शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत गडचिरोली, कर्नाटकातून नवीन तांदळाची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:13 IST

बाजारगप्पा :  औरंगाबादेतील धान्य बाजारपेठेत परपेठेतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली.

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)

औरंगाबाद धान्य बाजारपेठेत मागील आठवड्यात गडचिरोली व कर्नाटकहून नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. ग्राहकांना दिलासा म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी व डाळींचे भाव स्थिर होते. 

औरंगाबादेतील धान्य बाजारपेठेत परपेठेतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली. यात गडचिरोली येथील एचएमटी, बीपीटी तांदळाचा समावेश आहे. तसेच कर्नाटक राज्यातूनही तांदळाची आवक सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातून आलेला एचएमटी तांदूळ ४२०० रुपये तर बीपीटी तांदूळ ३००० रुपये प्रतिक्ंिवटल विक्री होत आहे. मागील वर्षी सुरुवातीला या तांदळाचे हेच भाव होते. कर्नाटकमधून आलेल्या नवीन तांदळाचे भाव ३१०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात विविध राज्यांतील नवीन तांदूळ स्थानिक बाजारात दाखल होईल. जानेवारी महिन्यात तांदळाच्या ५० ते ७० प्रकारच्या व्हरायटी दाखल होतील. 

मागील दोन ते तीन वर्षांच्या खंडानंतर चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उत्तर प्रदेशातील नवीन बाजरी बाजारात दाखल झाली होती. यामुळे बाजरीचे भाव १०० रुपयांनी उतरून २००० ते २२५० रुपये प्रतिक्ंिवटल विक्री झाली. उत्तर प्रदेशातील बाजरीची आवक आणखी वाढल्यास भाव आणखी कमी होतील, अशी  शक्यता होलसेल विक्रेत्यांनी व्यक्त केली. मात्र, मागील आठवड्यात बाजरीचे भाव स्थिर होते. 

दुष्काळामुळे ज्वारीची पेरणी कमी झाल्याने ज्वारीचे भाव २६५० ते ३५०० रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत जाऊन पोहोचले. यामुळे व्यापाऱ्यांनी शेजारील कर्नाटक राज्यातून नवीन ज्वारी बाजारात विक्रीला आणली. मागील आठवड्यातही १ हजार क्ंिवटल ज्वारीची आवक झाली. २४०० ते २७०० रुपये प्रतिक्ंिवटलदरम्यान ज्वारीचे भाव स्थिर होते. गव्हाची पेरणी कमी असल्याने मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतून येणाऱ्या गव्हावरच अवलंबून राहावे लागणार आहे. गव्हाचे भावही मागील आठवड्यात स्थिर होते.

मध्यंतरी डाळींच्या भावात मोठी वाढ झाली. मात्र, उठाव घटल्याने डाळींच्या भाववाढीला लगाम लागला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात डाळींचे भाव स्थिर होते. हरभरा डाळ ५९०० ते ६१०० रुपये प्रतिक्ंिवटल, तूर डाळ ६००० ते ६३०० रुपये, उडीद डाळ ४००० ते ५२०० रुपये, मूग डाळ ६८०० ते ७३०० रुपये तर मसूर डाळ ४९०० ते ५२०० रुपये प्रतिक्ंिवटलवर स्थिर होते. औरंगाबाद जाधववाडी येथील अडत बाजारात येणाऱ्या मक्याची आवक संपुष्टात आली आहे.

दुष्काळामुळे पेराच कमी असल्याने ज्वारी, गव्हाच्या पिकावर याचा परिणाम होणार असून फेब्रुवारी महिन्यात ज्वारी, गव्हाची आवक किती होईल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिक आवकवर अवलंबून असलेल्या अडत  बाजारातील व्यवहार बंद पडायच्या मार्गावर आहे.  यापुढील सर्व मदार परपेठेतील आवकवर अवलंबून राहणार असल्याचे येथील व्यापाऱ्यांली सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी