शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये औरंगाबाद खंडपीठ देशात सर्वप्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 19:21 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीतर्फे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १,१५८ प्रकरणे निकाली निघाली. भूसंपादनाची एकूण १,५०० पैकी १,१३५ प्रकरणे आणि मोटार अपघाताची १७७ पैकी २३ प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यात आली.

ठळक मुद्देएकाच दिवसात १,१५८ प्रकरणे निकालीयामुळे शासनाच्या सुमारे दहा कोटी रुपयांची बचत झाली आहे. 

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठातील उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीतर्फे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १,१५८ प्रकरणे निकाली निघाली. भूसंपादनाची एकूण १,५०० पैकी १,१३५ प्रकरणे आणि मोटार अपघाताची १७७ पैकी २३ प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यात आली. यामुळे शासनाच्या सुमारे दहा कोटी रुपयांची बचत झाली आहे. 

वरील निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या पाहता संपूर्ण देशातील उच्च न्यायालयांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रकरणे निकाली काढण्याची ही पहिली वेळ आहे, असे उपसमितीतर्फे कळविण्यात आले आहे.  या वर्षातील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकूण निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या जवळपास २,४६५ एवढी आहे. सदरील प्रकरणे निकाली निघाल्यामुळे शासनाचा वेळ, खर्च व मनुष्यबळाची निश्चितच बचत झालेली आहे. तसेच हजाराहून अधिक पक्षकारांना विनाविलंब व त्वरित न्याय व नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे पक्षकारांचा प्रकरणे मिटवण्यासाठी ओघ वाढलेला आहे. उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीचे चेअरमन न्या. रवींद्र बोर्डे यांच्या आदेशावरून आणि प्रबंधक एच.ए. पाटील आणि आर.आर. काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबर रोजी खंडपीठात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते.

या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी न्या. व्ही.के. जाधव, न्या. पी.आर. बोरा, न्या. ए.एम. ढवळे, माजी जिल्हा न्यायाधीश ए.टी.ए.के. शेख, अ‍ॅड. के.बी. चौधरी, अ‍ॅड. के.सी. संत, अ‍ॅड. एस.पी. ब्रह्मे, अ‍ॅड. दसगावकर, अ‍ॅड. परांजपे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, सहायक सरकारील वकील अभिजित फुले, भूषण विर्धे, श्रीरंग दंडे, रवींद्र देशमुख, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, शिवानंद टाकसाळे, पी.एल. सोरमारे, न्यायमूर्तींचे खाजगी सचिव अनिल भुन्ने, राजशिष्टाचार अधिकारी अरुण बक्षी, प्रभारी आस्थापना अधिकारी प्रमोद फटके आदींनी परिश्रम  घेतले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय