शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
2
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
5
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
6
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
7
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
9
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
10
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
11
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
12
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
13
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
14
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
15
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
16
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
17
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
18
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
19
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
20
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव

औरंगाबादेतील ए एस क्लब-साजापूर चौफुली रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 6:07 PM

वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील ए एस क्लब ते साजापूर चौफुली रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असले तरी अद्याप ए एस क्लब ते साजापूर चौकाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनाधारकांची गैरसोय होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील ए एस क्लब ते साजापूर चौफुली रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असले तरी अद्याप ए एस क्लब ते साजापूर चौकाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनाधारकांची गैरसोय होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

दहा वर्षांपूर्वी मुंबई-नागपूर महामार्गाचे काम करण्यात आले आहे. सध्या या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उखडल्याने जागो जागी खड्डे पडले आहेत. साईड पंख्याचीही दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपासून तर अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेला असून, अनेकजण कायमचे अपंग झाले आहेत. खडड््यामुळे ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही.

तुकडे पाडून रस्त्याचे काम...महामार्गाची दुरावस्था व वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून लासूर ते ए एस क्लब लिंक रोड रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ६ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या कामाचे १९ सप्टेंबरला आ. प्रशांत बंब यांच्या हस्ते उद्घाटनही झाले आहे. मात्र, रस्त्याचे तुकडे पाडून काम केले जात असल्याने साजापूर चौफुली ते ए एस क्लब लिंक रोड चौक रस्त्याचे काम लांबणीवर पडले असून हे काम प्रत्यक्षात केव्हा सुरु होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रस्त्याचे काम लवकर करावे ..रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने रस्त्याचे काम हाती घेवून लवकर पूर्ण करावे, असे तीसगावचे ग्रा.पं. सदस्य संजय जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबादroad transportरस्ते वाहतूक