शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

औरंगाबाद शहर ‘सुरत प्लेग’च्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:17 IST

पर्यटनाची राजधानी आणि औद्योगिकनगरी औरंगाबाद शहरात मागील एक महिन्यापासून शहरात हजारो मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा कुजत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात १९९४ मध्ये सुरतमध्ये पसरलेल्या प्लेगसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमोठा धोका : साचलेला कचरा, त्यावर पावसाचा शिडकावा

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटनाची राजधानी आणि औद्योगिकनगरी औरंगाबाद शहरात मागील एक महिन्यापासून शहरात हजारो मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा कुजत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात १९९४ मध्ये सुरतमध्ये पसरलेल्या प्लेगसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.शहरात दररोज ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. यातील ३० ते ४० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेच्या काही झोन कार्यालयांना यश येत आहे. उर्वरित कचरा शहरातील मुख्य रस्ते, नाले, रिकाम्या प्लॉटवर पडून आहे. दररोज ३०० मेट्रिक टन कचरा गृहीत धरल्यास सध्या शहरात ७ हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा साचला आहे. साचलेला कचरा कमी होण्याऐवजी दररोज त्यात वाढच होत आहे. कचºयातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने नागरिक परस्पर कचरा जाळून टाकत आहेत.जळालेल्या कचºयावर ठिकठिकाणी अग्निशमन दलाकडून पाणी मारून आग विझविण्यात येत आहे. यावर परत नवीन कचरा येऊन पडत आहे. जुना कचरा, त्यावर पाण्याचा मारा आणि नवीन कचरा या तिहेरी प्रक्रियेने कचरा कुजण्याचे प्रकार सुरू झालेत. ही परिस्थिती अत्यंत विदारक आहे. कचºयात मरण पावलेले उंदीर असल्यास त्यातून पिसा जन्माला येतात. त्या प्लेग जन्माला घालतात. प्लेग हा आजार संसर्गजन्य असून, सुरत शहरात १९९४ मध्ये अशाच पद्धतीने उद्रेक झाला होता. शेकडो नागरिकांना यात जीव गमवावा लागला होता.औरंगाबाद शहरातील कचºयाची गंभीर परिस्थिती पाहून तज्ज्ञ डॉक्टरांना प्लेगसारखी साथ पसरण्याची भीती वाटू लागली आहे. प्लेग हा संसर्गजन्य आजार पसरल्यास तो आटोक्यात आणणे सहजासहजी शक्य होत नाही. १९९४ मध्ये प्लेग अटोक्यात आण्यासाठी खूप औषधी नव्हती. आज औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, असेही तज्ज्ञांनी नमूद केले.कचºयाचा फुगा कोणी फुगविला४१६ फेब्रुवारीपासून शहरात कचरा साचला आहे. सुरुवातीचे काही दिवस मनपाने कचरा उचलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. नारेगावच्या आंदोलकांसोबत बोलणी करण्यातच वेळ वाया घालविला. जेव्हा बोलणी अयशस्वी झाली तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. हजारो मेट्रिक टन कचरा शहरात साचल्यावर मनपा भानावर आली.मृत प्राणी कचºयातशहरात ज्या भागात कचºयाचे डोंगर साचले आहेत, त्या कचºयात मरण पावलेले प्राणी आणून टाकण्यात आले आहेत. यातून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.