शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

औरंगाबाद जिल्ह्यात आठ महिन्यांत दगावली २२० बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:30 IST

गेल्या आठ महिन्यांत बालमृत्यूची संख्या मनाला चटका लावून जाणारी आहे. 

ठळक मुद्दे औरंगाबादसह जालना, हिंगोली, परभणीत ९१५ मुलांचा मृत्यू मृतात पाच वर्षांपर्यंतची मुले 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांत गेल्या आठ महिन्यांत विविध कारणांनी पाच वर्षांपर्यंतच्या तब्बल ९१५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील २२० बालकांचा समावेश आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने येथे रुग्ण येतात. घाटीबरोबर महापालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्रे आहेत. खाजगी रुग्णालयांचा विस्तार झालेला आहे. चिकलठाणा येथे नव्याने जिल्हा सामान्य रुग्णालयदेखील आता कार्यरत झाले आहे, तर ग्रामीण भागातही आरोग्य विभागाच्या रुग्णालयाचे आणि आरोग्य केंद्रांचे जाळे आहे. या सर्व रुग्णालयांच्या माध्यमातून बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो; परंतु गेल्या आठ महिन्यांत बालमृत्यूची संख्या मनाला चटका लावून जाणारी आहे. 

औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबादसह जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ३८२ बालमृत्यू झाले आहेत. पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्याचा क्रमांक लागतो. औरंगाबादेत २२० बालके  दगावली असून, यात शहरातील ३४ बालकांचा समावेश आहे. जालना आणि हिंगोलीत अनुक्रमे १६३ आणि १५० बालके मृत्युमुखी पडली. एक ते पाच वर्षे वयोगटातील या बालकांनी जन्मानंतर अवघ्या काही कालावधीत जगाचा निरोप घेतला.

आरोग्य विभागातर्फे  बालकांच्या मृत्यूच्या विविध कारणांचा शोध घेऊन शासनाला अहवाल सादर केला जातो. या बालकांच्या मृत्यूला अनेक कारणे असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. या कारणांमुळे बालकांचा मृत्यू होऊ नये, यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते.

प्रमाण कमी झालेबालमृत्यूचे प्रमाण हे चार जिल्ह्यांतील लोकसंख्येचा विचार करता निश्चित कमी असल्याचे दिसते. शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालये, लसीकरण, बालरोगतज्ज्ञांची उपलब्धता अशा आरोग्य सुविधांमुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटत आहे.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

चार जिल्ह्यांतील परिस्थिती :     जिल्हा    बालकांचा मृत्यू    औरंगाबाद    २२०    जालना    १६३    हिंगोली    १५०    परभणी    ३८२    एकूण        ९१५

ही आहेत मृत्यूची कारणे : न्यूमोनियाकमी वजनमुदतपूर्व प्रसूतीडायरियाजंतुसंसर्गश्वसनाशी संबंधित आजारअपघातविषबाधाअचानक मृत्यू व इतर

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू