शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

सिमी, इसिस, सनातनच्या विळख्यात औरंगाबाद शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:42 IST

मराठवाड्यातील तरुण सिमी, इसिस आणि सनातनसारख्या कट्टर धर्मवादी संघटनांच्या विळख्यात अडकू लागले आहेत.

ठळक मुद्देकट्टरतेची बीजं तरुणांच्या डोक्यात पेरण्याचा दहशती उपक्रम मराठवाड्यात सुरुमागील काही वर्षांमधील घटना चिंताजनक आहेत

औरंगाबाद : मराठवाड्यातील तरुण सिमी, इसिस आणि सनातनसारख्या कट्टर धर्मवादी संघटनांच्या विळख्यात अडकू लागले आहेत. धर्मकट्टरतेची बीजं तरुणांच्या डोक्यात पेरण्याच्या दहशती उपक्रमात तरुणांचा वाढता सहभाग असल्याचे मागील काही वर्षांतील घटनांमुळे स्पष्ट होत आहे.

सिमी (स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया) या संघटनेची पाळेमुळे मराठवाड्यात असल्याचे अनेकदा सिद्ध झाले. सिमी या संघटनेवर बंदी आणल्यानंतर इसिसच्या (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया) हस्तकांचे मराठवाड्यात विशेषत: औरंगाबादपासून पूर्ण विभागात जाळे असल्याची मािहती पुढे आली आणि आता सनातन या संस्थेच्या सहा जणांना आजवर दहशतवादी विरोधी पथक, सीबीआयच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येशी निगडित तपास एटीएस आणि सीबीआय करीत आहे. पुणे, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यापर्यंत त्या हत्येचे कनेक्शन असल्याचे समोर येत आहे.

सिमीचे नेटवर्क पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, जालना ते नांदेड असे होते. इसिसचे नेटवर्कदेखील याच दिशेने असल्याचे २०१६ मध्ये समोर आले. मराठवाड्यातील १०० तरुण इसिसचे हस्तक असल्याची तक्रारही मध्यंतरी पोलिसांकडे लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानंतर आता सनातनचे नेटवर्कदेखील पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड असेच असल्याची शक्यता तपासयंत्रणा वर्तवित आहे. विभागातील काही घटना२००२ मध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद स्फोटाप्रकरणी ११ जणांना ताब्यात घेतले होते. २००३ मध्ये परभणीतील स्फोटात हिंदुत्वादी संघटनांशी निगडित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

२००६ मध्ये औरंगाबाद ते नाशिक हायवेवर १७ जणांकडून एटीएसने ४३ किलो आरडीएक्स, १६ एके-४७, ५० हॅण्ड ग्रेनेड हस्तगत केले होते. २०१० मध्ये पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटानंतर इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा, सिमी, इसिस या संघटनेच्या हस्तकांचा शोध घेत एटीएसने मराठवाड्यातही कारवाई केल्या. २०१२ मध्ये हिमायतबागमध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक एनकाऊंटरमध्ये मारला गेला.

सनातनशी निगडित सहा जण ताब्यातसनातन या संस्थेशी निगडित सहा जणांना आजवर सीबीआय आणि एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शरद कळसकर, सचिन अंदुरे, श्रीकांत पांगरकर, रोहित रेगे, अजिंक्य सुरळे, शुभम सुरळे यांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी पहाटे रेगे आणि सुरळे अशा तिघांना ताब्यात घेतल्याची नोंद सातारा पोलीस ठाण्यात एटीएसने केली आहे.

पोलीस यंत्रणा कमी पडत असावीअलीकडच्या काळात मराठवाड्यात सिमी, इसिस, सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांचे नेटवर्क फोफावत चालले आहे. एटीएस आणि सीबीआयला येऊन येथे कारवाई करावी लागते आहे. याबाबत सेवानिवृत्त सनदी पोलीस अधिकारी सुधाकर सुरडकर यांच्याशी संपर्क करून नेमक्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सुरडकर म्हणाले, वेगवेगळ्या संघटनांचे नेटवर्क फोफावत आहे, याचा अर्थ पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे स्पष्टच आहे. पोलिसांचे काम नियंत्रण मिळविणे आहे. नियंत्रण मिळविण्यासाठी माहिती लागते. माहिती मिळण्यासाठी लोकांचा पोलिसांवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. पोलिसांना माहिती मिळत नाही, याचा अर्थ लोकांचा यंत्रणेवर विश्वास नाही. लोकांचा विश्वास मिळवावा लागेल. जेणेकरून दहशतवादी संघटनांच्या कारवायांची खडान्खडा माहिती पोलिसांना मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस