शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबादचे जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या बदलीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:37 IST

जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची सोमवारी बदली करण्यात आली होती. बदलीला शासनाने मंगळवारी स्थगिती दिली असून, नवीन जिल्हाधिकारी कोण? याबाबत सध्या तरी कुणाचेही नाव पुढे आलेले नाही.

ठळक मुद्देमहसूल प्रशासन : प्रभारी जिल्हाधिकारीपदी पी. एल. सोरमारे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची सोमवारी बदली करण्यात आली होती. बदलीला शासनाने मंगळवारी स्थगिती दिली असून, नवीन जिल्हाधिकारी कोण? याबाबत सध्या तरी कुणाचेही नाव पुढे आलेले नाही. जिल्हा प्रशासनाचा प्रभारी कारभार अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांच्याकडे देण्यात आला आहे. कर्नाटक निवडणुकीमुळे चव्हाण यांच्या बदलीला स्थगिती दिल्याची चर्चा आहे.ठाणे मनपा आयुक्तांनी कार्यमुक्त करताच पदभार घेणार असल्याचे चव्हाण यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना सांगितले होते. त्याचवेळी शंकेची पाल चुकचुकली होती. ठाणे मनपा आयुक्तांनी त्यांना कार्यमुक्त केले नाही की त्यांनी बदली रोखण्यासाठी प्रयत्न केले, हे सांगता येत नाही. मंगळवारी दिवसभर त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी काही फोन घेतला नाही. दुपारनंतर त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाल्याचे आदेश येऊन धडकले.मागील तीन-चार वर्षांपासून वर्षभराच्या आतच जिल्हाधिकारी औरंगाबादेतून बदली करून घेत आहेत. येथून बदली करून गेलेले अथवा बदली झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळते आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल कुमार हे पुण्यात बदलून गेले. विक्रमकुमार हे डीएमआयसीचे एमडी म्हणून पदोन्नतीने मुंबईत गेले. त्यानंतर आलेले वीरेंद्रसिंह हे तीन महिन्यांतच मंत्रालयात रुजू झाले. निधी पांडे यांची राजीव गांधी आरोग्य योजनेच्या सीईओपदी वर्णी लागली. त्यानंतर एन.के. राम यांची पुणे जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली. म्हणजे औरंगाबादेत वर्ष-दीड वर्ष काम करायचे आणि मोठ्या जिल्ह्यांत बदलून जायचे, असा ‘ट्रेंड’ मागील काही वर्षांपासून महसूल प्रशासनात आला आहे. तीन वर्षे एकाच ठिकाणी काम करण्याच्या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन होतच आहे, शिवाय दुसरीकडे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा व मराठवाड्याची राजधानी असलेला हा जिल्हा दुर्लक्षित होत आहे.स्थगिती आणि प्रभारीपदांचा खेळजानेवारी महिन्यांत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची मंत्रालयात बदली झाली होती. त्यालाही शासनाने २४ तासांत स्थगिती दिली. जिल्हाधिकारीपदी चव्हाण यांची बदली केली; परंतु २४ तासांतच त्यांच्याही बदलीला स्थगिती आदेश मिळाला. कचरा प्रकरणातून १६ मार्च रोजी मनपा आयुक्तांची बदली झाली; परंतु पालिका आयुक्तपदी कुणीही दिले नाही. दरम्यान याच काळात पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविले. नवीन पोलीस आयुक्तांची नेमणूक केली नाही. मनपा आणि पोलीस आयुक्त पदांची जबाबदारी प्रभारींवर आहे. त्यातच आता जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी प्रभारींवर येऊन पडली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीAurangabadऔरंगाबादTransferबदली