शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबाद-हैदराबाद विमानात तांत्रिक बिघाडाने ६० प्रवासी ६ तास खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:25 IST

दुपारी ४ वाजता आलेल्या ६०  प्रवाशांना रात्री १० वाजता उड्डाण रद्द झाल्याचे सांगण्यात आले

ठळक मुद्दे६.३० वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती प्रवाशांना दिली विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची कल्पना वैमानिकाला आली. दुरुस्तीनंतर विमानाचे उड्डाण होईल, असेही सांगण्यात आले.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या  ट्रू जेट कंपनीच्या औरंगाबाद-हैदराबाद विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना रविवारी (दि. ११) घडली. विमान दुरुस्त होऊन हैदराबादकडे रवाना होईल, या अपेक्षेने दुपारी ४ वाजता आलेल्या ६०  प्रवाशांना रात्री १० वाजेपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. परंतु अखेर विमान उड्डाण घेऊ शकणार नसल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. या प्रकाराविषयी संताप व्यक्त करीत  प्रवासीविमानतळाबाहेर पडले.

औरंगाबादहून हैदराबादला जाण्यासाठी प्रवासी विमानतळार दाखल झाले होते. ६.३० वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. त्यामुळे अनेक प्रवासी दुपारी ४ वाजेपासून विमानतळावर दाखल झाले होते. हैदराबाद- औरंगाबाद विमान विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर हे विमान परतीच्या प्रवासासाठी सज्ज होत होते. त्याच वेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची कल्पना वैमानिकाला आली. वैमानिक आणि  ट्रू जेट कंपनीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी विमानाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असताना सर्व प्रवासी विमानतळावर बसून होते. प्रारंभी विमानास नेमक्या कोणत्या कारणांनी उशीर होत आहे, याविषयी प्रवाशांना काहीही कल्पना देण्यात आली नाही. त्यानंतर विमान ग्राऊंड (तांत्रिक बिघाड) झाल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. दुरुस्तीनंतर विमानाचे उड्डाण होईल, असेही सांगण्यात आले. परंतु दुरुस्तीमध्ये रात्रीचे १० वाजले. विमान दुरुस्त होणार नसल्याचे लक्षात येताच प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे विमान रद्द झाले, असे  ट्रू जेटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुपारपासून विमानतळावरहैदराबादला डॉक्टरांची अपॉइंमेंट होती. त्यामुळे दुपारी ३ वाजता विमानतळावर आले. परंतु विमान खराब झाल्याचे सांगून रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गैरसोय झाल्याचे स्नेहा छाबडा यांनी सांगितले.

१७ आॅगस्टपर्यंत उड्डाण रद्दचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे ट्रू जेट कंपनीचे हैदराबाद-औरंगाबाद- हैदराबाद विमान रद्द होण्याचा प्रकार थांबत नाही. सलग सुट्या असताना १२ ते १७ आॅगस्टदरम्यान पुन्हा एकदा विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. 

ईदसाठी जायचे होतेभाचीला ईदसाठी हैदराबादला जायचे होते. तिचे आई-वडील हैदराबादला असतात. परंतु सहा तास बसवून ठेवल्यानंतर विमान रद्द झाल्याचे सांगितले. आता रेल्वे आणि इतर वाहतुकीच्या सुविधेने जाणेही अशक्य असल्याचे अ‍ॅड. मोहंमद वसीमउल्ला म्हणाले. यावेळी आई-वडिलांच्या ओढीने सदर युवतीला अश्रू आवरणे कठीण झाले होते.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळpassengerप्रवासीAirportविमानतळ