शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याची योजना एक, प्रस्ताव मात्र तीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 5:46 PM

महापालिकेने मागील आठवड्यात शासनाकडे नवीन पाणीपुरवठा योजनेचा नवीन प्रस्ताव सादर केला.

ठळक मुद्देशासनासमोर पेच  कंपनीची भीती कायम

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा वाद सर्वोच्च न्यायालय, लवादात प्रलंबित असताना महापालिका, वैधानिक विकास महामंडळाने शासनाकडे एकूण तीन वेगवेगळे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामुळे कोणता प्रस्ताव योग्य आहे, असा प्रश्न शासनाला पडला आहे. नवीन पाणीपुरवठा योजना राबविताना समांतरच्या कंपनीकडून सर्वोच्च न्यायालयामार्फत आडकाठी आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

समांतरचा वाद बाजूला ठेवून शासन आदेशानुसार महापालिका प्रशासनाने दोन वेगवेगळे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केले आहेत. मनपाने १५०० कोटी रुपयांचा आणि २०६० कोटी रुपयांचा दुसरा प्रस्ताव सादर केला आहे. याशिवाय मराठवाडा विकास मंडळानेदेखील राज्यपालांच्या माध्यमातून जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान मुख्य जलवाहिनी टाकण्याचा ६८२ कोटी रुपयांचा एक प्रस्ताव सादर केल्याची माहिती सोमवारी समोर आली.  महापालिकेने मागील आठवड्यात शासनाकडे नवीन पाणीपुरवठा योजनेचा नवीन प्रस्ताव सादर केला. नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर त्याचे सादरीकरणही केले. हा प्रस्ताव १५०० कोटींचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता पालिकेने नगरविकास खात्याकडे एक नव्हे तर दोन प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. पहिला प्रस्ताव १५०० कोटी रुपयांचा आहे. त्यात जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान २४०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे प्रस्तावित आहे. तर दुसरा प्रस्ताव २०६० कोटी रुपयांचा असून, त्यात नो नेटवर्क एरिया, वाळूज आदी परिसराचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी एका प्रस्तावाला  शासनाकडून मंजुरी मिळेल, असा विश्वासही घोडेले यांनी व्यक्त केला. प्रस्ताव बाजूला ठेवावा मराठवाडा विकास मंडळात सोमवारी बैठक घेण्यात आली. बैठकीला महापौरांसह मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. मनपाने मुख्य जलवाहिनीसोबतच अंतर्गत जलवाहिन्या, जलकुंभ या सर्वांचा एकत्रित प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यामुळे विकास मंडळाचा प्रस्ताव बाजूला ठेवण्याची विनंती नगरविकास खात्याकडे करावी, अशी अपेक्षा महापौरांनी या बैठकीत केली.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकार