शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

हगणदारीमुक्त औरंगाबाद जिल्हा केवळ कागदावरच; प्रशासनाकडून स्वत:च्या हाताने पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 20:13 IST

अनेक गावांत प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधूनच जावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

- विजय सरवदे 

औरंगाबाद : जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली असून, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा गवगवा केला जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच दिसून येत आहे. आजही जिल्ह्यातील अनेक गावांत प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधूनच जावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण राज्य हगणदारीमुक्त करण्याचे वचन केंद्र सरकारला दिले. त्यानुसार सर्व पंचायतराज संस्था व महानगरपालिकांना जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालये उभारणीवर भर देण्यात आला. यासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदानही उपलब्ध झाले. २०१२ मध्ये झालेल्या आधारभूत (बेसलाईन) सर्वेक्षणानुसार आतापर्यंत जिल्ह्यात साडेतीन लाख शौचालये उभारण्यात आले आहेत. आधारभूत सर्वेक्षणाच्या वेळी जे गावांमध्ये हजर नव्हते, जे मोलमजुरीसाठी स्थलांतरित झाले होते, राजकीय द्वेषापोटी काहींची नावे सर्वेक्षणात नमूद करण्यात आलेली नव्हती किंवा बेसलाईन सर्वेक्षणानंतर विभक्त झालेल्या कुटुंबांना शौचालय उभारण्याची रोहयोच्या माध्यमातून संधी देण्यात आली.  

तथापि, मुख्यमंत्र्यांकडून पाठ थोपटून घेण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्तांपासून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २ आॅक्टोबर २०१७ रोजी जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा जुंपली. जे ग्रामसेवक अथवा गटविकास अधिकारी शौचालयांच्या बांधकामांमध्ये कमी पडतील, त्यांना कारवाईचा बडगा दाखविण्यात आला. कारवाईच्या भीतीने मग ग्रामसेवकांनी शौचालये बांधकामांचा बोगस अहवाल प्रशासनाला सादर केला. आजही अनेक गावांमध्ये उघड्यावरच विधि उरकला जातो. दुरून दुर्गंधी आली की गाव जवळ आले, असे समजावे. जिल्ह्यात वैयक्तिक शौचालयांचा किती वापर होतो, हा संशोधनाचा विषय ठरेल. संपूर्ण जिल्हा पाणीटंचाईने होरपळून निघाला आहे. या परिस्थितीत शौचालयांसाठी पाण्याचा वापर कोण करणार. दुसरीकडे, ६ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार लाभधारकांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान गटविकास अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात पडून होते. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिवांनी स्वत: औरंगाबादेत येऊन याचा आढावा घेतला. तेव्हा जिल्हा परिषदेच्या संपूर्ण यंत्रणेचे धाबे दणाणले. 

सध्या गटविकास अधिकारी किंवा त्यांचे दूत, ग्रामसेवक, जिल्हा परिषदेतील स्वच्छता कक्षाचे कर्मचारी गावागावांत जाऊन अनुदान वाटपासाठी लाभार्थ्यांचा शोध घेत आहेत. जे लाभार्थी गावात आढळून येत नाहीत, त्यांना स्थलांतरित म्हणून जाहीर केले जात आहे. अशा लाभार्थ्यांची नावे वगळण्याच्या (डिलिट) यादीत घेतली जात आहेत. मात्र, आज ही वेळ केवळ हगणदारीमुक्त जिल्हा करण्याची घाई झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी शौचालयांची बोगस यादी केल्यामुळे ग्रामसेवकांवर आल्याचे ग्रामसेवकांमध्ये खाजगीत बोलले जात आहे. दरम्यान, गावांमध्ये आढळून न येणाऱ्या ग्राहकांची नावे वगळण्यासाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची लवकरच परवानगी घेतली जाणार आहे. 

लोकांमध्ये जागृती आली आहेयासंदर्भात जि.प.तील स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राम लाहोटी म्हणाले की, पाणीटंचाई असली तरी ग्रामीण भागात शौचालयांचा बऱ्यापैकी वापर सुरू असल्याचा ग्रामसेवकांकडून अहवाल येत आहे. लोकांमध्ये शौचालय वापराबाबत बऱ्यापैकी जागृती आली आहे. बेसलाईन सर्वेक्षणामध्ये ज्यांची नावे आलेली नव्हती, अशा ५० हजार नागरिकांना शौचालय बांधकामाचा लाभ दिला जाणार आहे. शौचालयांचे अनुदान जवळपास वाटप होत आले आहे. काही नागरिक गावात आढळून येत नाहीत, त्यांची नावे वगळण्याबाबत शासनाकडून परवानगी घेतली जाणार आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानState Governmentराज्य सरकार