शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

४० टक्क्यांहून अधिक मते घेणारा ठरेल औरंगाबाद 'मध्य'चा विजेता; उमेदवारांचा कस लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 19:18 IST

२०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. आता ३ लाख ६६ हजार मतदार आहेत. यंदा ६० टक्के मतदान झाले, तर २ लाख १९ हजार होईल.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात निवडून येण्यासाठी किमान ४० टक्क्यांहून अधिक मतदान उमेदवाराला घ्यावेच लागते. मागील दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास झालेल्या मतदानापैकी ४० ते ४२ टक्के मतांची गरज विजयासाठी असते. कोणत्याही एका बाजूला मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले, तर ३२ टक्के मते घेऊनही उमेदवार निवडून आल्याचा या मतदारसंघाचा इतिहास आहे.

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मध्य मतदारसंघात २ लाख ८६ हजार मतदान होते. मतदानाच्या दिवशी १ लाख ८८ हजार ४६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील वैध मतांची संख्या १ लाख ८७ हजार ६३६ होती. ६५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत तनवाणी यांना २१.८, तर जैस्वाल यांना २२.२ टक्के मतदान मिळाले. या दोघांच्या मतांची एकूण टक्केवारी ४३.८ होते. मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला. इम्तियाज जलील अवघ्या ३२ टक्के मतांवर निवडून आले होते.

२०१९ ची स्थिती२०१९ मध्ये एमआयएम विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. यावेळी मतदान ३ लाख १९ हजार ७४४ होते. प्रत्यक्षात १ लाख ९३ हजार १५५ मतदान झाले. टक्केवारी ६०.८ होती. निकालाच्या दिवशी जैस्वाल यांना ४२.६ टक्के, तर एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना ३५.४ टक्के मतदान झाले होते.

आताचे चित्र असे :२०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. आता ३ लाख ६६ हजार मतदार आहेत. यंदा ६० टक्के मतदान झाले, तर २ लाख १९ हजार होईल. निवडून येण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला किमान ४० टक्के म्हणजेच ८७ हजार ८५३ मतदान घ्यावे लागेल. मतदारसंघात लढत शिंदेसेना विरुद्ध एमआयएम अशीच होईल. हिंदू बहुल भागात उद्धवसेनेचे उमेदवार आणि मुस्लिम बहुल भागात वंचितचे उमेदवार किती मतदान घेतील यावर बरेच काही अवलंबून असेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्य