शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ९० कोटींचा प्रकल्प; अनेकांचे ‘इंटरेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:58 IST

राज्य शासन, महापालिका, घनकचरा संनियंत्रण समितीच्या फेºयात शहरातील कचरा समस्या १११ दिवसांपासून तशीच असून, कचरा प्रक्रियेसाठी राबविण्यात येणाºया ९० कोटींच्या प्रकल्पात अनेकांचे इंटरेस्ट वाढले आहेत.

ठळक मुद्देआता रोगराईची भीती : राज्य शासन, महापालिका, संनियंत्रण समितीच्या फेऱ्यात गेले १११ दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य शासन, महापालिका, घनकचरा संनियंत्रण समितीच्या फेºयात शहरातील कचरा समस्या १११ दिवसांपासून तशीच असून, कचरा प्रक्रियेसाठी राबविण्यात येणाºया ९० कोटींच्या प्रकल्पात अनेकांचे इंटरेस्ट वाढले आहेत. पावसाळा सुरू झाला असून, कच-यांच्या ढिगांमुळे रोगराईची भीती वाढू लागली असून, पालिका, संनियंत्रण समिती सध्या ढीम्मपणे निर्णय घेत असल्याचे दिसते.कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी इंदौरची संस्था पीएमसी म्हणून काम पाहणार आहे. त्यांची टीम पुण्याहून काम पाहते. राज्य शासनाच्या नगरविकास विभाग क्रमांक १ व २ च्या सचिवांमार्फत आयुक्तालयात कार्यशाळा व बैठका सुरू आहेत. या सगळ्या चक्रव्यूहात शहरातील कचरा टाकण्यासाठी निश्चित केलेल्या जागांचे काय करायचे, प्रक्रिया प्रकल्पाचे काय झाले. या व इतर अनेक बाबींचे मुद्दे मागे पडले आहेत. पावसाळा सुरू झाला आहे. शहरातील कचºयाचे ढीग रोगराईला आमंत्रण देऊ लागले आहेत.१६ फेब्रुवारी ते ७ जूनपर्यंतचा कचºयाच्या समस्येचा प्रवास ‘शहराचा कचरा’ करणारा ठरला आहे. या १११ दिवसांत शहरातील इतर समस्यांकडे लक्ष देण्यासाठी शासनापासून पालिकेपर्यंत कुणालाही वेळ मिळालेला नाही. विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांना कचरा संनियंत्रण समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यांनी आजवर २० च्या आसपास बैठका घेतल्या; परंतु आऊटपुट काहीही मिळालेले नाही.इंदौरमधून प्रकल्पाचा डीपीआर करणारी संस्था काम पाहत आहे. त्या संस्थेचे कार्यालय पुण्याला आहे. शासनाचे प्रतिनिधी संनियंत्रण समितीकडे येऊन बैठका, कार्यशाळा घेऊन प्रक्रिया प्रकल्पाची माहिती जाणून घेत आहेत. या सगळ्या प्रक्रि येत महापालिकेला कुठलाही थांगपत्ता नाही. परिणामी कुठे काय चालले आहे, हे कळण्यास मार्ग नसून, शहरातील कचरा समस्या सुटत नसल्याचे दिसते आहे.मनपा सत्ताधाºयांचा दावा असा४शनिवारी कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदा अंतिम होतील. ९० कोटी रुपयांतून खरेदी करण्यात येणारी यंत्रणा कशी असावी, याची पारदर्शक माहिती प्रशासनाने सादर करावी, असे सूचित करण्यात आले आहे, असा दावा सभापती राजू वैद्य यांनी केला. कचºयामुळे शहराची प्रतिमा मलिन झाली आहे; परंतु स्वच्छ व सुंदर शहर करण्याला प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHealthआरोग्य