शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी; भागवत कराड यांना अर्थ राज्यमंत्रीपद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 13:36 IST

Dr. Bhagwat Karad is new Minister of State for Finance : डॉ. भागवत कराड आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती; मात्र त्यामध्ये डॉ. कराड यांनी बाजी मारली.

ठळक मुद्दे जात आणि शिक्षण घटक ठरले महत्त्वाचे शहराच्या आगामी काळातील योजनांच्या दृष्टीने लाभदायक

- नजीर शेख

औरंगाबाद: दोन वेळा शहराचे महापौरपद भुषविलेले आणि अवघ्या सव्वा वर्षांपूर्वी राज्यसभेचे खासदार झालेले डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर अवघ्या सव्वा वर्षाच्या कालावधीत डॉ. कराड यांना मिळालेले मंत्रिपद ही आश्चर्यजनक बाब असली तरी मागील काही दिवसांत त्यांनी पक्षासोबत ठेवलेली बांधीलकी आणि विशेष करून राज्यातील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधलेली जवळीक त्यांच्या कामी आल्याचे दिसते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मराठवाड्यातून एकाची वर्णी लागणार, याची चर्चा मागील काही दिवसांपासून होती. डॉ. कराड आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती; मात्र त्यामध्ये डॉ. कराड यांनी बाजी मारली. सरळसाधे वाटणारे डॉ. कराड हे चाणाक्षही असल्याची प्रचिती यामुळे आली. ( Cabinet Reshuffel :Aurangabad gets first chance in Union Cabinet) 

औरंगाबादच्या दृष्टीने डॉ. कराड यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा शहराच्या आगामी काळातील योजनांच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. औरंगाबादचे खासदार म्हणून आतापर्यंत चंद्रकांत खैरे यांनी चार वेळा खासदारपद भूषविले; मात्र तरीही त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकला नाही. ६५ वर्षीय डॉ. कराड यांची नगरसेवक ते खासदार (व्हाया महापौर) आणि आता केंद्रीय मंत्री अशी २४ वर्षांची कारकीर्द आहे. मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन असलेल्या डॉ. कराड यांनी १९९५ साली नगरसेवक होण्याआधी लायन्स क्लबच्या माध्यमातून आपले सामाजिक काम सुरू ठेवले होते. त्याचा फायदा त्यांना नगरसेवक होण्यामध्ये झाला. त्यानंतर १९९६ साली ते भाजपमध्ये आले आणि तिथून त्यांची राजकीय कारकीर्द आणखी बहरत गेली. गरिबी पाहिलेला आणि कोणताही अभिनिवेष नसलेला नेता म्हणून डॉ. कराड यांची ख्याती आहे. एक डॉक्टर, उद्योजक, संघटक आणि सामाजिक कार्यकर्ता अशा विविध अंगांनी त्यांच्या कारकीर्दीकडे पाहिले जावू शकते. कुणाविषयीही कटूता बाळगायची नाही, या त्यांच्या गुणाचा त्यांना राजकारणात मोठा फायदाच झालेला आहे. यामुळेच औरंगाबाद शहराचे दोन वेळा महापौरपद त्यांना भूषविता आले.

गोपीनाथ मुंडेंचे सहकार्यऔरंगाबामध्ये एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व राहिले असताना दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांनी पक्षविस्ताराच्या दृष्टीने डॉ. कराड यांना पक्षात आणले. मुंडे यांच्या आशीर्वादामुळे ते दोन वेळा महापौरही झाले. गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर डाॅ. कराड यांनी पंकजा मुंडे यांना नेता मानले. पंकजा राज्यात मंत्री असताना डॉ. कराड त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचे चित्र होते; मात्र २०२० साली पंकजा यांनी औरंगाबादमध्ये स्वकीयांविरुद्ध जो एल्गार पुकारला त्यानंतर पंकजा पक्षापासून काहीशा दूर झाल्या. याचवेळी राजकीय दिशा डाॅ. कराड यांनी ओळखली आणि राज्यात भाजपमध्ये प्रभावी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढविली आणि त्याचा पुरेपूर फायदाही त्यांना झाला. भाजपमधून वंजारी समाजाच्या नेत्याला संधी द्यायची झाल्यास मुंडेंच्या घरात द्यायची नाही, या भाजपच्या राज्यातील नेत्यांनी घेतलेल्या धोरणाचाही डॉ. कराड यांना फायदा झाल्याचे दिसते.

जात आणि शिक्षण घटक ठरले महत्त्वाचेडॉ. कराड यांना मंत्रिपद मिळण्यामध्ये जात आणि त्यांचे वैद्यकीय उच्च शिक्षण हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे ठरले. मराठवाड्यातून ओबीसी घटकाला आणि विशेष करून वंजारी समाजाला प्रतिनिधीत्त्व देण्यासंदर्भाने भाजपमध्ये विचार झाल्यानंतर खा. प्रीतम मुंडे यांना डावलून डॉ. कराड यांना संधी देण्यात आली. शिवाय कोरोना काळात त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा व्हावा, या हेतूने त्यांची वर्णी लागली आहे.

मुलांचे डॉक्टर ते देशाचे केंद्रीय मंत्री

- औरंगाबादचे पेडियाट्रिक सर्जन असलेले डॉ. भागवत कराड यांनी १८ मार्च २०२० रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

- १६ जुलै १९५६ रोजी जन्मलेले डॉ. कराड हे १९७७ साली एमबीबीएस झाले. वाढदिवसाची ही जणू त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गिफ्टच मिळाली.

- एप्रिल २००० ते ऑक्टोबर २००१ आणि नोव्हेंबर २००६ ते ऑक्टोबर २००७ या काळात त्यांना महापौरपद भूषवण्याचा मान मिळाला. १९९७-९८ या काळात ते उपमहापौर होते. तीनदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले.

- २०१८ मध्ये डॉ. भागवत कराड हे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बनले. अद्याप या मंडळावर नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली नाही.

- २००१ ते २००४ या काळात डॉ. भागवत कराड हे औरंगाबाद शहर भाजपचे अध्यक्ष होते. २०१० ते १३ या काळात भाजपच्या भटक्या विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१४ ते २०२० या काळात ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष व सचिव बनले.

- चिकलठाणा लायन्स क्लब, भारतीय बाल रोग अकादमी, आएमए यासारख्या संस्थांवर त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार