शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 13:07 IST

जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे२०१० मध्ये ५ लाख वाहनेजिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची भर पडत असून, यामध्ये दुचाकी वाहनांचे सर्वाधिक प्रमाण आहे. जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे.

आरटीओ कार्यालयातर्फे ४ ते १० फेब्रुवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी आरटीओ कार्यालयात होणाºया नव्या वाहनांच्या नोंदणीविषयी माहिती दिली. जिल्ह्यात मार्च २०१८ पर्यंत १२ लाख ८७ हजार ५८८ वाहने होती. गेल्या दहा महिन्यांत ८० हजार नव्या वाहनांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक  ६३ हजार ४७९ नव्या दुचाकींची नोंद झाली असून,  महिन्याला ८ हजार नव्या वाहनांची नोंद होत असल्याचे दिसते.

शहराबरोबर ग्रामीण भागात दुचाकी खरेदीला अधिक प्राधान्य  आहे. सण, उत्सवाच्या कालावधीत सर्वाधिक वाहन खरेदी होते. गेल्या काही वर्षांत शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी वाहन खरेदीकडे ओढा वाढत गेला. काही दिवसांपूर्वीच स्मार्ट सिटी बससेवेला सुरुवात झाली आहे. सिटी बसचा अधिकाधिक वापर केल्यास वाढत्या वाहन संख्येवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

२०१० मध्ये ५ लाख वाहनेजिल्ह्यातील वाहनांची संख्या २०१० मध्ये ५ लाख ८३ हजार होती. अवघ्या आठ वर्षांत वाहनांची संख्या १३ लाखांवर गेली आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने सुविधेत वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद