शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद आगारात ३९ शिवशाही, मात्र मुंबईसाठी धावतात केवळ दोनच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 18:43 IST

सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून ‘एसटी’च्या ताफ्यात ३९ शिवशाही बस आहेत. त्यातील केवळ दोनच बस मुंबईसाठी धावतात.

ठळक मुद्दे खासगी ट्रॅव्हल्सच्या तब्बल ३० बस दररोज मुंबईला भरून जातात एसटी महामंडळाचे अधिकारी या मार्गावर प्रवासी नसल्याचे तुणतुणे वाजवीत आहेत.

औरंगाबाद : एसटी महामंडळाने खाजगी बससेवेला टक्कर देण्यासाठी मोठा गाजावाजा करून वातानुकूलित शिवशाही बस रस्त्यावर उतरविल्या. सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून ‘एसटी’च्या ताफ्यात ३९ शिवशाही बस आहेत. त्यातील केवळ दोनच बस मुंबईसाठी धावतात. खासगी ट्रॅव्हल्सच्या तब्बल ३० बस दररोज मुंबईला भरून जात असताना एसटी महामंडळाचे अधिकारी या मार्गावर प्रवासी नसल्याचे तुणतुणे वाजवीत आहेत. परिणामी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करून खाजगी बसचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

एसटी महामंडळ काळानुरूप बदल करीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाययोजना करीत आहे. औरंगाबादेत गेली अनेक वर्षे केवळ पुण्यासाठी ‘एसटी’ची आरामदायक अशी शिवनेरी बसची सेवा सुरू होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद विभागाला आॅक्टोबर २०१७ मध्ये दोन शिवशाही बस देण्यात आल्या. यानंतर टप्प्याटप्प्याने शिवशाही बस दाखल होत गेल्या. वातानुकूलित, एअर सस्पेंशन, एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा आणि किफायतशीर तिकीटदरामुळे शिवशाही बस अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरली. सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून शिवशाही बसची संख्या आता ३९ वर गेली आहे. 

नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. औरंगाबादहून मुंबईला जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. दररोज दोन ते तीन हजारांवर प्रवासी ये-जा करतात. अनेकांना वेटिंगवर प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवासी एसटी आणि खाजगी बसला प्राधान्य देतात. ‘एसटी’कडून मुंबईसाठी दोनच शिवशाही बस चालविण्यात येतात. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना खाजगी बसकडे वळावे लागत आहे. एसटी महामंडळाने पुढाकार घेऊन मुंबईसाठी आणखी  बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

बीड, नांदेडला शिवशाहीनाशिक, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, सावंतवाडी, लातूर, भुसावळ, अकोला, यवतमाळसह बीड, नांदेड मार्गावरही शिवशाही बस चालविण्यात येत आहे. सिडको बसस्थानकातून रात्री ११.३० वाजता मुंबईसाठी शिवशाही बस सुटते. या बसचे ६४९ रुपये प्रवासभाडे आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सायंकाळी ५.३० वाजता औरंगाबाद-बोरिवली या मार्गावर शिवशाही बस धावते. या दोन बसचा प्रवाशांना आधार मिळतो. इतर विभागातील काही बस धावतात; परंतु त्या बस आधीच प्रवाशांच्या गर्दीने भरून येतात. 

खाजगी बस ‘सुसाट’च्रेल्वेतील गर्दी आणि ‘एसटी’च्या परिस्थितीने प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी खाजगी बसचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी ८०० ते १२००  रुपयांपर्यंत तिकीट दर देण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढावते. एकट्या औरंगाबादेतून मुंबईतून दररोज ३० खाजगी बस धावतात. यातून दररोज किमान ९०० जण प्रवास करतात.  

मागणी यावीमुंबई बससाठी फार मागणी नाही. प्रवाशांची मागणी आली तर लगेच शिवशाही बस सुरू केली जाईल, असे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी म्हणाले.

वेगवेगळे दरशहरातून मुंबईसाठी ३० ट्रॅव्हल्स बस धावतात. वेगवेगळ्या बसचे वेगवगळे दर आहेत. ८०० पासून १२०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते, अशी माहिती औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे अध्यक्ष राजन हौजवाला यांनी दिली.

प्रवासी म्हणतात...मुंबईला नियमितपणे ये-जा करावी लागते. मुंबई मार्गावर शिवशाही बस वाढवल्या जातील, अशी अपेक्षा होती; परंतु तसे होताना दिसत नाही. जी बस आहे, त्यामध्ये जागा मिळण्याची शाश्वती नसते. त्यामुळे खाजगी बसचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. मुंबईसाठी शिवशाही बसची संख्या वाढली तर खाजगी बसकडे जाण्याचे टाळता येईल, असे एका प्रवाशाने सांगितले.

टॅग्स :state transportएसटीShivshahiशिवशाहीpassengerप्रवासीAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानक