शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

४० टक्क्यांहून अधिक मते घेणारा ठरेल औरंगाबाद 'मध्य'चा विजेता; उमेदवारांचा कस लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 19:18 IST

२०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. आता ३ लाख ६६ हजार मतदार आहेत. यंदा ६० टक्के मतदान झाले, तर २ लाख १९ हजार होईल.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात निवडून येण्यासाठी किमान ४० टक्क्यांहून अधिक मतदान उमेदवाराला घ्यावेच लागते. मागील दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास झालेल्या मतदानापैकी ४० ते ४२ टक्के मतांची गरज विजयासाठी असते. कोणत्याही एका बाजूला मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले, तर ३२ टक्के मते घेऊनही उमेदवार निवडून आल्याचा या मतदारसंघाचा इतिहास आहे.

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मध्य मतदारसंघात २ लाख ८६ हजार मतदान होते. मतदानाच्या दिवशी १ लाख ८८ हजार ४६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील वैध मतांची संख्या १ लाख ८७ हजार ६३६ होती. ६५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत तनवाणी यांना २१.८, तर जैस्वाल यांना २२.२ टक्के मतदान मिळाले. या दोघांच्या मतांची एकूण टक्केवारी ४३.८ होते. मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला. इम्तियाज जलील अवघ्या ३२ टक्के मतांवर निवडून आले होते.

२०१९ ची स्थिती२०१९ मध्ये एमआयएम विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. यावेळी मतदान ३ लाख १९ हजार ७४४ होते. प्रत्यक्षात १ लाख ९३ हजार १५५ मतदान झाले. टक्केवारी ६०.८ होती. निकालाच्या दिवशी जैस्वाल यांना ४२.६ टक्के, तर एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना ३५.४ टक्के मतदान झाले होते.

आताचे चित्र असे :२०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. आता ३ लाख ६६ हजार मतदार आहेत. यंदा ६० टक्के मतदान झाले, तर २ लाख १९ हजार होईल. निवडून येण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला किमान ४० टक्के म्हणजेच ८७ हजार ८५३ मतदान घ्यावे लागेल. मतदारसंघात लढत शिंदेसेना विरुद्ध एमआयएम अशीच होईल. हिंदू बहुल भागात उद्धवसेनेचे उमेदवार आणि मुस्लिम बहुल भागात वंचितचे उमेदवार किती मतदान घेतील यावर बरेच काही अवलंबून असेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्य