शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

औरंगाबादमध्ये भाजप-एमआयएममध्ये ‘समांतर’वरून खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:28 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यंमत्री, राज्यसभेवरील खासदारांचा समांतर जलवाहिनी योजना मंजुरीसाठी मनपावर दबाव असल्याचा आरोप एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला.

ठळक मुद्देशिवसेनेची सावध भूमिका : सावे, केणेकर, जलील यांच्यात वादावादी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यंमत्री, राज्यसभेवरील खासदारांचा समांतर जलवाहिनी योजना मंजुरीसाठी मनपावर दबाव असल्याचा आरोप एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. त्यांच्या या आरोपावर आ. अतुल सावे, सदस्य संजय केणेकर यांनी आगपाखड करीत जलील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. या सगळ्या शाब्दिक गदारोळात शिवसेनेने सावध भूमिका घेतली. पालकमंत्री डॉ.दीपक सावंत म्हणाले, मनपाने योजनेचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावा. शासन त्याबाबत निर्णय घेईल.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज डीपीसीची बैठक पार पडली. यावेळी आ.सावे म्हणाले, समांतरसाठी कोर्टाबाहेर ‘कॉम्प्रमाईज डीड’ (तडजोड करार) झाली पाहिजे. सध्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ४० वर्षे जुन्या झाल्या आहेत. शहरात ३ ते ४ दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. समांतरबाबत पालकमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी. सावे सभागृहात मत व्यक्त करून बसत नाहीत तोवरच लगेचच आ.जलील म्हणाले, शिवसेनेचे नेते रामदास कदम हे पालकमंत्री असताना त्यांनी समांतर जलवाहिनी योजनेच्या न्यायालयाबाहेर (पान २ वर)आयुक्त म्हणतात, काहीतरी केले पाहिजेमनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक म्हणाले, सुरुवातीला ३५० कोटींची योजना होती. पीपीपीवर योजना कार्यान्वित करण्याचे ठरले.२ वर्षांत कंपनी काम करीत नसल्याचे समोर आले. त्यामुळे करार रद्द झाला. पाणीपुरवठ्याचे अद्ययावतीकरणाचे काम ठप्प पडले आहे. योजना पुनरुजीवित करण्यासाठी चर्चा होत आहे. कंपनीने दिलेला अहवाल सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.२७ आॅगस्ट रोजी योजनेबाबत सभा आहे. त्यात चर्चा होईल. ६१ कि़मी. जलवाहिनी टाकणे, ३२ जलकुंभांची कमतरता आहे. १५०० कि़मी. अंतर्गत जलवाहिन्यांचे काम आहे. सातारा-देवळाई पाण्यापासून वंचित आहे.मनपाकडे अधिकारी कमी आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमनपाला अभियंते देण्यास तयार नाही. ३० अभियंत्यांची गरज आहे. एका उपअभियंत्यावर पूर्ण विभाग काम करीत आहे. एक्स्प्रेस जलवाहिनीवर अनधिकृत नळकनेक्शन आहेत. विद्युत मोटारी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेची अवस्था दयनीय आहे. यावर काहीतरी केले पाहिजे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater transportजलवाहतूकBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन