शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

औरंगाबाद शहराचे तापमान ३८.६ च्या वर गेलेच नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:41 IST

उन्हामुळे जनता त्रस्त झाली असून तापमान वाढीचे मोठमोठे आकडे सर्वत्र दाखविले जात आहेत. एकीकडे औरंगाबाद शहरातले तापमान ४२ डिग्री सेल्सिअसच्या वर गेले, असा हाकारा पिटत हवामानाशी संबंधित विविध संस्था सांगत असताना औरंगाबाद शहराचे तापमान ३८.६ डिग्री सेल्सिअसच्या वर गेलेच नाही, असा दावा महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देजनता बुचकळ्यात : खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांचा दावा

ऋचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उन्हामुळे जनता त्रस्त झाली असून तापमान वाढीचे मोठमोठे आकडे सर्वत्र दाखविले जात आहेत. एकीकडे औरंगाबाद शहरातले तापमान ४२ डिग्री सेल्सिअसच्या वर गेले, असा हाकारा पिटत हवामानाशी संबंधित विविध संस्था सांगत असताना औरंगाबाद शहराचे तापमान ३८.६ डिग्री सेल्सिअसच्या वर गेलेच नाही, असा दावा महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे.या संदर्भात अधिक माहिती देताना श्रीनिवास औंधकर म्हणाले की, सध्या तापमान वाढ अशी सर्वत्र ओरड केली जात आहे; पण ही सगळी कृत्रिम तापमान वाढ असून हवेतील आर्द्रता कमी झाल्याचा हा परिणाम आहे. यामुळे शुष्कता निर्माण होऊन कोरडे वारे वाहतात, त्यामुळे उष्णता जास्त वाटते; पण शहरातील तापमानाने अजून चाळिशीही ओलांडली नसून येत्या काळातही अशी शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नाही, असा विश्वासही औंधकर यांनी दिला.ते म्हणाले की, एमजीएम येथील हवामान यंत्रणा ही स्वयंचलित हवामान केंद्रांच्या जागतिक परिमंडळाशी जोडली गेलेली आहे. त्या यंत्रणेवर मंगळवारी (दि.८) दुपारी तीन वाजता शहराचे तापमान ३५.४ दाखविले जात होते आणि स्कायमॅट या संस्थेद्वारे हेच तापमान ४० डिग्री सेल्सिअस दाखविले गेले. दोन संस्थांनी दाखविलेल्या तापमानाचा हा फरक मात्र जनसामान्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे. वाढते सिमेंट काँक्रिटीकरण, वृक्षतोड, प्रदूषण यामुळे शहरी भागात कृत्रिम तापमानात वाढ झाल्याचे औंधकर यांनी सांगितले. एमजीएम संस्थेचीच एक हवामान यंत्रणा गांधेली परिसरात बसविलेली आहे. हा भाग शहराच्या बाहेर येत असल्यामुळे तेथील तापमान हे शहरातील तापमानापेक्षा एक ते दीड डिग्री सेल्सिअसने कमी असलेले आढळून आले. मंगळवारी दुपारी तीन वाजता जेव्हा शहराचे तापमान ३५.४ डिग्री सेल्सिअस होते तेव्हा गांधेली परिसरातील तापमान ३४.७ डिग्री सेल्सिअस मोजले गेले.पुढच्या आठवड्यात पूर्वमान्सून बरसणारउन्हाळा संपत आला असून पुढच्या आठवड्यात १४ मेच्या आसपास पूर्व मान्सून सरी बरसणार असा अंदाज व्यक्त करून औंधकर यांनी उन्हाने त्रस्त झालेल्या जनसामान्यांना एक सुखद दिलासा दिला आहे.मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमीच तापमानमागच्या वर्षी सर्वाधिक तापमान ३९.४ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले होेते. यंदा मात्र त्या तुलनेत कमीच तापमान आहे. ग्लोबल वार्मिंग होत नसून ग्लोबल कूलिंग होत आहे, असे आपण मानतो आणि तापमानातला हा फरकही तेच सांगतो, असेही औंधकर यांनी नमूद केले.

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबाद