शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात आठ महिन्यांत दगावली २२० बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:30 IST

गेल्या आठ महिन्यांत बालमृत्यूची संख्या मनाला चटका लावून जाणारी आहे. 

ठळक मुद्दे औरंगाबादसह जालना, हिंगोली, परभणीत ९१५ मुलांचा मृत्यू मृतात पाच वर्षांपर्यंतची मुले 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांत गेल्या आठ महिन्यांत विविध कारणांनी पाच वर्षांपर्यंतच्या तब्बल ९१५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील २२० बालकांचा समावेश आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने येथे रुग्ण येतात. घाटीबरोबर महापालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्रे आहेत. खाजगी रुग्णालयांचा विस्तार झालेला आहे. चिकलठाणा येथे नव्याने जिल्हा सामान्य रुग्णालयदेखील आता कार्यरत झाले आहे, तर ग्रामीण भागातही आरोग्य विभागाच्या रुग्णालयाचे आणि आरोग्य केंद्रांचे जाळे आहे. या सर्व रुग्णालयांच्या माध्यमातून बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो; परंतु गेल्या आठ महिन्यांत बालमृत्यूची संख्या मनाला चटका लावून जाणारी आहे. 

औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबादसह जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ३८२ बालमृत्यू झाले आहेत. पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्याचा क्रमांक लागतो. औरंगाबादेत २२० बालके  दगावली असून, यात शहरातील ३४ बालकांचा समावेश आहे. जालना आणि हिंगोलीत अनुक्रमे १६३ आणि १५० बालके मृत्युमुखी पडली. एक ते पाच वर्षे वयोगटातील या बालकांनी जन्मानंतर अवघ्या काही कालावधीत जगाचा निरोप घेतला.

आरोग्य विभागातर्फे  बालकांच्या मृत्यूच्या विविध कारणांचा शोध घेऊन शासनाला अहवाल सादर केला जातो. या बालकांच्या मृत्यूला अनेक कारणे असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. या कारणांमुळे बालकांचा मृत्यू होऊ नये, यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते.

प्रमाण कमी झालेबालमृत्यूचे प्रमाण हे चार जिल्ह्यांतील लोकसंख्येचा विचार करता निश्चित कमी असल्याचे दिसते. शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालये, लसीकरण, बालरोगतज्ज्ञांची उपलब्धता अशा आरोग्य सुविधांमुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटत आहे.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

चार जिल्ह्यांतील परिस्थिती :     जिल्हा    बालकांचा मृत्यू    औरंगाबाद    २२०    जालना    १६३    हिंगोली    १५०    परभणी    ३८२    एकूण        ९१५

ही आहेत मृत्यूची कारणे : न्यूमोनियाकमी वजनमुदतपूर्व प्रसूतीडायरियाजंतुसंसर्गश्वसनाशी संबंधित आजारअपघातविषबाधाअचानक मृत्यू व इतर

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू