शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

औरंगाबाद शहराचे तापमान ३८.६ च्या वर गेलेच नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:41 IST

उन्हामुळे जनता त्रस्त झाली असून तापमान वाढीचे मोठमोठे आकडे सर्वत्र दाखविले जात आहेत. एकीकडे औरंगाबाद शहरातले तापमान ४२ डिग्री सेल्सिअसच्या वर गेले, असा हाकारा पिटत हवामानाशी संबंधित विविध संस्था सांगत असताना औरंगाबाद शहराचे तापमान ३८.६ डिग्री सेल्सिअसच्या वर गेलेच नाही, असा दावा महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देजनता बुचकळ्यात : खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांचा दावा

ऋचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उन्हामुळे जनता त्रस्त झाली असून तापमान वाढीचे मोठमोठे आकडे सर्वत्र दाखविले जात आहेत. एकीकडे औरंगाबाद शहरातले तापमान ४२ डिग्री सेल्सिअसच्या वर गेले, असा हाकारा पिटत हवामानाशी संबंधित विविध संस्था सांगत असताना औरंगाबाद शहराचे तापमान ३८.६ डिग्री सेल्सिअसच्या वर गेलेच नाही, असा दावा महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे.या संदर्भात अधिक माहिती देताना श्रीनिवास औंधकर म्हणाले की, सध्या तापमान वाढ अशी सर्वत्र ओरड केली जात आहे; पण ही सगळी कृत्रिम तापमान वाढ असून हवेतील आर्द्रता कमी झाल्याचा हा परिणाम आहे. यामुळे शुष्कता निर्माण होऊन कोरडे वारे वाहतात, त्यामुळे उष्णता जास्त वाटते; पण शहरातील तापमानाने अजून चाळिशीही ओलांडली नसून येत्या काळातही अशी शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नाही, असा विश्वासही औंधकर यांनी दिला.ते म्हणाले की, एमजीएम येथील हवामान यंत्रणा ही स्वयंचलित हवामान केंद्रांच्या जागतिक परिमंडळाशी जोडली गेलेली आहे. त्या यंत्रणेवर मंगळवारी (दि.८) दुपारी तीन वाजता शहराचे तापमान ३५.४ दाखविले जात होते आणि स्कायमॅट या संस्थेद्वारे हेच तापमान ४० डिग्री सेल्सिअस दाखविले गेले. दोन संस्थांनी दाखविलेल्या तापमानाचा हा फरक मात्र जनसामान्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे. वाढते सिमेंट काँक्रिटीकरण, वृक्षतोड, प्रदूषण यामुळे शहरी भागात कृत्रिम तापमानात वाढ झाल्याचे औंधकर यांनी सांगितले. एमजीएम संस्थेचीच एक हवामान यंत्रणा गांधेली परिसरात बसविलेली आहे. हा भाग शहराच्या बाहेर येत असल्यामुळे तेथील तापमान हे शहरातील तापमानापेक्षा एक ते दीड डिग्री सेल्सिअसने कमी असलेले आढळून आले. मंगळवारी दुपारी तीन वाजता जेव्हा शहराचे तापमान ३५.४ डिग्री सेल्सिअस होते तेव्हा गांधेली परिसरातील तापमान ३४.७ डिग्री सेल्सिअस मोजले गेले.पुढच्या आठवड्यात पूर्वमान्सून बरसणारउन्हाळा संपत आला असून पुढच्या आठवड्यात १४ मेच्या आसपास पूर्व मान्सून सरी बरसणार असा अंदाज व्यक्त करून औंधकर यांनी उन्हाने त्रस्त झालेल्या जनसामान्यांना एक सुखद दिलासा दिला आहे.मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमीच तापमानमागच्या वर्षी सर्वाधिक तापमान ३९.४ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले होेते. यंदा मात्र त्या तुलनेत कमीच तापमान आहे. ग्लोबल वार्मिंग होत नसून ग्लोबल कूलिंग होत आहे, असे आपण मानतो आणि तापमानातला हा फरकही तेच सांगतो, असेही औंधकर यांनी नमूद केले.

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबाद