शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

औरंगाबाद आगारात ३९ शिवशाही, मात्र मुंबईसाठी धावतात केवळ दोनच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 18:43 IST

सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून ‘एसटी’च्या ताफ्यात ३९ शिवशाही बस आहेत. त्यातील केवळ दोनच बस मुंबईसाठी धावतात.

ठळक मुद्दे खासगी ट्रॅव्हल्सच्या तब्बल ३० बस दररोज मुंबईला भरून जातात एसटी महामंडळाचे अधिकारी या मार्गावर प्रवासी नसल्याचे तुणतुणे वाजवीत आहेत.

औरंगाबाद : एसटी महामंडळाने खाजगी बससेवेला टक्कर देण्यासाठी मोठा गाजावाजा करून वातानुकूलित शिवशाही बस रस्त्यावर उतरविल्या. सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून ‘एसटी’च्या ताफ्यात ३९ शिवशाही बस आहेत. त्यातील केवळ दोनच बस मुंबईसाठी धावतात. खासगी ट्रॅव्हल्सच्या तब्बल ३० बस दररोज मुंबईला भरून जात असताना एसटी महामंडळाचे अधिकारी या मार्गावर प्रवासी नसल्याचे तुणतुणे वाजवीत आहेत. परिणामी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करून खाजगी बसचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

एसटी महामंडळ काळानुरूप बदल करीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाययोजना करीत आहे. औरंगाबादेत गेली अनेक वर्षे केवळ पुण्यासाठी ‘एसटी’ची आरामदायक अशी शिवनेरी बसची सेवा सुरू होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद विभागाला आॅक्टोबर २०१७ मध्ये दोन शिवशाही बस देण्यात आल्या. यानंतर टप्प्याटप्प्याने शिवशाही बस दाखल होत गेल्या. वातानुकूलित, एअर सस्पेंशन, एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा आणि किफायतशीर तिकीटदरामुळे शिवशाही बस अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरली. सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून शिवशाही बसची संख्या आता ३९ वर गेली आहे. 

नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. औरंगाबादहून मुंबईला जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. दररोज दोन ते तीन हजारांवर प्रवासी ये-जा करतात. अनेकांना वेटिंगवर प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवासी एसटी आणि खाजगी बसला प्राधान्य देतात. ‘एसटी’कडून मुंबईसाठी दोनच शिवशाही बस चालविण्यात येतात. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना खाजगी बसकडे वळावे लागत आहे. एसटी महामंडळाने पुढाकार घेऊन मुंबईसाठी आणखी  बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

बीड, नांदेडला शिवशाहीनाशिक, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, सावंतवाडी, लातूर, भुसावळ, अकोला, यवतमाळसह बीड, नांदेड मार्गावरही शिवशाही बस चालविण्यात येत आहे. सिडको बसस्थानकातून रात्री ११.३० वाजता मुंबईसाठी शिवशाही बस सुटते. या बसचे ६४९ रुपये प्रवासभाडे आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सायंकाळी ५.३० वाजता औरंगाबाद-बोरिवली या मार्गावर शिवशाही बस धावते. या दोन बसचा प्रवाशांना आधार मिळतो. इतर विभागातील काही बस धावतात; परंतु त्या बस आधीच प्रवाशांच्या गर्दीने भरून येतात. 

खाजगी बस ‘सुसाट’च्रेल्वेतील गर्दी आणि ‘एसटी’च्या परिस्थितीने प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी खाजगी बसचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी ८०० ते १२००  रुपयांपर्यंत तिकीट दर देण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढावते. एकट्या औरंगाबादेतून मुंबईतून दररोज ३० खाजगी बस धावतात. यातून दररोज किमान ९०० जण प्रवास करतात.  

मागणी यावीमुंबई बससाठी फार मागणी नाही. प्रवाशांची मागणी आली तर लगेच शिवशाही बस सुरू केली जाईल, असे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी म्हणाले.

वेगवेगळे दरशहरातून मुंबईसाठी ३० ट्रॅव्हल्स बस धावतात. वेगवेगळ्या बसचे वेगवगळे दर आहेत. ८०० पासून १२०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते, अशी माहिती औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे अध्यक्ष राजन हौजवाला यांनी दिली.

प्रवासी म्हणतात...मुंबईला नियमितपणे ये-जा करावी लागते. मुंबई मार्गावर शिवशाही बस वाढवल्या जातील, अशी अपेक्षा होती; परंतु तसे होताना दिसत नाही. जी बस आहे, त्यामध्ये जागा मिळण्याची शाश्वती नसते. त्यामुळे खाजगी बसचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. मुंबईसाठी शिवशाही बसची संख्या वाढली तर खाजगी बसकडे जाण्याचे टाळता येईल, असे एका प्रवाशाने सांगितले.

टॅग्स :state transportएसटीShivshahiशिवशाहीpassengerप्रवासीAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानक