शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

औरंगाबाद जिल्ह्यात दलित वस्ती सुधार योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 16:50 IST

मतांचा जोगवा मागण्यासाठी कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जावे, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांसमोर उपस्थित झाला आहे. 

ठळक मुद्देबृहत आराखडा रखडला  जिल्हा परिषदेला प्राप्त ३० कोटींचा निधी पडून

औरंगाबाद : एकीकडे आर्थिक वर्ष मावळण्यास अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे, तर दुसरीकडे लवकरच निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. असे असताना चालू आर्थिक वर्षात प्राप्त ३० कोटी रुपयांच्या निधीतून दलित वस्ती सुधार योजनेवर एक छदामही आजवर खर्च झालेला नाही. आणखी दोन- तीन महिने अशीच परिस्थिती राहिली, तर मतांचा जोगवा मागण्यासाठी कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जावे, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांसमोर उपस्थित झाला आहे. 

दलित सुधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या लोकसंख्येच्या निकषानुसार वस्त्या निश्चित केल्या जातात. त्यानुसार बृहत आराखडा तयार केला जातो. यंदा तयार केलेला तिसरा बृहत आराखडा आहे. यापूर्वी  २००८-०९ ते २०१३ व २०१३-१४ ते २०१७-१८ असे पंचवार्षिक बृहत आराखडे तयार केले होते. ग्रामसभेच्या माध्यमातून अनु. जाती व नवबौद्धांच्या लोकसंख्येनुसार दलित वस्त्या निश्चित करण्यात आल्या व तसे ठराव घेऊन ते ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले. जिल्हा परिषदस्तरावर प्राप्त ठरावांचा बारकाईने अभ्यास करून संबंधित जि. प. सदस्यांची त्यास संमती घेण्यात आली. तेव्हा काही सदस्यांनी बृहत आराखड्यामध्ये काही दूरूस्त्या सुचविल्या, तर काही वस्त्यांवर आक्षेप घेतले. यासंबंधीच्या त्रुटींची पूर्तता करण्यास सदरील बृहत आराखडा गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून अद्यापही त्रुटींची पूर्तता झालेली नाही. 

यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी गेल्या आठवड्यात सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात बृहत आराखड्यातील त्रुटींची पूर्तता करून लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना केल्या. याशिवाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंतप्रधान आवास योजनांसह सर्व घरकुल योजना, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांंतर्गत बचत गटांना अर्थसाह्य योजनांचा निधी खर्च करण्यावर भर देण्यास सांगितले.गटविकास अधिकाऱ्यांकडून बृहत आराखड्यातील त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर तो समाजकल्याण विभागाच्या उपायुक्तांच्या मंजुरीसाठी ठेवला जाईल. बृहत आराखडा अंतिम झाल्यानंतर त्यामध्ये समाविष्ट नवीन वस्त्यांना यंदा प्राप्त ३० कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. केवळ बृहत आराखडा अंतिम झाला नसल्यामुळे दलित वस्ती सुधार योजनेची कामे रखडली आहेत.

लोकसंख्येनुसार दलित वसाहतींना निधीजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने तयार केलेल्या आराखड्यामध्ये १८२० दलित वस्त्यांवर शिक्कामोर्तब झाला होता. यामध्ये आणखी वस्त्या कमी- अधिक होऊ शकतात. यापूर्वी जिल्ह्यात १४०४ दलित वस्त्या होत्या. ४१६ वस्त्या नव्याने वाढल्या आहेत. नियमानुसार ज्या गावात मागासवर्गीय नागरिकांची संख्या १० ते २५ असेल, अशा ठिकाणी २ लाख रुपये, २५ ते ५० मागासवर्गीय लोकसंख्येसाठी ५ लाखांचा निधी दिला जातो, तर १५१ ते ३०० किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या वसाहतींसाठी १५ लाख रुपयांपर्यंतचा निधी या योजनेंतर्गत देण्यात येतो. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी