शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

औरंगाबाद : हनुमान मंदिर कलश मिरवणुकीवर मुस्लीम बांधवांकडून पुष्पवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 11:44 IST

औरंगाबादच्या लाडसावंगी येथील सामाजिक सौहार्दाचे उदाहरण

लाडसावंगी (जि. औरंगाबाद) : राज्यात सुरू असलेल्या भोंगावादाचा ग्रामीण भागात मात्र कुठलाही परिणाम दिसत नाही. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी येथेही सामाजिक सौहार्द जपण्याची एक घटना गुरुवारी घडली. गावातील हनुमान मंदिराच्या कलशारोहण समारंभासाठी निघालेल्या मिरवणुकीवर गावातील मुस्लीम समाजबांधवांनी पुष्पवृष्टी करून एकतेचा संदेश दिला.

राज्यात मशिदींमध्ये होणाऱ्या अजानविरोधात मशिदींसमोर हनुमान चालीसा लावा, असा आदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र ग्रामीण भागातील वातावरणावर याचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. लाडसावंगी गावात हनुमान मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला. नव्याने बांधलेल्या मंदिरात ५ ते ७ मे दरम्यान धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात गुरुवारी सकाळी गावात रथामधून कलश मिरवणूक काढण्यात आली. 

सकाळी नऊच्या सुमारास  मिरवणूक गावातील मुस्लीम बागवान गल्लीत आली असता, मिरवणुकीवर हाजी अहेमद शेख, फेरोज बागवान, कलीम शेख, डॉ. अकबर शेख, सलीम शेख, आरेफ बागवान, जफर बागवान, अल्ताफ बेग, अफजल शेख, समीर सय्यद, आदींनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणूक सुरू असताना मुस्लीम गल्लीत अचानक झालेल्या पुष्पवृष्टीने भाविकही आनंदित झाले. मंदिरात शुक्रवारी कलश स्थापना व शनिवारी नंदी प्राणप्रतिष्ठा करून महाप्रसाद व नंतर रात्री आठ वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे कीर्तन होणार आहे.

एकमेकांच्या सुखदु:खांत होतात सहभागीलाडसावंगी हे गाव औरंगाबाद तालुक्यात मोठे असून हिंदू व मुस्लीम यांची संख्या मोठी आहे; परंतु या गावात आजपर्यंत कधीही धार्मिक तणाव निर्माण झाला नाही. उलट एकमेकांच्या सुखदु:खांत सर्वजण सहभागी होतात. बाहेर कुठेही तणाव निर्माण झाला तरी, गावात याचा कधीही, काहीही परिणाम जाणवत नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद