शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद बनू शकते ‘आयटी’ हब

By admin | Updated: July 3, 2016 00:50 IST

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी), स्मार्ट सिटीमुळे दिग्गज ‘आयटी’ कंपन्या औरंगाबादकडे आकर्षित होत आहेत.

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी), स्मार्ट सिटीमुळे दिग्गज ‘आयटी’ कंपन्या औरंगाबादकडे आकर्षित होत आहेत. आॅटोमोबाईल उद्योगाच्या बाबतीत ‘मिनी डेट्रॉईड’ समजल्या जाणारे हे शहर भविष्यात ‘आयटी हब’ बनू शकते, असा विश्वास नॅसकॉमचे विभागीय प्रमुख प्रसाद देवरे यांनी शनिवारी व्यक्त केला. नॅसकॉमच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयटी उद्योगांतील संधी’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यानिमित्त औरंगाबादेत आलेल्या देवरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नॅसकॉमच्या स्नेहा सहस्त्रबुद्धे, सावन चुडीवाल, पीयूष कासलीवाल आदी उपस्थित होते. देवरे म्हणाले की, आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात दिले जाणारे शिक्षण आणि नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य यांच्यात मोठी तफावत जाणवते. ही तफावत दूर करण्यासाठी नॅसकॉमतर्फे आयटी क्षेत्रातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जात आहे. जगभरात झपाट्याने वाढणारा उद्योग म्हणून ‘आयटी’ क्षेत्राकडे बघितले जाते. या क्षेत्रात भौगोलिक बंधने नसल्याने ‘लोकल टू ग्लोबल’ व्यवसाय करणे सहज शक्य आहे. औरंगाबादेत लहान मोठ्या ५० ‘आयटी’ कंपन्या आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात त्या सेवा पुरवितात. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील युवकांना ‘आयटी’ क्षेत्र काबीज करण्याची संधी आहे. स्टार्टअप केंद्रासाठी चाचपणी स्टार्टअप ‘आयटी’ उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नॅसकॉमतर्फे देशभरात सात, तर राज्यात दोन स्टार्टअप केंद्रे उभारण्यात आली आहेत. ‘आयटी’ उत्पादने तयार करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन, निधी आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या केंद्रांतर्फे सहकार्य केले जाते. औरंगाबादच्या आयटी उद्योजक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास येथेही स्टार्टअप केंद्र उभारता येऊ शकते. त्यामुळे औरंगाबादच्या युवकांना रोजगारासाठी पुणे आणि मुंबईसारख्या शहरात जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही देवरे यांनी सांगितले.