शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 16:48 IST

औरंगाबादचे नवीन जिल्हाधिकारी कोण, याबाबत आता उत्सुकता आहे.

ठळक मुद्देविधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बदलीला ब्रेकत्यानंतर कोरोना प्रादुर्भावाने बदली लांबली

औरंगाबाद : जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुंबई येथे मंत्रालयात उपसचिव पदी बदली झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक आणि कोरोना प्रादुर्भाव यामुळे त्यांची बदली लांबली होती. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे प्रभावी काम झाल्यामुळे राज्य शासनाने चौधरी यांच्या बदलीचा विचार केला असल्याची चर्चा आहे. उदय चौधरी यांनी एप्रिल २०१८ मध्ये औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्या आधी ते सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. 

उदय चौधरी यांची गेल्या वर्षीच बदली होणार होती; परंतु विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बदलीला ब्रेक लागला. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये प्रशिक्षण घेऊन आल्यानंतरच चौधरी यांची बदली होणार अशी चर्चा सुरू झाली होती. ते  १५ मार्च रोजी प्रशिक्षणावरून आले आणि त्यादरम्यानच कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने उपाययोजनांची सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांची बदली होऊ शकली नव्हती. त्यांच्या जागेवर येण्यासाठी अनेकांमध्ये स्पर्धा असल्याची माहिती असून यामुळे औरंगाबादचे नवीन जिल्हाधिकारी कोण, याबाबत आता उत्सुकता आहे.

कोरोना काळात प्रभावी काम जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना झाल्या असून, पूर्ण प्रशासकीय यंत्रणा एकत्रितपणे काम करीत आहे. त्यामुळे नवीन बदलून येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना येथे काम करताना काहीही अडचणी येणार नाहीत, अशी शासनाची धारणा झाल्यामुळे जिल्हाधिकारी चौधरी यांची येथून बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

मृत्यूदर कमी करणे, रुग्णसेवेसाठी व्यवस्थापन, संसर्ग प्रसार थांबविणे, या त्रिसूत्रीवर लक्ष : उदय चौधरी

उदय चौधरी यांचा अल्प परिचय मुळचे जळगाव येथील चौधरी यांची प्रशासकीय वाटचाल गडचिरोलीपासून सहायक जिल्हाधिकारी म्हणून सुरु झाली. वर्धा, ठाणे येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्तमप्रकारे कामगिरी बजावली. उत्कृष्ट शैक्षणिक कारकीर्द असलेल्या चौधरी यांनी बी.टेक (मेकॅनिकल) ही पदवी प्राप्त केली असून सन 2010 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादTransferबदली