शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 13:07 IST

जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे२०१० मध्ये ५ लाख वाहनेजिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची भर पडत असून, यामध्ये दुचाकी वाहनांचे सर्वाधिक प्रमाण आहे. जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे.

आरटीओ कार्यालयातर्फे ४ ते १० फेब्रुवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी आरटीओ कार्यालयात होणाºया नव्या वाहनांच्या नोंदणीविषयी माहिती दिली. जिल्ह्यात मार्च २०१८ पर्यंत १२ लाख ८७ हजार ५८८ वाहने होती. गेल्या दहा महिन्यांत ८० हजार नव्या वाहनांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक  ६३ हजार ४७९ नव्या दुचाकींची नोंद झाली असून,  महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची नोंद होत असल्याचे दिसते.

शहराबरोबर ग्रामीण भागात दुचाकी खरेदीला अधिक प्राधान्य  आहे. सण, उत्सवाच्या कालावधीत सर्वाधिक वाहन खरेदी होते. गेल्या काही वर्षांत शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी वाहन खरेदीकडे ओढा वाढत गेला. काही दिवसांपूर्वीच स्मार्ट सिटी बससेवेला सुरुवात झाली आहे. सिटी बसचा अधिकाधिक वापर केल्यास वाढत्या वाहन संख्येवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

२०१० मध्ये ५ लाख वाहनेजिल्ह्यातील वाहनांची संख्या २०१० मध्ये ५ लाख ८३ हजार होती. अवघ्या आठ वर्षांत वाहनांची संख्या १३ लाखांवर गेली आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने सुविधेत वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद