शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

औरंगाबाद जिल्हा परिषदेत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:51 IST

संपूर्ण जिल्ह्याला निकालाची उत्सुकता लागली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारीही मागे नव्हते. गुुरुवारी दिवसभर जिल्हा परिषदेत शुकशुकाट होता.

औरंगाबाद : मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचा गड राखतील की बहुजन वंचित आघाडीचे इम्तियाज जलील, हर्षवर्धन जाधव बाजी मारतील, संपूर्ण जिल्ह्याला निकालाची उत्सुकता लागली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारीही मागे नव्हते. गुुरुवारी दिवसभर जिल्हा परिषदेत शुकशुकाट होता. कामाला दांडी मारून टीव्हीसमोर अधिकारी- कर्मचारी कोणी घरात बसून टीव्हीवर, तर कोणी मोबाईलवर निकालाचा प्रत्येक ‘अपडेट’ पाहण्यात मग्न होते.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाल्याने कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या होत्या. मतमोजणीची एक फेरी संपली की दुसरी कधी सुरू होते आणि त्या फेरीत कोण आघाडी घेतो आणि कोण पिछाडीवर जातो, ही जाणून घेण्याची उत्सुकता कर्मचारी- अधिकाऱ्यांमध्ये दिसून आली. एरव्ही मोठी वर्दळ असलेल्या जिल्हा परिषदेत आज सुटी असल्याचा माहोल दिसत होता.

निकालाबरोबर आज उन्हाची तीव्रताही अधिक होती. त्याचाही परिणाम जाणवत होता. १० मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. तेव्हापासून जिल्हा परिषदेतील वर्दळ कमी होत गेली. बहुतेक सर्वच जण मोबाईलवरून आपल्या सहकाऱ्यांकडून निकाल जाणून घेत होते व ऐकलेल्या निकालावर अमुक उमेदवार मागे का पडला, आघाडी घेतलेल्या उमेदवाराला कोणाचा फायदा झाला, असा कयास लावण्यातही हे कर्मचारी-अधिकारी मागे नव्हते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद