शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

औरंगाबादचे जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या बदलीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:37 IST

जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची सोमवारी बदली करण्यात आली होती. बदलीला शासनाने मंगळवारी स्थगिती दिली असून, नवीन जिल्हाधिकारी कोण? याबाबत सध्या तरी कुणाचेही नाव पुढे आलेले नाही.

ठळक मुद्देमहसूल प्रशासन : प्रभारी जिल्हाधिकारीपदी पी. एल. सोरमारे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची सोमवारी बदली करण्यात आली होती. बदलीला शासनाने मंगळवारी स्थगिती दिली असून, नवीन जिल्हाधिकारी कोण? याबाबत सध्या तरी कुणाचेही नाव पुढे आलेले नाही. जिल्हा प्रशासनाचा प्रभारी कारभार अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांच्याकडे देण्यात आला आहे. कर्नाटक निवडणुकीमुळे चव्हाण यांच्या बदलीला स्थगिती दिल्याची चर्चा आहे.ठाणे मनपा आयुक्तांनी कार्यमुक्त करताच पदभार घेणार असल्याचे चव्हाण यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना सांगितले होते. त्याचवेळी शंकेची पाल चुकचुकली होती. ठाणे मनपा आयुक्तांनी त्यांना कार्यमुक्त केले नाही की त्यांनी बदली रोखण्यासाठी प्रयत्न केले, हे सांगता येत नाही. मंगळवारी दिवसभर त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी काही फोन घेतला नाही. दुपारनंतर त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाल्याचे आदेश येऊन धडकले.मागील तीन-चार वर्षांपासून वर्षभराच्या आतच जिल्हाधिकारी औरंगाबादेतून बदली करून घेत आहेत. येथून बदली करून गेलेले अथवा बदली झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळते आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल कुमार हे पुण्यात बदलून गेले. विक्रमकुमार हे डीएमआयसीचे एमडी म्हणून पदोन्नतीने मुंबईत गेले. त्यानंतर आलेले वीरेंद्रसिंह हे तीन महिन्यांतच मंत्रालयात रुजू झाले. निधी पांडे यांची राजीव गांधी आरोग्य योजनेच्या सीईओपदी वर्णी लागली. त्यानंतर एन.के. राम यांची पुणे जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली. म्हणजे औरंगाबादेत वर्ष-दीड वर्ष काम करायचे आणि मोठ्या जिल्ह्यांत बदलून जायचे, असा ‘ट्रेंड’ मागील काही वर्षांपासून महसूल प्रशासनात आला आहे. तीन वर्षे एकाच ठिकाणी काम करण्याच्या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन होतच आहे, शिवाय दुसरीकडे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा व मराठवाड्याची राजधानी असलेला हा जिल्हा दुर्लक्षित होत आहे.स्थगिती आणि प्रभारीपदांचा खेळजानेवारी महिन्यांत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची मंत्रालयात बदली झाली होती. त्यालाही शासनाने २४ तासांत स्थगिती दिली. जिल्हाधिकारीपदी चव्हाण यांची बदली केली; परंतु २४ तासांतच त्यांच्याही बदलीला स्थगिती आदेश मिळाला. कचरा प्रकरणातून १६ मार्च रोजी मनपा आयुक्तांची बदली झाली; परंतु पालिका आयुक्तपदी कुणीही दिले नाही. दरम्यान याच काळात पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविले. नवीन पोलीस आयुक्तांची नेमणूक केली नाही. मनपा आणि पोलीस आयुक्त पदांची जबाबदारी प्रभारींवर आहे. त्यातच आता जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी प्रभारींवर येऊन पडली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीAurangabadऔरंगाबादTransferबदली