शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

औरंगाबाद लोकसभेसाठी नवीन चेहरा द्या; आमदार जाधव यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:13 PM

औरंगाबाद लोकसभेसाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमागील काही वर्षांपासून खैरे आणि जाधव यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभेसाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. सर्वसामान्य जनतेत खा. खैरे यांच्याबाबतीत प्रचंड असंतोष आहे. शहरातील कचरा प्रकरण, पाणीपुरवठ्याची समस्या खैरे मनपाच्या केंद्रस्थळी असताना सोडवू शकले नाहीत. शिवाय त्यांच्या मतदारसंघात त्यांनी विकासनिधीत गैरव्यवहार केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे, असेही आ. जाधव यांनी पत्रात म्हटले आहे.

मागील काही वर्षांपासून खैरे आणि जाधव यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. पक्षप्रमुख ठाकरे यांच्या मध्यस्थीने ते मतभेद मिटविण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला; परंतु जिल्हा नियोजन समितीच्या निधीत झालेल्या कपातीमुळे पुन्हा आ.जाधव यांनी खा. खैरे हे विकासकामांच्या आड येत असल्याचा आरोप केला आहे.

१९ व २० एप्रिल रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही पदाधिकाऱ्यांची औरंगाबादेत बैठक घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आ. जाधव यांनी औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीवरून वाचा फोडली आहे. त्यावर पक्षप्रमुख ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे ‘इच्छुक नवीन चेहऱ्यां’चे लक्ष लागले आहे. दरम्यान खा. खैरे पक्षप्रमुख आपल्याऐवजी आ. जाधव यांच्याबाबतीत निर्णय घेतील, असे बोलत आहेत. जाधव यांचा बोलविता धनी अन्य कुणीतरी असल्याचे त्यांचे मत आहे. जाधव हे वारंवार खा. खैरे यांना लक्ष्य करीत असल्यामुळे या दोघांच्या वादावर पक्षप्रमुख काय तोडगा काढतात ते लवकरच कळेल. 

आ. जाधव यांनी पत्रात म्हटले आहे, कन्नड-सोयगाव मतदारसंघात कृउबा, नगरपालिका, पंचायत समिती, जि.प.मध्ये मला एकही उमेदवारी दिली नाही, त्यामुळे विकास आघाडी स्थापन करावी लागली. आघाडीची मते आणि शिवसेनेला मिळालेली मते यातून सर्व काही स्पष्ट होते. जि.प.निवडणुकीत माझ्या पत्नीच्या विरोधात प्रचार केला. आता त्यांच्यासाठी मी लोकसभेत मतदान मागायला कसे जाऊ हा मोठा प्रश्न आहे. खैरे शिवसेना नेते आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवावे. मात्र, त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये. उमेदवारी दिल्यास धोका होऊ शकतो, असा सल्लाही त्यांनी पक्षप्रमुखांना दिला आहे. 

शिवसेनेचे नुकसान खैरेंमुळेचजिल्ह्यात शिवसेनेचे नुकसान खैरेंमुळेच होत आहे. वैजापूर निवडणुकीत देखील साठ्या-लोट्याचे राजकारण त्यांनी केले. शहर अनेक समस्यांनी ग्रासले असताना त्यांना त्यावर उपाय काढता आला नाहीत. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी औरंगाबाद मनपा खेळ करीत आहे. समस्येने उग्ररूप धारण केलेले आहे. खा. खैरे केंद्रस्थानी असताना त्यांना मागील २० वर्षांत शहरासाठी काहीही करता आलेले नाही, असे आरोप आ. जाधव यांनी पत्रात केले आहेत.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवElectionनिवडणूक