शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

औरंगाबाद बनू शकते ‘आयटी’ हब

By admin | Updated: July 3, 2016 00:50 IST

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी), स्मार्ट सिटीमुळे दिग्गज ‘आयटी’ कंपन्या औरंगाबादकडे आकर्षित होत आहेत.

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी), स्मार्ट सिटीमुळे दिग्गज ‘आयटी’ कंपन्या औरंगाबादकडे आकर्षित होत आहेत. आॅटोमोबाईल उद्योगाच्या बाबतीत ‘मिनी डेट्रॉईड’ समजल्या जाणारे हे शहर भविष्यात ‘आयटी हब’ बनू शकते, असा विश्वास नॅसकॉमचे विभागीय प्रमुख प्रसाद देवरे यांनी शनिवारी व्यक्त केला. नॅसकॉमच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयटी उद्योगांतील संधी’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यानिमित्त औरंगाबादेत आलेल्या देवरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नॅसकॉमच्या स्नेहा सहस्त्रबुद्धे, सावन चुडीवाल, पीयूष कासलीवाल आदी उपस्थित होते. देवरे म्हणाले की, आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात दिले जाणारे शिक्षण आणि नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य यांच्यात मोठी तफावत जाणवते. ही तफावत दूर करण्यासाठी नॅसकॉमतर्फे आयटी क्षेत्रातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जात आहे. जगभरात झपाट्याने वाढणारा उद्योग म्हणून ‘आयटी’ क्षेत्राकडे बघितले जाते. या क्षेत्रात भौगोलिक बंधने नसल्याने ‘लोकल टू ग्लोबल’ व्यवसाय करणे सहज शक्य आहे. औरंगाबादेत लहान मोठ्या ५० ‘आयटी’ कंपन्या आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात त्या सेवा पुरवितात. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील युवकांना ‘आयटी’ क्षेत्र काबीज करण्याची संधी आहे. स्टार्टअप केंद्रासाठी चाचपणी स्टार्टअप ‘आयटी’ उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नॅसकॉमतर्फे देशभरात सात, तर राज्यात दोन स्टार्टअप केंद्रे उभारण्यात आली आहेत. ‘आयटी’ उत्पादने तयार करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन, निधी आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या केंद्रांतर्फे सहकार्य केले जाते. औरंगाबादच्या आयटी उद्योजक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास येथेही स्टार्टअप केंद्र उभारता येऊ शकते. त्यामुळे औरंगाबादच्या युवकांना रोजगारासाठी पुणे आणि मुंबईसारख्या शहरात जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही देवरे यांनी सांगितले.