शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

औरंगाबाद शहरातील २४ हजार मालमत्तांचा झाला सर्व्हे; राजकीय साथ मिळाल्यास मनपास ३०० कोटी मिळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:55 IST

शहरातील मालमत्ता सर्वेक्षणावर १० ते १२ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मनपा आणि आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांकडून दीड महिन्यापूर्वी मालमत्ता सर्वेक्षण सुरू केले.

ठळक मुद्दे५ जून ते ७ जुलैपर्यंत शहरातील तब्बल २४ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांना नवीन कर लावण्याचे आव्हान मनपासमोर राहणार आहे.

औरंगाबाद : शहरातील मालमत्ता सर्वेक्षणावर १० ते १२ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मनपा आणि आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांकडून दीड महिन्यापूर्वी मालमत्ता सर्वेक्षण सुरू केले. ५ जून ते ७ जुलैपर्यंत शहरातील तब्बल २४ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांना नवीन कर लावण्याचे आव्हान मनपासमोर राहणार आहे. राजकीय मंडळींनी या प्रक्रियेला साथ दिल्यास मालमत्ता करातून मनपाला दरवर्षी तब्बल ३०० कोटी रुपये प्राप्त होऊ शकतात.

मागील तीन दशकांत मनपाने मालमत्तांचे सर्वेक्षणच केलेले नाही. नगर परिषदेने, महापालिकेने जुन्या घराला लावलेला कर आजही सुरू आहे. या घराच्या जागेवर आज टोलेजंग इमारत उभी आहे. या नवीन इमारतीला महापालिकेने करच लावलेला नाही. त्यामुळे दरवर्षी प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीसाठी कितीही प्रयत्न केले तर ८० कोटींपेक्षा एक रुपयाही जास्त वसूल होत नाही. यंदा राजकीय मंडळींनी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ३५० कोटी दिले आहे. आतापर्यंत ३० कोटी रुपये वसूल झाले आहेत. मालमत्ता कर महापालिकेचा मोठा आर्थिक कणा आहे. हा कणाच पूर्णपणे मोडकळीस आलेला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शंभर टक्के  सर्वेक्षणाचा निर्णय घेतला.

३२ दिवसांत २४ हजार ५०२ मालमत्तांचे सर्वेक्षण

५ जूनपासून कंत्राटी आणि मनपाच्या २६९ कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. यासाठी वार्डनिहाय पथक तयार करण्यात आले आहे. पथक घरोघरी जाऊन मालमत्तांची मोजणी करीत आहे. प्रत्येक पथकाला दररोज २० मालमत्तांची मोजणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. मालमत्ताधारकांकडून घेण्यात आलेल्या कागदपत्रांचे त्याच दिवशी स्कॅनिंग केले जात आहे. सुरुवातीला रमजान महिना असल्याने ७ हजार ८१० मालमत्तांची मोजणी झाली. त्यानंतरच्या पंधरा दिवसांत पथकांनी जोमाने काम केल्याचे दिसून येत आहे. ५ जुलैपर्यंत १२ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतरच्या दोनच दिवसांत साडेचार हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. ३२ दिवसांत २४ हजार ५०२ मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. रोजची आकडेवारी आयुक्तांकडून तपासली जात आहे. आयुक्तांचा या मोहिमेवर वॉच असल्याने पथके जबाबदारीने काम करीत आहेत. 

पुन्हा सर्वेक्षणाची वेळच नकोइमारतीत फेरबदल, पाणीपट्टीसाठी पुन्हा सर्वेक्षणाची वेळ यायला नको म्हणून याच सर्वेक्षणात महापालिका मालमत्ताधारकांकडे कोणकोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, याचीही माहिती घेत आहेत. नळ एक आहे का दोन, बांधकामात बदल झालेला आहे का? अशा मालमत्तांची वेगळी नोंद केली जात आहे. बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले आहे का? याचीही नोंद सर्वेक्षणाच्या अर्जात घेतली जात आहे. 

सर्वेक्षणाचे प्रभागनिहाय आकडे  प्रभाग-१  : २,५३२  प्रभाग-२  : २,७३०  प्रभाग-३  : १,४३८  प्रभाग-४  : २,७६०  प्रभाग-५  : २,६८६  प्रभाग-६  : ३,२९३  प्रभाग-७  : ३,६०९  प्रभाग-८  : ३,०२३  प्रभाग-९  : २,४३१  एकूण     : २४,५०२

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद