शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

औरंगाबादमध्ये भाजप-एमआयएममध्ये ‘समांतर’वरून खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:28 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यंमत्री, राज्यसभेवरील खासदारांचा समांतर जलवाहिनी योजना मंजुरीसाठी मनपावर दबाव असल्याचा आरोप एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला.

ठळक मुद्देशिवसेनेची सावध भूमिका : सावे, केणेकर, जलील यांच्यात वादावादी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यंमत्री, राज्यसभेवरील खासदारांचा समांतर जलवाहिनी योजना मंजुरीसाठी मनपावर दबाव असल्याचा आरोप एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. त्यांच्या या आरोपावर आ. अतुल सावे, सदस्य संजय केणेकर यांनी आगपाखड करीत जलील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. या सगळ्या शाब्दिक गदारोळात शिवसेनेने सावध भूमिका घेतली. पालकमंत्री डॉ.दीपक सावंत म्हणाले, मनपाने योजनेचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावा. शासन त्याबाबत निर्णय घेईल.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज डीपीसीची बैठक पार पडली. यावेळी आ.सावे म्हणाले, समांतरसाठी कोर्टाबाहेर ‘कॉम्प्रमाईज डीड’ (तडजोड करार) झाली पाहिजे. सध्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ४० वर्षे जुन्या झाल्या आहेत. शहरात ३ ते ४ दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. समांतरबाबत पालकमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी. सावे सभागृहात मत व्यक्त करून बसत नाहीत तोवरच लगेचच आ.जलील म्हणाले, शिवसेनेचे नेते रामदास कदम हे पालकमंत्री असताना त्यांनी समांतर जलवाहिनी योजनेच्या न्यायालयाबाहेर (पान २ वर)आयुक्त म्हणतात, काहीतरी केले पाहिजेमनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक म्हणाले, सुरुवातीला ३५० कोटींची योजना होती. पीपीपीवर योजना कार्यान्वित करण्याचे ठरले.२ वर्षांत कंपनी काम करीत नसल्याचे समोर आले. त्यामुळे करार रद्द झाला. पाणीपुरवठ्याचे अद्ययावतीकरणाचे काम ठप्प पडले आहे. योजना पुनरुजीवित करण्यासाठी चर्चा होत आहे. कंपनीने दिलेला अहवाल सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.२७ आॅगस्ट रोजी योजनेबाबत सभा आहे. त्यात चर्चा होईल. ६१ कि़मी. जलवाहिनी टाकणे, ३२ जलकुंभांची कमतरता आहे. १५०० कि़मी. अंतर्गत जलवाहिन्यांचे काम आहे. सातारा-देवळाई पाण्यापासून वंचित आहे.मनपाकडे अधिकारी कमी आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमनपाला अभियंते देण्यास तयार नाही. ३० अभियंत्यांची गरज आहे. एका उपअभियंत्यावर पूर्ण विभाग काम करीत आहे. एक्स्प्रेस जलवाहिनीवर अनधिकृत नळकनेक्शन आहेत. विद्युत मोटारी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेची अवस्था दयनीय आहे. यावर काहीतरी केले पाहिजे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater transportजलवाहतूकBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन