शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

हगणदारीमुक्त औरंगाबाद जिल्हा केवळ कागदावरच; प्रशासनाकडून स्वत:च्या हाताने पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 20:13 IST

अनेक गावांत प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधूनच जावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

- विजय सरवदे 

औरंगाबाद : जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली असून, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा गवगवा केला जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच दिसून येत आहे. आजही जिल्ह्यातील अनेक गावांत प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधूनच जावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण राज्य हगणदारीमुक्त करण्याचे वचन केंद्र सरकारला दिले. त्यानुसार सर्व पंचायतराज संस्था व महानगरपालिकांना जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालये उभारणीवर भर देण्यात आला. यासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदानही उपलब्ध झाले. २०१२ मध्ये झालेल्या आधारभूत (बेसलाईन) सर्वेक्षणानुसार आतापर्यंत जिल्ह्यात साडेतीन लाख शौचालये उभारण्यात आले आहेत. आधारभूत सर्वेक्षणाच्या वेळी जे गावांमध्ये हजर नव्हते, जे मोलमजुरीसाठी स्थलांतरित झाले होते, राजकीय द्वेषापोटी काहींची नावे सर्वेक्षणात नमूद करण्यात आलेली नव्हती किंवा बेसलाईन सर्वेक्षणानंतर विभक्त झालेल्या कुटुंबांना शौचालय उभारण्याची रोहयोच्या माध्यमातून संधी देण्यात आली.  

तथापि, मुख्यमंत्र्यांकडून पाठ थोपटून घेण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्तांपासून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २ आॅक्टोबर २०१७ रोजी जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा जुंपली. जे ग्रामसेवक अथवा गटविकास अधिकारी शौचालयांच्या बांधकामांमध्ये कमी पडतील, त्यांना कारवाईचा बडगा दाखविण्यात आला. कारवाईच्या भीतीने मग ग्रामसेवकांनी शौचालये बांधकामांचा बोगस अहवाल प्रशासनाला सादर केला. आजही अनेक गावांमध्ये उघड्यावरच विधि उरकला जातो. दुरून दुर्गंधी आली की गाव जवळ आले, असे समजावे. जिल्ह्यात वैयक्तिक शौचालयांचा किती वापर होतो, हा संशोधनाचा विषय ठरेल. संपूर्ण जिल्हा पाणीटंचाईने होरपळून निघाला आहे. या परिस्थितीत शौचालयांसाठी पाण्याचा वापर कोण करणार. दुसरीकडे, ६ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार लाभधारकांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान गटविकास अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात पडून होते. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिवांनी स्वत: औरंगाबादेत येऊन याचा आढावा घेतला. तेव्हा जिल्हा परिषदेच्या संपूर्ण यंत्रणेचे धाबे दणाणले. 

सध्या गटविकास अधिकारी किंवा त्यांचे दूत, ग्रामसेवक, जिल्हा परिषदेतील स्वच्छता कक्षाचे कर्मचारी गावागावांत जाऊन अनुदान वाटपासाठी लाभार्थ्यांचा शोध घेत आहेत. जे लाभार्थी गावात आढळून येत नाहीत, त्यांना स्थलांतरित म्हणून जाहीर केले जात आहे. अशा लाभार्थ्यांची नावे वगळण्याच्या (डिलिट) यादीत घेतली जात आहेत. मात्र, आज ही वेळ केवळ हगणदारीमुक्त जिल्हा करण्याची घाई झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी शौचालयांची बोगस यादी केल्यामुळे ग्रामसेवकांवर आल्याचे ग्रामसेवकांमध्ये खाजगीत बोलले जात आहे. दरम्यान, गावांमध्ये आढळून न येणाऱ्या ग्राहकांची नावे वगळण्यासाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची लवकरच परवानगी घेतली जाणार आहे. 

लोकांमध्ये जागृती आली आहेयासंदर्भात जि.प.तील स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राम लाहोटी म्हणाले की, पाणीटंचाई असली तरी ग्रामीण भागात शौचालयांचा बऱ्यापैकी वापर सुरू असल्याचा ग्रामसेवकांकडून अहवाल येत आहे. लोकांमध्ये शौचालय वापराबाबत बऱ्यापैकी जागृती आली आहे. बेसलाईन सर्वेक्षणामध्ये ज्यांची नावे आलेली नव्हती, अशा ५० हजार नागरिकांना शौचालय बांधकामाचा लाभ दिला जाणार आहे. शौचालयांचे अनुदान जवळपास वाटप होत आले आहे. काही नागरिक गावात आढळून येत नाहीत, त्यांची नावे वगळण्याबाबत शासनाकडून परवानगी घेतली जाणार आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानState Governmentराज्य सरकार