शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये भाजप-एमआयएममध्ये ‘समांतर’वरून खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:28 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यंमत्री, राज्यसभेवरील खासदारांचा समांतर जलवाहिनी योजना मंजुरीसाठी मनपावर दबाव असल्याचा आरोप एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला.

ठळक मुद्देशिवसेनेची सावध भूमिका : सावे, केणेकर, जलील यांच्यात वादावादी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यंमत्री, राज्यसभेवरील खासदारांचा समांतर जलवाहिनी योजना मंजुरीसाठी मनपावर दबाव असल्याचा आरोप एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. त्यांच्या या आरोपावर आ. अतुल सावे, सदस्य संजय केणेकर यांनी आगपाखड करीत जलील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. या सगळ्या शाब्दिक गदारोळात शिवसेनेने सावध भूमिका घेतली. पालकमंत्री डॉ.दीपक सावंत म्हणाले, मनपाने योजनेचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावा. शासन त्याबाबत निर्णय घेईल.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज डीपीसीची बैठक पार पडली. यावेळी आ.सावे म्हणाले, समांतरसाठी कोर्टाबाहेर ‘कॉम्प्रमाईज डीड’ (तडजोड करार) झाली पाहिजे. सध्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ४० वर्षे जुन्या झाल्या आहेत. शहरात ३ ते ४ दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. समांतरबाबत पालकमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी. सावे सभागृहात मत व्यक्त करून बसत नाहीत तोवरच लगेचच आ.जलील म्हणाले, शिवसेनेचे नेते रामदास कदम हे पालकमंत्री असताना त्यांनी समांतर जलवाहिनी योजनेच्या न्यायालयाबाहेर (पान २ वर)आयुक्त म्हणतात, काहीतरी केले पाहिजेमनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक म्हणाले, सुरुवातीला ३५० कोटींची योजना होती. पीपीपीवर योजना कार्यान्वित करण्याचे ठरले.२ वर्षांत कंपनी काम करीत नसल्याचे समोर आले. त्यामुळे करार रद्द झाला. पाणीपुरवठ्याचे अद्ययावतीकरणाचे काम ठप्प पडले आहे. योजना पुनरुजीवित करण्यासाठी चर्चा होत आहे. कंपनीने दिलेला अहवाल सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.२७ आॅगस्ट रोजी योजनेबाबत सभा आहे. त्यात चर्चा होईल. ६१ कि़मी. जलवाहिनी टाकणे, ३२ जलकुंभांची कमतरता आहे. १५०० कि़मी. अंतर्गत जलवाहिन्यांचे काम आहे. सातारा-देवळाई पाण्यापासून वंचित आहे.मनपाकडे अधिकारी कमी आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमनपाला अभियंते देण्यास तयार नाही. ३० अभियंत्यांची गरज आहे. एका उपअभियंत्यावर पूर्ण विभाग काम करीत आहे. एक्स्प्रेस जलवाहिनीवर अनधिकृत नळकनेक्शन आहेत. विद्युत मोटारी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेची अवस्था दयनीय आहे. यावर काहीतरी केले पाहिजे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater transportजलवाहतूकBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन