शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-हैदराबाद विमानात तांत्रिक बिघाडाने ६० प्रवासी ६ तास खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:25 IST

दुपारी ४ वाजता आलेल्या ६०  प्रवाशांना रात्री १० वाजता उड्डाण रद्द झाल्याचे सांगण्यात आले

ठळक मुद्दे६.३० वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती प्रवाशांना दिली विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची कल्पना वैमानिकाला आली. दुरुस्तीनंतर विमानाचे उड्डाण होईल, असेही सांगण्यात आले.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या  ट्रू जेट कंपनीच्या औरंगाबाद-हैदराबाद विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना रविवारी (दि. ११) घडली. विमान दुरुस्त होऊन हैदराबादकडे रवाना होईल, या अपेक्षेने दुपारी ४ वाजता आलेल्या ६०  प्रवाशांना रात्री १० वाजेपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. परंतु अखेर विमान उड्डाण घेऊ शकणार नसल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. या प्रकाराविषयी संताप व्यक्त करीत  प्रवासीविमानतळाबाहेर पडले.

औरंगाबादहून हैदराबादला जाण्यासाठी प्रवासी विमानतळार दाखल झाले होते. ६.३० वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. त्यामुळे अनेक प्रवासी दुपारी ४ वाजेपासून विमानतळावर दाखल झाले होते. हैदराबाद- औरंगाबाद विमान विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर हे विमान परतीच्या प्रवासासाठी सज्ज होत होते. त्याच वेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची कल्पना वैमानिकाला आली. वैमानिक आणि  ट्रू जेट कंपनीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी विमानाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असताना सर्व प्रवासी विमानतळावर बसून होते. प्रारंभी विमानास नेमक्या कोणत्या कारणांनी उशीर होत आहे, याविषयी प्रवाशांना काहीही कल्पना देण्यात आली नाही. त्यानंतर विमान ग्राऊंड (तांत्रिक बिघाड) झाल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. दुरुस्तीनंतर विमानाचे उड्डाण होईल, असेही सांगण्यात आले. परंतु दुरुस्तीमध्ये रात्रीचे १० वाजले. विमान दुरुस्त होणार नसल्याचे लक्षात येताच प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे विमान रद्द झाले, असे  ट्रू जेटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुपारपासून विमानतळावरहैदराबादला डॉक्टरांची अपॉइंमेंट होती. त्यामुळे दुपारी ३ वाजता विमानतळावर आले. परंतु विमान खराब झाल्याचे सांगून रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गैरसोय झाल्याचे स्नेहा छाबडा यांनी सांगितले.

१७ आॅगस्टपर्यंत उड्डाण रद्दचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे ट्रू जेट कंपनीचे हैदराबाद-औरंगाबाद- हैदराबाद विमान रद्द होण्याचा प्रकार थांबत नाही. सलग सुट्या असताना १२ ते १७ आॅगस्टदरम्यान पुन्हा एकदा विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. 

ईदसाठी जायचे होतेभाचीला ईदसाठी हैदराबादला जायचे होते. तिचे आई-वडील हैदराबादला असतात. परंतु सहा तास बसवून ठेवल्यानंतर विमान रद्द झाल्याचे सांगितले. आता रेल्वे आणि इतर वाहतुकीच्या सुविधेने जाणेही अशक्य असल्याचे अ‍ॅड. मोहंमद वसीमउल्ला म्हणाले. यावेळी आई-वडिलांच्या ओढीने सदर युवतीला अश्रू आवरणे कठीण झाले होते.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळpassengerप्रवासीAirportविमानतळ