शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

४० टक्क्यांहून अधिक मते घेणारा ठरेल औरंगाबाद 'मध्य'चा विजेता; उमेदवारांचा कस लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 19:18 IST

२०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. आता ३ लाख ६६ हजार मतदार आहेत. यंदा ६० टक्के मतदान झाले, तर २ लाख १९ हजार होईल.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात निवडून येण्यासाठी किमान ४० टक्क्यांहून अधिक मतदान उमेदवाराला घ्यावेच लागते. मागील दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास झालेल्या मतदानापैकी ४० ते ४२ टक्के मतांची गरज विजयासाठी असते. कोणत्याही एका बाजूला मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले, तर ३२ टक्के मते घेऊनही उमेदवार निवडून आल्याचा या मतदारसंघाचा इतिहास आहे.

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मध्य मतदारसंघात २ लाख ८६ हजार मतदान होते. मतदानाच्या दिवशी १ लाख ८८ हजार ४६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील वैध मतांची संख्या १ लाख ८७ हजार ६३६ होती. ६५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत तनवाणी यांना २१.८, तर जैस्वाल यांना २२.२ टक्के मतदान मिळाले. या दोघांच्या मतांची एकूण टक्केवारी ४३.८ होते. मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला. इम्तियाज जलील अवघ्या ३२ टक्के मतांवर निवडून आले होते.

२०१९ ची स्थिती२०१९ मध्ये एमआयएम विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. यावेळी मतदान ३ लाख १९ हजार ७४४ होते. प्रत्यक्षात १ लाख ९३ हजार १५५ मतदान झाले. टक्केवारी ६०.८ होती. निकालाच्या दिवशी जैस्वाल यांना ४२.६ टक्के, तर एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना ३५.४ टक्के मतदान झाले होते.

आताचे चित्र असे :२०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. आता ३ लाख ६६ हजार मतदार आहेत. यंदा ६० टक्के मतदान झाले, तर २ लाख १९ हजार होईल. निवडून येण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला किमान ४० टक्के म्हणजेच ८७ हजार ८५३ मतदान घ्यावे लागेल. मतदारसंघात लढत शिंदेसेना विरुद्ध एमआयएम अशीच होईल. हिंदू बहुल भागात उद्धवसेनेचे उमेदवार आणि मुस्लिम बहुल भागात वंचितचे उमेदवार किती मतदान घेतील यावर बरेच काही अवलंबून असेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्य