शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 13:07 IST

जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे२०१० मध्ये ५ लाख वाहनेजिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची भर पडत असून, यामध्ये दुचाकी वाहनांचे सर्वाधिक प्रमाण आहे. जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे.

आरटीओ कार्यालयातर्फे ४ ते १० फेब्रुवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी आरटीओ कार्यालयात होणाºया नव्या वाहनांच्या नोंदणीविषयी माहिती दिली. जिल्ह्यात मार्च २०१८ पर्यंत १२ लाख ८७ हजार ५८८ वाहने होती. गेल्या दहा महिन्यांत ८० हजार नव्या वाहनांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक  ६३ हजार ४७९ नव्या दुचाकींची नोंद झाली असून,  महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची नोंद होत असल्याचे दिसते.

शहराबरोबर ग्रामीण भागात दुचाकी खरेदीला अधिक प्राधान्य  आहे. सण, उत्सवाच्या कालावधीत सर्वाधिक वाहन खरेदी होते. गेल्या काही वर्षांत शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी वाहन खरेदीकडे ओढा वाढत गेला. काही दिवसांपूर्वीच स्मार्ट सिटी बससेवेला सुरुवात झाली आहे. सिटी बसचा अधिकाधिक वापर केल्यास वाढत्या वाहन संख्येवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

२०१० मध्ये ५ लाख वाहनेजिल्ह्यातील वाहनांची संख्या २०१० मध्ये ५ लाख ८३ हजार होती. अवघ्या आठ वर्षांत वाहनांची संख्या १३ लाखांवर गेली आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने सुविधेत वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद