औरंगाबाद - औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नाने हिंसक वळण घेतले असून मिटमटा, पडेगावात कचरा टाकायला आलेल्या गाडयांवर स्थानिकांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत दोन गाडयांची तोडफोड झाली असून पाच ते सहा पोलीस जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आल. (सविस्तर वृत्त लवकरच)
औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला, गाडया फोडल्या, पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 16:16 IST