शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जी-२० शिखर संमेलनासाठी औरंगाबाद ‘डेस्टिनेशन’; विदेशी पाहुण्यांना अजिंठा, वेरूळची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:20 IST

मुंबई, पुणे, नाशिकच्या तुलनेत औरंगाबादमधील व्यवस्था पाहून सहसचिव व अन्य अधिकारी भारावल्याने जी-२० तील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबाद प्रशासकीय यंत्रणेला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

औरंगाबाद : भारतात जी-२० हे शिखर संमेलन २०२३ मध्ये पहिल्यांदाच होणार आहे. या शिखर संमेलनासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळे दाखविण्यासाठी औरंगाबादेतील वेरूळ, अजिंठा लेण्यांचा विचार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी संमेलन संयोजक सहसचिव एल. रमेशबाबू व पथकाने अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्यासह लेण्यांची पाहणी केली.

मुंबई, पुणे, नाशिकच्या तुलनेत औरंगाबादमधील व्यवस्था पाहून सहसचिव व अन्य अधिकारी भारावल्याने जी-२० तील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबाद प्रशासकीय यंत्रणेला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. साैदी अरेबियात १५ वे शिखर संमेलन झाले. त्यानंतर २०२१ मध्ये इटलीत, २०२२ मध्ये इंडोनेशियामध्ये आणि २०२३ मध्ये भारताला यजमानपदाची संधी मिळाली आहे. दिल्लीत संमेलन होणार असून देशातील ४० ते ५० शहरांत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी पर्यटन व इतर माहितीच्या अनुषंगाने जाणार आहेत. त्यासाठी संयोजकांनी पाहणी सुरू केली आहे. एनजीओ, दूतावास, अधिकारी यांच्यापैकी एका गटाला औरंगाबादमध्ये आणण्यासाठी संमेलन संयोजकांनी पाहणी केली. येथील हॉटेल्स, काही संस्थांचे सभागृह, दळणवळण सुविधांचा आढावा संयोजकांनी घेतला. अप्पर जिल्हाधिकारी गव्हाणे यांच्यासह पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

हे देश आहेत जी-२० मध्येजी- २० मध्ये में अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, साऊदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, इंग्लंड, अमेरिका व युरोपीय संघ जी-२० मध्ये आहेत. यातील कोणत्याही देशातील सुमारे २०० ते २५० उच्चस्थ अधिकाऱ्यांचे पथक परिषदेच्या दरम्यान औरंगाबादेत पर्यटन, संस्कृती, उद्योग, अर्थकारण समजून घेण्यासाठी येऊ शकते. पथक आल्यास किमान ३ दिवस औरंगाबादमध्ये थांबेल.

औरंगाबादला मान मिळाला तर काय...?जी-२० शिखर संमेलनातील एखाद्या राष्ट्रातील पथकाचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबादला मिळाल्यास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. येथील पर्यटनस्थळे दाखविण्यासह येथील उद्योगांची भरारी, गुंतवणुकीचे पर्याय त्यांच्या समोर ठेवण्यात येतील. भविष्यात पर्यटन, उद्योगवाढीसाठी फायदा यातून होईल. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांच्या स्पर्धेत येथील पर्यटनस्थळांमुळे औरंगाबादची निवड होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटन