शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

औरंगाबाद शहर ‘सुरत प्लेग’च्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:17 IST

पर्यटनाची राजधानी आणि औद्योगिकनगरी औरंगाबाद शहरात मागील एक महिन्यापासून शहरात हजारो मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा कुजत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात १९९४ मध्ये सुरतमध्ये पसरलेल्या प्लेगसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमोठा धोका : साचलेला कचरा, त्यावर पावसाचा शिडकावा

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटनाची राजधानी आणि औद्योगिकनगरी औरंगाबाद शहरात मागील एक महिन्यापासून शहरात हजारो मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा कुजत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात १९९४ मध्ये सुरतमध्ये पसरलेल्या प्लेगसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.शहरात दररोज ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. यातील ३० ते ४० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेच्या काही झोन कार्यालयांना यश येत आहे. उर्वरित कचरा शहरातील मुख्य रस्ते, नाले, रिकाम्या प्लॉटवर पडून आहे. दररोज ३०० मेट्रिक टन कचरा गृहीत धरल्यास सध्या शहरात ७ हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा साचला आहे. साचलेला कचरा कमी होण्याऐवजी दररोज त्यात वाढच होत आहे. कचºयातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने नागरिक परस्पर कचरा जाळून टाकत आहेत.जळालेल्या कचºयावर ठिकठिकाणी अग्निशमन दलाकडून पाणी मारून आग विझविण्यात येत आहे. यावर परत नवीन कचरा येऊन पडत आहे. जुना कचरा, त्यावर पाण्याचा मारा आणि नवीन कचरा या तिहेरी प्रक्रियेने कचरा कुजण्याचे प्रकार सुरू झालेत. ही परिस्थिती अत्यंत विदारक आहे. कचºयात मरण पावलेले उंदीर असल्यास त्यातून पिसा जन्माला येतात. त्या प्लेग जन्माला घालतात. प्लेग हा आजार संसर्गजन्य असून, सुरत शहरात १९९४ मध्ये अशाच पद्धतीने उद्रेक झाला होता. शेकडो नागरिकांना यात जीव गमवावा लागला होता.औरंगाबाद शहरातील कचºयाची गंभीर परिस्थिती पाहून तज्ज्ञ डॉक्टरांना प्लेगसारखी साथ पसरण्याची भीती वाटू लागली आहे. प्लेग हा संसर्गजन्य आजार पसरल्यास तो आटोक्यात आणणे सहजासहजी शक्य होत नाही. १९९४ मध्ये प्लेग अटोक्यात आण्यासाठी खूप औषधी नव्हती. आज औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, असेही तज्ज्ञांनी नमूद केले.कचºयाचा फुगा कोणी फुगविला४१६ फेब्रुवारीपासून शहरात कचरा साचला आहे. सुरुवातीचे काही दिवस मनपाने कचरा उचलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. नारेगावच्या आंदोलकांसोबत बोलणी करण्यातच वेळ वाया घालविला. जेव्हा बोलणी अयशस्वी झाली तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. हजारो मेट्रिक टन कचरा शहरात साचल्यावर मनपा भानावर आली.मृत प्राणी कचºयातशहरात ज्या भागात कचºयाचे डोंगर साचले आहेत, त्या कचºयात मरण पावलेले प्राणी आणून टाकण्यात आले आहेत. यातून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.