शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबाद डीपीसीच्या निधीत कपातीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:41 IST

जिल्हा नियोजन समितीसाठी तरतूद केलेल्या निधीमध्ये यंदाही ३० टक्के कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चालू आर्थिक वर्षासाठी २७३ कोटींपैकी १५६ कोटींचा निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे.

ठळक मुद्दे२७३ पैकी १५६ कोटींना मंजुरी : कामांना उशीर होणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीसाठी तरतूद केलेल्या निधीमध्ये यंदाही ३० टक्के कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चालू आर्थिक वर्षासाठी २७३ कोटींपैकी १५६ कोटींचा निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे. उर्वरित निधी केव्हा मिळणार, याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मंगळवारी डीपीसी खर्चाच्या अनुषंगाने बैठक घेऊन आढावा घेतला. यावर्षी कपात होऊनच निधी आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.डीपीसीचा निधी खर्च करताना प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण, पाणी, आरोग्य व रोजगार या विषयावर भर द्यावा, अशा वित्त व नियोजन विभागाने सूचना केल्या आहेत. २७३ कोटी रुपयांचा नियतव्यय समोर ठेवून वर्कआॅर्डर दिल्या आणि निधीमध्ये कपात झाली तरी शिल्लक कामे (स्पील ओव्हर) वाढतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी २४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. १०० टक्के निधी खर्च झाल्याचा दावा नियोजन विभागाने केला आहे. गेल्या वर्षी ३० टक्के निधी कपात केल्यानंतर अनेकदा कामांवर गदा आली होती. शिल्लक कामांची यादी वाढली होती. शासनाने कपात केलेला ३० टक्के निधी ओरड झाल्यामुळे अदा करण्यात आला. त्यामुळे अनेक कामे मार्गी लागली. जिल्हा परिषदेला २ वर्षांची मुदत असल्यामुळे त्यांना देण्यात येणारे अनुदान मुदतीत देण्याचा मुद्दा नाही, असे सूत्रांनी सांगितले.मार्च २०१९ पूर्वी जि.प. खर्चाच्या नियोजन अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. पुढील वर्षी निवडणुका असल्यामुळे यावर्षी मंजूर झालेला पूर्ण निधी शासनाकडून वितरित होईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.शाळा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण, पाणीपुरवठा यांच्यासह अपंगांचे अर्ज, घरकुलाचे काम या मूलभूत गोष्टींना वेळेत पूर्णत्वास नेण्यास निधीची गरज पडणार आहे. शासनाने निधी देऊनही ३ ते ४ वर्षांपासून वरील कामे होत नाहीत. ही गती मुंगीच्या पावलांसारखी असल्याचे ताशेरे सत्ताधाºयांनीच मध्यंतरी नियोजन बैठकीत ओढले होते. औरंगाबाद २४४ कोटी ७५ लाख शासन मर्यादा होती. जिल्हाधिकाºयांनी ३५६ कोटी ६१ लाख रुपयांचा अतिरिक्त निधीची मागणी केली होती.बैठक पुढच्या महिन्यातजिल्हा नियोजन समितीची बैठक जून महिन्याच्या दुसºया आठवड्यात होणे शक्य आहे. डीपीसी सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे ते १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. सभागृहाचे काम मुदतीत संपले, तर १५ जूननंतर डीपीसीची बैठक होईल.

टॅग्स :District Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबादAurangabadऔरंगाबाद