शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
7
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
8
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
9
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
10
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
11
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
12
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
13
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
14
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
15
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
16
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
17
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
18
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

औरंगाबाद जिल्ह्यात दलित वस्ती सुधार योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 16:50 IST

मतांचा जोगवा मागण्यासाठी कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जावे, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांसमोर उपस्थित झाला आहे. 

ठळक मुद्देबृहत आराखडा रखडला  जिल्हा परिषदेला प्राप्त ३० कोटींचा निधी पडून

औरंगाबाद : एकीकडे आर्थिक वर्ष मावळण्यास अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे, तर दुसरीकडे लवकरच निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. असे असताना चालू आर्थिक वर्षात प्राप्त ३० कोटी रुपयांच्या निधीतून दलित वस्ती सुधार योजनेवर एक छदामही आजवर खर्च झालेला नाही. आणखी दोन- तीन महिने अशीच परिस्थिती राहिली, तर मतांचा जोगवा मागण्यासाठी कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जावे, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांसमोर उपस्थित झाला आहे. 

दलित सुधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या लोकसंख्येच्या निकषानुसार वस्त्या निश्चित केल्या जातात. त्यानुसार बृहत आराखडा तयार केला जातो. यंदा तयार केलेला तिसरा बृहत आराखडा आहे. यापूर्वी  २००८-०९ ते २०१३ व २०१३-१४ ते २०१७-१८ असे पंचवार्षिक बृहत आराखडे तयार केले होते. ग्रामसभेच्या माध्यमातून अनु. जाती व नवबौद्धांच्या लोकसंख्येनुसार दलित वस्त्या निश्चित करण्यात आल्या व तसे ठराव घेऊन ते ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले. जिल्हा परिषदस्तरावर प्राप्त ठरावांचा बारकाईने अभ्यास करून संबंधित जि. प. सदस्यांची त्यास संमती घेण्यात आली. तेव्हा काही सदस्यांनी बृहत आराखड्यामध्ये काही दूरूस्त्या सुचविल्या, तर काही वस्त्यांवर आक्षेप घेतले. यासंबंधीच्या त्रुटींची पूर्तता करण्यास सदरील बृहत आराखडा गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून अद्यापही त्रुटींची पूर्तता झालेली नाही. 

यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी गेल्या आठवड्यात सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात बृहत आराखड्यातील त्रुटींची पूर्तता करून लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना केल्या. याशिवाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंतप्रधान आवास योजनांसह सर्व घरकुल योजना, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांंतर्गत बचत गटांना अर्थसाह्य योजनांचा निधी खर्च करण्यावर भर देण्यास सांगितले.गटविकास अधिकाऱ्यांकडून बृहत आराखड्यातील त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर तो समाजकल्याण विभागाच्या उपायुक्तांच्या मंजुरीसाठी ठेवला जाईल. बृहत आराखडा अंतिम झाल्यानंतर त्यामध्ये समाविष्ट नवीन वस्त्यांना यंदा प्राप्त ३० कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. केवळ बृहत आराखडा अंतिम झाला नसल्यामुळे दलित वस्ती सुधार योजनेची कामे रखडली आहेत.

लोकसंख्येनुसार दलित वसाहतींना निधीजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने तयार केलेल्या आराखड्यामध्ये १८२० दलित वस्त्यांवर शिक्कामोर्तब झाला होता. यामध्ये आणखी वस्त्या कमी- अधिक होऊ शकतात. यापूर्वी जिल्ह्यात १४०४ दलित वस्त्या होत्या. ४१६ वस्त्या नव्याने वाढल्या आहेत. नियमानुसार ज्या गावात मागासवर्गीय नागरिकांची संख्या १० ते २५ असेल, अशा ठिकाणी २ लाख रुपये, २५ ते ५० मागासवर्गीय लोकसंख्येसाठी ५ लाखांचा निधी दिला जातो, तर १५१ ते ३०० किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या वसाहतींसाठी १५ लाख रुपयांपर्यंतचा निधी या योजनेंतर्गत देण्यात येतो. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी