शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

औरंगाबाद जिल्ह्यात आठ महिन्यांत दगावली २२० बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:30 IST

गेल्या आठ महिन्यांत बालमृत्यूची संख्या मनाला चटका लावून जाणारी आहे. 

ठळक मुद्दे औरंगाबादसह जालना, हिंगोली, परभणीत ९१५ मुलांचा मृत्यू मृतात पाच वर्षांपर्यंतची मुले 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांत गेल्या आठ महिन्यांत विविध कारणांनी पाच वर्षांपर्यंतच्या तब्बल ९१५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील २२० बालकांचा समावेश आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने येथे रुग्ण येतात. घाटीबरोबर महापालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्रे आहेत. खाजगी रुग्णालयांचा विस्तार झालेला आहे. चिकलठाणा येथे नव्याने जिल्हा सामान्य रुग्णालयदेखील आता कार्यरत झाले आहे, तर ग्रामीण भागातही आरोग्य विभागाच्या रुग्णालयाचे आणि आरोग्य केंद्रांचे जाळे आहे. या सर्व रुग्णालयांच्या माध्यमातून बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो; परंतु गेल्या आठ महिन्यांत बालमृत्यूची संख्या मनाला चटका लावून जाणारी आहे. 

औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबादसह जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ३८२ बालमृत्यू झाले आहेत. पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्याचा क्रमांक लागतो. औरंगाबादेत २२० बालके  दगावली असून, यात शहरातील ३४ बालकांचा समावेश आहे. जालना आणि हिंगोलीत अनुक्रमे १६३ आणि १५० बालके मृत्युमुखी पडली. एक ते पाच वर्षे वयोगटातील या बालकांनी जन्मानंतर अवघ्या काही कालावधीत जगाचा निरोप घेतला.

आरोग्य विभागातर्फे  बालकांच्या मृत्यूच्या विविध कारणांचा शोध घेऊन शासनाला अहवाल सादर केला जातो. या बालकांच्या मृत्यूला अनेक कारणे असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. या कारणांमुळे बालकांचा मृत्यू होऊ नये, यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते.

प्रमाण कमी झालेबालमृत्यूचे प्रमाण हे चार जिल्ह्यांतील लोकसंख्येचा विचार करता निश्चित कमी असल्याचे दिसते. शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालये, लसीकरण, बालरोगतज्ज्ञांची उपलब्धता अशा आरोग्य सुविधांमुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटत आहे.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

चार जिल्ह्यांतील परिस्थिती :     जिल्हा    बालकांचा मृत्यू    औरंगाबाद    २२०    जालना    १६३    हिंगोली    १५०    परभणी    ३८२    एकूण        ९१५

ही आहेत मृत्यूची कारणे : न्यूमोनियाकमी वजनमुदतपूर्व प्रसूतीडायरियाजंतुसंसर्गश्वसनाशी संबंधित आजारअपघातविषबाधाअचानक मृत्यू व इतर

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू