शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांचा ‘टक्का’ वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:32 IST

इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरु

ठळक मुद्देयुतीचा आकडा वजनदारएकूण ६१६ मतदार

- विकास राऊत 

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांची संख्या वाढली असून, या मतदारसंघाच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आॅगस्ट महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यास त्यांच्याकडील नगरसेवक सदस्यांचा आकडा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत वजनदार आहे. युतीकडे २९८, आघाडीकडे २५०, एमआयएम व अपक्ष मिळून एकूण ६१६ मतदार आहेत. मागील निवडणुकीत ४८० च्या आसपास मतदार होते. येणाऱ्या निवडणुकीत सेना-भाजप युती आणि काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सध्या काँगे्रसकडे हा मतदारसंघ असून, आ. सुभाष झांबड त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात मनपा, नपा, जि.प.मधील ३६१ मतदार आहेत, तर जालना जिल्ह्यात जि.प., न.प. मिळून २५५ मतदार आहेत. एकूण ६१६ मतदारांची संख्या आहे. ६८ मतदार इतर अपक्ष व इतर पक्षांचे आहेत. नव्याने झालेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतींमुळे १२० च्या आसपास सदस्य संख्या वाढली आहे, तर औरंगाबाद पालिकेतही १६ मतदार सदस्य वाढले आहेत. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी होणारी निवडणूक उमेदवारांना बजेटच्या आवाक्याबाहेर घेऊन जाणारी ठरण्याची चिन्हे आहेत. पक्ष म्हणून विचार केला, तर १६७ सदस्य कॉँग्रेसकडे आहेत. त्याखालोखाल भाजपकडे १५९, तर शिवसेनेकडे १३९ मतदार सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ८३, तर एमआयएमकडे २७ च्या आसपास मतदार सदस्य असल्याचा आकडा इच्छुकांकडे नोंद आहे. ४१ मतदार इतर पक्षांचे व अपक्षांचे आहेत. 

उमेदवारीसाठी सर्वांचे प्रयत्न हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, त्यामुळे सेनेकडून कुणाला उमेदवारी मिळते. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. ज्याचे जास्त सदस्य त्याच्याकडे मतदारसंघ या आधारावर भाजपही मतदारसंघावर दावा करण्याच्या विचारात आहे. बाहेरून उमेदवार मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत पसंतीनुसार मतदान होत असते.४ पहिल्या पसंतीची मते सेना-भाजप युतीकडे जास्त आहेत. सध्या राष्ट्रवादी पक्षात नावापुरते कार्यरत असलेले शिवसेना-भाजपकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीतील काहींनी कामदेखील सुरू केले असून, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत स्नेहभोजन सुरू केले आहे, तसेच दुष्काळी मदतीसाठी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. ४भाजप आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन जण इच्छुक असून, त्यांनी आकडेमोड सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजप असे मिळून पहिल्या पसंतीच्या मतांची गोळाबेरीज होत असली तरी तगडे अर्थकारण करणारा उमेदवार या निवडणुकीत बाजी मारील. राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये येण्याची काही जणांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादJalanaजालना