शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

औरंगाबाद शहरातील दंगल नियोजित नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:27 IST

शहरातील प्रत्येक घटनेच्या अनुषंगाने गोपनीय शाखेकडून प्राप्त होणाऱ्या अहवालात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिलेला असतो. शहागंजमधील घटनेनंतर आलेल्या एका अहवालाची गंभीर दखल न घेता, ‘लांडगा आला रे लांडगा आला’, या म्हणीप्रमाणे पोलिसांनी त्याकडे पाहिले. परिणामी ११ आणि १२ मे रोजी अचानक उद्भवलेली दंगल आटोक्यात आणण्यासाठी बेसावध पोलिसांना तब्बल आठ तास लागले.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त : कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासंबंधी मिळाला होता अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रत्येक घटनेच्या अनुषंगाने गोपनीय शाखेकडून प्राप्त होणाऱ्या अहवालात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिलेला असतो. शहागंजमधील घटनेनंतर आलेल्या एका अहवालाची गंभीर दखल न घेता, ‘लांडगा आला रे लांडगा आला’, या म्हणीप्रमाणे पोलिसांनी त्याकडे पाहिले. परिणामी ११ आणि १२ मे रोजी अचानक उद्भवलेली दंगल आटोक्यात आणण्यासाठी बेसावध पोलिसांना तब्बल आठ तास लागले.शहागंज येथे झालेल्या भांडणानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा गोपनीय शाखेने दिलेला अहवाल, एप्रिल महिन्यात पोलिसांना प्राप्त झाला, मात्र असे अहवाल गोपनीय शाखेकडून नेहमीच येतात, असे समजून पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने दंगलखोरांचे फावले. ११ आणि १२ मे रोजी शहरात झालेली दंगल पूर्वनियोजित नव्हती, मात्र दंगलीची तयारी झाल्याचे हळूहळू स्पष्ट झाल्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकारांना दिली.११ आणि १२ मे रोजी शहरात दंगल झाली. या दंगलीत पोलिसांच्या गोळीबारात एका मुलाचा आणि दंगेखोरांनी पेटविलेल्या घरात एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले. दंगलीत दहा कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. तर व्यापारी समुहाला मोठा आर्थिक फटका बसला.दंगलीत पोलीस शिवसेनेसोबत होते आणि ते कार्यकर्त्यांसारखे वागले, असा आरोप काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून झाला. याविषयी पोलीस आयुक्तांना विचारले असता, राजकीय नेत्यांच्या आरोपांविषयी मी काहीच बोलणार नाही. मात्र पोलिसांनी डोळ्यात तेल घालून दंगल आटोक्यात आणली. दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या दंगलीत पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले.दंगल पूर्वनियोजित होती का, या प्रश्नाचे उत्तर देताना आयुक्त म्हणाले की, मोतीकारंजा, शहागंज येथील किरकोळ भांडणे पोलीस ठाण्यापर्यंत आली. दोन्ही गटांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला. त्यांच्यात तडजोड झाल्याची नोंद पोलीस ठाण्याच्या डायरीत घेण्यात आली. अशा नोंदी विविध पोलीस ठाण्यात नियमित ठाणेदार घेतात. दोन समुदायांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे होत होती, मात्र या भांडणांचे रुपांतर दंगलीत होईल, असे पोलिसांना कधीच वाटले नाही आणि त्याबाबतचा अहवाल गुप्तवार्ता विभाग अथवा विशेष शाखेकडून पोलिसांना प्राप्त झाला नव्हता. असे असले तरी दंगलीची तयारी अत्यंत गुप्तपणे सुरू होती. याबाबतची माहिती मात्र मिळाली नाही.दंगलपूर्वी काहींची तयारी होतीदंगल पूर्वनियोजित होती का, या प्रश्नाचे उत्तर देताना आयुक्त म्हणाले की, गांधीनगर येथे एका गॅरेजमध्ये झालेले किरकोळ भांडण हे या दंगलीचे तत्कालिक कारण आहे. दंगल नियोजित नव्हती, मात्र दंगलीची तयारी सुरू होती, हे मात्र दंगलीनंतर पोलीस तपासात समोर आले आहे. तपास कामात किंवा दंगलीनंतरचे प्रकरण हाताळण्यात आपण कोणत्याही समुदायाच्या बाजूने किंवा विरुध्द कारवाई केली नसल्याचेही भारंबे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद