलेले उमेदवार इम्तियाज जलील यांनी संपूर्ण निवडणूक स्वत:च्या इमेजवर लढण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम मते तर आपल्याला एकगठ्ठा पडणारच आहेत. विजयासाठी आपल्याला बरीच हिंदू मतेही लागतील, या दृष्टीने प्रचारतंत्र राबविले. त्याचा काही अंशी फायदाही झाला. मुस्लिमांशिवाय अन्य समाजांची मोठ्या प्रमाणात त्यांना मते मिळाल्याचे दिसून येते.

चंद्रकांत खैरे :१) विकासाचा दृष्टिकोन लोकांपर्यंत गेला नाही. सकारात्मक प्रचारापेक्षा ‘खैरेंनी काय केले....’, ही टॅगलाइन बूमरँग झाली.२) अनेक वर्षे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढली. यंदा मशाल चिन्हावर लढले. त्यामुळे पारंपरिक काही मतदार दूर गेले.३) अतिआत्मविश्वास, मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी धडपड दिसून आली नाही.४) कार्यकर्त्यांची दुसरी आणि तिसरी फळी निर्माण करण्यात अपयश. महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचेही दुर्लक्ष.५) मुस्लिमांना फार जवळ करण्याच्या नादात हिंदू मतदार मोठ्या प्रमाणात दूर गेले.६) प्रचार यंत्रणाच नव्हती. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर झाला नाही. ग्रामीण भागावर विसंबून राहणे महागात पडले.

इम्तियाज जलील:१) ‘वंचित’सोबत असलेली युती तोडणे ‘एमआयएम’ला अत्यंत महागात पडले.२) काही अंशी नाराज मुस्लिमांची मते महाविकास आघाडीकडे गेली. ती रोखण्यात अपयश.३) पक्षातील अंतर्गत धुसफूसही काही अंशी कारणीभूत. डॅमेज कंट्रोलमध्ये बरीच शक्ती खर्च.४) हिंदू मतांसाठी बरीच मेहनत घेतली; पण उपयोग नाही. ‘आदर्श’ आंदोलनाचा फायदा नाही.५) सोशल मीडियाचा ज्या पद्धतीने उपयोग करायला हवा, तसा करता आला नाही.६) निवडणूक प्रचारात घेतलेले काही निर्णय अंगलट आल्याचे दिसून येतात.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालaurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेImtiaz Jalilइम्तियाज जलील