शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

औरंगाबाद जिल्ह्यात ५० हजार नागरिक दातांविना; उपचारासाठी खाजगी संस्थांचे पाठबळ मिळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 13:35 IST

तोंडात काही विकार असेल, तर शरीरप्रकृतीत त्याचे प्रतिबिंब दिसून येते.

ठळक मुद्देदंताविना रुग्णांना आहार घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागतेअशा वेळी शरीरावरही परिणाम होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद : मानवाच्या मुखात दात नसतील, तर काहीही फरक पडत नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे; परंतु दात नसल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वयोमानानुसार दात दुखतात, अनेकदा ते हलून पडून जातात. अशावेळी कृत्रिम दात, कवळी बसविण्याचा सल्ला दिला जातो. औरंगाबाद जिल्ह्यात ५० ते ८० वर्षे वयोगटातील तब्बल ५० हजार नागरिक दातांविना असल्याची माहिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.पी. डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

५ फेब्रुवारी हा दिवस मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातर्फे ५ ते १२ फेब्रुवारी दरमऱ्यान मौखिक आरोग्य सप्ताह साजरा के ला जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातर्फे जिल्हाभरात शिबिरे घेण्यात येतात. पथनाट्य, कलापथक, कीर्तनाच्या माध्यमातून मौखिक आरोग्याची जनजागृती केली जात आहे. 

डॉ. एस.पी. डांगे म्हणाले की, तोंडात काही विकार असेल, तर शरीरप्रकृतीत त्याचे प्रतिबिंब दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी मुख आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. गतवर्षी रुग्णसेवेबद्दल राज्य शासनाचा सुश्रुत पुरस्कार मिळाला. रुग्णालयातील डेंटल व्हॅन आणि डॉक्टरांचे पथक संपूर्ण राज्यात विशेषत: ग्रामीण भागांत मौखिक आरोग्यांची सेवा देतात. यामध्ये  दातांना कीड काढणे, चांदी भरणे, कवळी बसविणे आणि इतर उपचार केले जातात. सगळ्या तपासणीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५० हजार रुग्ण कवळीविना, दंतविहीन आढळले आहेत. अशा रुग्णांना आहार घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातून शरीरावरही परिणाम होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

खाजगीत दहा हजारांवर खर्चग्रामीण भागांमध्ये दातांची निगा, स्वच्छता राखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ग्रामीण मौखिक विकाराचे प्रमाण अधिक आढळते. कवळीसाठी खाजगीत दहा हजार रुपयांवर खर्च येतो. ग्रामीण भागातील रुग्णांना ते परवडणारे नसते. त्यामुळे शासकीय दंत महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्यांचा ओघ अधिक आहे. खाजगी रुग्णालयात उपचार करतानाही शासकीय योजनेचा लाभ मिळण्याची गरज असल्याचे दंततज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उपचारासाठी प्राधान्य जिल्ह्यातील दंत, कवळीविना असलेल्या रुग्णांना प्राधान्याने उपचारासाठी रुग्णालयात बोलाविण्यात आले आहे. रुग्णालयात आतापर्यंत शेकडो रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत; परंतु अनेक जण अद्यापही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ‘पीपीपी’ तत्त्वावर खाजगी संस्थांनी येऊन आर्थिक पाठबळ दिले, तर खाजगी दंत रुग्णालयात जाऊन रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.- डॉ. एस.पी. डांगे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

पहा व्हिडिओ :

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर