शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

जी-२० शिखर संमेलनासाठी औरंगाबाद ‘डेस्टिनेशन’; विदेशी पाहुण्यांना अजिंठा, वेरूळची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:20 IST

मुंबई, पुणे, नाशिकच्या तुलनेत औरंगाबादमधील व्यवस्था पाहून सहसचिव व अन्य अधिकारी भारावल्याने जी-२० तील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबाद प्रशासकीय यंत्रणेला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

औरंगाबाद : भारतात जी-२० हे शिखर संमेलन २०२३ मध्ये पहिल्यांदाच होणार आहे. या शिखर संमेलनासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळे दाखविण्यासाठी औरंगाबादेतील वेरूळ, अजिंठा लेण्यांचा विचार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी संमेलन संयोजक सहसचिव एल. रमेशबाबू व पथकाने अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्यासह लेण्यांची पाहणी केली.

मुंबई, पुणे, नाशिकच्या तुलनेत औरंगाबादमधील व्यवस्था पाहून सहसचिव व अन्य अधिकारी भारावल्याने जी-२० तील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबाद प्रशासकीय यंत्रणेला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. साैदी अरेबियात १५ वे शिखर संमेलन झाले. त्यानंतर २०२१ मध्ये इटलीत, २०२२ मध्ये इंडोनेशियामध्ये आणि २०२३ मध्ये भारताला यजमानपदाची संधी मिळाली आहे. दिल्लीत संमेलन होणार असून देशातील ४० ते ५० शहरांत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी पर्यटन व इतर माहितीच्या अनुषंगाने जाणार आहेत. त्यासाठी संयोजकांनी पाहणी सुरू केली आहे. एनजीओ, दूतावास, अधिकारी यांच्यापैकी एका गटाला औरंगाबादमध्ये आणण्यासाठी संमेलन संयोजकांनी पाहणी केली. येथील हॉटेल्स, काही संस्थांचे सभागृह, दळणवळण सुविधांचा आढावा संयोजकांनी घेतला. अप्पर जिल्हाधिकारी गव्हाणे यांच्यासह पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

हे देश आहेत जी-२० मध्येजी- २० मध्ये में अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, साऊदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, इंग्लंड, अमेरिका व युरोपीय संघ जी-२० मध्ये आहेत. यातील कोणत्याही देशातील सुमारे २०० ते २५० उच्चस्थ अधिकाऱ्यांचे पथक परिषदेच्या दरम्यान औरंगाबादेत पर्यटन, संस्कृती, उद्योग, अर्थकारण समजून घेण्यासाठी येऊ शकते. पथक आल्यास किमान ३ दिवस औरंगाबादमध्ये थांबेल.

औरंगाबादला मान मिळाला तर काय...?जी-२० शिखर संमेलनातील एखाद्या राष्ट्रातील पथकाचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबादला मिळाल्यास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. येथील पर्यटनस्थळे दाखविण्यासह येथील उद्योगांची भरारी, गुंतवणुकीचे पर्याय त्यांच्या समोर ठेवण्यात येतील. भविष्यात पर्यटन, उद्योगवाढीसाठी फायदा यातून होईल. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांच्या स्पर्धेत येथील पर्यटनस्थळांमुळे औरंगाबादची निवड होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटन