शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

हगणदारीमुक्त औरंगाबाद जिल्हा केवळ कागदावरच; प्रशासनाकडून स्वत:च्या हाताने पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 20:13 IST

अनेक गावांत प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधूनच जावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

- विजय सरवदे 

औरंगाबाद : जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली असून, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा गवगवा केला जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच दिसून येत आहे. आजही जिल्ह्यातील अनेक गावांत प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधूनच जावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण राज्य हगणदारीमुक्त करण्याचे वचन केंद्र सरकारला दिले. त्यानुसार सर्व पंचायतराज संस्था व महानगरपालिकांना जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालये उभारणीवर भर देण्यात आला. यासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदानही उपलब्ध झाले. २०१२ मध्ये झालेल्या आधारभूत (बेसलाईन) सर्वेक्षणानुसार आतापर्यंत जिल्ह्यात साडेतीन लाख शौचालये उभारण्यात आले आहेत. आधारभूत सर्वेक्षणाच्या वेळी जे गावांमध्ये हजर नव्हते, जे मोलमजुरीसाठी स्थलांतरित झाले होते, राजकीय द्वेषापोटी काहींची नावे सर्वेक्षणात नमूद करण्यात आलेली नव्हती किंवा बेसलाईन सर्वेक्षणानंतर विभक्त झालेल्या कुटुंबांना शौचालय उभारण्याची रोहयोच्या माध्यमातून संधी देण्यात आली.  

तथापि, मुख्यमंत्र्यांकडून पाठ थोपटून घेण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्तांपासून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २ आॅक्टोबर २०१७ रोजी जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा जुंपली. जे ग्रामसेवक अथवा गटविकास अधिकारी शौचालयांच्या बांधकामांमध्ये कमी पडतील, त्यांना कारवाईचा बडगा दाखविण्यात आला. कारवाईच्या भीतीने मग ग्रामसेवकांनी शौचालये बांधकामांचा बोगस अहवाल प्रशासनाला सादर केला. आजही अनेक गावांमध्ये उघड्यावरच विधि उरकला जातो. दुरून दुर्गंधी आली की गाव जवळ आले, असे समजावे. जिल्ह्यात वैयक्तिक शौचालयांचा किती वापर होतो, हा संशोधनाचा विषय ठरेल. संपूर्ण जिल्हा पाणीटंचाईने होरपळून निघाला आहे. या परिस्थितीत शौचालयांसाठी पाण्याचा वापर कोण करणार. दुसरीकडे, ६ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार लाभधारकांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान गटविकास अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात पडून होते. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिवांनी स्वत: औरंगाबादेत येऊन याचा आढावा घेतला. तेव्हा जिल्हा परिषदेच्या संपूर्ण यंत्रणेचे धाबे दणाणले. 

सध्या गटविकास अधिकारी किंवा त्यांचे दूत, ग्रामसेवक, जिल्हा परिषदेतील स्वच्छता कक्षाचे कर्मचारी गावागावांत जाऊन अनुदान वाटपासाठी लाभार्थ्यांचा शोध घेत आहेत. जे लाभार्थी गावात आढळून येत नाहीत, त्यांना स्थलांतरित म्हणून जाहीर केले जात आहे. अशा लाभार्थ्यांची नावे वगळण्याच्या (डिलिट) यादीत घेतली जात आहेत. मात्र, आज ही वेळ केवळ हगणदारीमुक्त जिल्हा करण्याची घाई झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी शौचालयांची बोगस यादी केल्यामुळे ग्रामसेवकांवर आल्याचे ग्रामसेवकांमध्ये खाजगीत बोलले जात आहे. दरम्यान, गावांमध्ये आढळून न येणाऱ्या ग्राहकांची नावे वगळण्यासाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची लवकरच परवानगी घेतली जाणार आहे. 

लोकांमध्ये जागृती आली आहेयासंदर्भात जि.प.तील स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राम लाहोटी म्हणाले की, पाणीटंचाई असली तरी ग्रामीण भागात शौचालयांचा बऱ्यापैकी वापर सुरू असल्याचा ग्रामसेवकांकडून अहवाल येत आहे. लोकांमध्ये शौचालय वापराबाबत बऱ्यापैकी जागृती आली आहे. बेसलाईन सर्वेक्षणामध्ये ज्यांची नावे आलेली नव्हती, अशा ५० हजार नागरिकांना शौचालय बांधकामाचा लाभ दिला जाणार आहे. शौचालयांचे अनुदान जवळपास वाटप होत आले आहे. काही नागरिक गावात आढळून येत नाहीत, त्यांची नावे वगळण्याबाबत शासनाकडून परवानगी घेतली जाणार आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानState Governmentराज्य सरकार