शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ९० कोटींचा प्रकल्प; अनेकांचे ‘इंटरेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:58 IST

राज्य शासन, महापालिका, घनकचरा संनियंत्रण समितीच्या फेºयात शहरातील कचरा समस्या १११ दिवसांपासून तशीच असून, कचरा प्रक्रियेसाठी राबविण्यात येणाºया ९० कोटींच्या प्रकल्पात अनेकांचे इंटरेस्ट वाढले आहेत.

ठळक मुद्देआता रोगराईची भीती : राज्य शासन, महापालिका, संनियंत्रण समितीच्या फेऱ्यात गेले १११ दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य शासन, महापालिका, घनकचरा संनियंत्रण समितीच्या फेºयात शहरातील कचरा समस्या १११ दिवसांपासून तशीच असून, कचरा प्रक्रियेसाठी राबविण्यात येणाºया ९० कोटींच्या प्रकल्पात अनेकांचे इंटरेस्ट वाढले आहेत. पावसाळा सुरू झाला असून, कच-यांच्या ढिगांमुळे रोगराईची भीती वाढू लागली असून, पालिका, संनियंत्रण समिती सध्या ढीम्मपणे निर्णय घेत असल्याचे दिसते.कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी इंदौरची संस्था पीएमसी म्हणून काम पाहणार आहे. त्यांची टीम पुण्याहून काम पाहते. राज्य शासनाच्या नगरविकास विभाग क्रमांक १ व २ च्या सचिवांमार्फत आयुक्तालयात कार्यशाळा व बैठका सुरू आहेत. या सगळ्या चक्रव्यूहात शहरातील कचरा टाकण्यासाठी निश्चित केलेल्या जागांचे काय करायचे, प्रक्रिया प्रकल्पाचे काय झाले. या व इतर अनेक बाबींचे मुद्दे मागे पडले आहेत. पावसाळा सुरू झाला आहे. शहरातील कचºयाचे ढीग रोगराईला आमंत्रण देऊ लागले आहेत.१६ फेब्रुवारी ते ७ जूनपर्यंतचा कचºयाच्या समस्येचा प्रवास ‘शहराचा कचरा’ करणारा ठरला आहे. या १११ दिवसांत शहरातील इतर समस्यांकडे लक्ष देण्यासाठी शासनापासून पालिकेपर्यंत कुणालाही वेळ मिळालेला नाही. विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांना कचरा संनियंत्रण समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यांनी आजवर २० च्या आसपास बैठका घेतल्या; परंतु आऊटपुट काहीही मिळालेले नाही.इंदौरमधून प्रकल्पाचा डीपीआर करणारी संस्था काम पाहत आहे. त्या संस्थेचे कार्यालय पुण्याला आहे. शासनाचे प्रतिनिधी संनियंत्रण समितीकडे येऊन बैठका, कार्यशाळा घेऊन प्रक्रिया प्रकल्पाची माहिती जाणून घेत आहेत. या सगळ्या प्रक्रि येत महापालिकेला कुठलाही थांगपत्ता नाही. परिणामी कुठे काय चालले आहे, हे कळण्यास मार्ग नसून, शहरातील कचरा समस्या सुटत नसल्याचे दिसते आहे.मनपा सत्ताधाºयांचा दावा असा४शनिवारी कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदा अंतिम होतील. ९० कोटी रुपयांतून खरेदी करण्यात येणारी यंत्रणा कशी असावी, याची पारदर्शक माहिती प्रशासनाने सादर करावी, असे सूचित करण्यात आले आहे, असा दावा सभापती राजू वैद्य यांनी केला. कचºयामुळे शहराची प्रतिमा मलिन झाली आहे; परंतु स्वच्छ व सुंदर शहर करण्याला प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHealthआरोग्य