शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

जी-२० शिखर संमेलनासाठी औरंगाबाद ‘डेस्टिनेशन’; विदेशी पाहुण्यांना अजिंठा, वेरूळची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:20 IST

मुंबई, पुणे, नाशिकच्या तुलनेत औरंगाबादमधील व्यवस्था पाहून सहसचिव व अन्य अधिकारी भारावल्याने जी-२० तील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबाद प्रशासकीय यंत्रणेला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

औरंगाबाद : भारतात जी-२० हे शिखर संमेलन २०२३ मध्ये पहिल्यांदाच होणार आहे. या शिखर संमेलनासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळे दाखविण्यासाठी औरंगाबादेतील वेरूळ, अजिंठा लेण्यांचा विचार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी संमेलन संयोजक सहसचिव एल. रमेशबाबू व पथकाने अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्यासह लेण्यांची पाहणी केली.

मुंबई, पुणे, नाशिकच्या तुलनेत औरंगाबादमधील व्यवस्था पाहून सहसचिव व अन्य अधिकारी भारावल्याने जी-२० तील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबाद प्रशासकीय यंत्रणेला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. साैदी अरेबियात १५ वे शिखर संमेलन झाले. त्यानंतर २०२१ मध्ये इटलीत, २०२२ मध्ये इंडोनेशियामध्ये आणि २०२३ मध्ये भारताला यजमानपदाची संधी मिळाली आहे. दिल्लीत संमेलन होणार असून देशातील ४० ते ५० शहरांत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी पर्यटन व इतर माहितीच्या अनुषंगाने जाणार आहेत. त्यासाठी संयोजकांनी पाहणी सुरू केली आहे. एनजीओ, दूतावास, अधिकारी यांच्यापैकी एका गटाला औरंगाबादमध्ये आणण्यासाठी संमेलन संयोजकांनी पाहणी केली. येथील हॉटेल्स, काही संस्थांचे सभागृह, दळणवळण सुविधांचा आढावा संयोजकांनी घेतला. अप्पर जिल्हाधिकारी गव्हाणे यांच्यासह पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

हे देश आहेत जी-२० मध्येजी- २० मध्ये में अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, साऊदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, इंग्लंड, अमेरिका व युरोपीय संघ जी-२० मध्ये आहेत. यातील कोणत्याही देशातील सुमारे २०० ते २५० उच्चस्थ अधिकाऱ्यांचे पथक परिषदेच्या दरम्यान औरंगाबादेत पर्यटन, संस्कृती, उद्योग, अर्थकारण समजून घेण्यासाठी येऊ शकते. पथक आल्यास किमान ३ दिवस औरंगाबादमध्ये थांबेल.

औरंगाबादला मान मिळाला तर काय...?जी-२० शिखर संमेलनातील एखाद्या राष्ट्रातील पथकाचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबादला मिळाल्यास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. येथील पर्यटनस्थळे दाखविण्यासह येथील उद्योगांची भरारी, गुंतवणुकीचे पर्याय त्यांच्या समोर ठेवण्यात येतील. भविष्यात पर्यटन, उद्योगवाढीसाठी फायदा यातून होईल. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांच्या स्पर्धेत येथील पर्यटनस्थळांमुळे औरंगाबादची निवड होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटन