शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

औरंगाबादेत गडचिरोली, कर्नाटकातून नवीन तांदळाची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:13 IST

बाजारगप्पा :  औरंगाबादेतील धान्य बाजारपेठेत परपेठेतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली.

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)

औरंगाबाद धान्य बाजारपेठेत मागील आठवड्यात गडचिरोली व कर्नाटकहून नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. ग्राहकांना दिलासा म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी व डाळींचे भाव स्थिर होते. 

औरंगाबादेतील धान्य बाजारपेठेत परपेठेतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली. यात गडचिरोली येथील एचएमटी, बीपीटी तांदळाचा समावेश आहे. तसेच कर्नाटक राज्यातूनही तांदळाची आवक सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातून आलेला एचएमटी तांदूळ ४२०० रुपये तर बीपीटी तांदूळ ३००० रुपये प्रतिक्ंिवटल विक्री होत आहे. मागील वर्षी सुरुवातीला या तांदळाचे हेच भाव होते. कर्नाटकमधून आलेल्या नवीन तांदळाचे भाव ३१०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात विविध राज्यांतील नवीन तांदूळ स्थानिक बाजारात दाखल होईल. जानेवारी महिन्यात तांदळाच्या ५० ते ७० प्रकारच्या व्हरायटी दाखल होतील. 

मागील दोन ते तीन वर्षांच्या खंडानंतर चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उत्तर प्रदेशातील नवीन बाजरी बाजारात दाखल झाली होती. यामुळे बाजरीचे भाव १०० रुपयांनी उतरून २००० ते २२५० रुपये प्रतिक्ंिवटल विक्री झाली. उत्तर प्रदेशातील बाजरीची आवक आणखी वाढल्यास भाव आणखी कमी होतील, अशी  शक्यता होलसेल विक्रेत्यांनी व्यक्त केली. मात्र, मागील आठवड्यात बाजरीचे भाव स्थिर होते. 

दुष्काळामुळे ज्वारीची पेरणी कमी झाल्याने ज्वारीचे भाव २६५० ते ३५०० रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत जाऊन पोहोचले. यामुळे व्यापाऱ्यांनी शेजारील कर्नाटक राज्यातून नवीन ज्वारी बाजारात विक्रीला आणली. मागील आठवड्यातही १ हजार क्ंिवटल ज्वारीची आवक झाली. २४०० ते २७०० रुपये प्रतिक्ंिवटलदरम्यान ज्वारीचे भाव स्थिर होते. गव्हाची पेरणी कमी असल्याने मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतून येणाऱ्या गव्हावरच अवलंबून राहावे लागणार आहे. गव्हाचे भावही मागील आठवड्यात स्थिर होते.

मध्यंतरी डाळींच्या भावात मोठी वाढ झाली. मात्र, उठाव घटल्याने डाळींच्या भाववाढीला लगाम लागला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात डाळींचे भाव स्थिर होते. हरभरा डाळ ५९०० ते ६१०० रुपये प्रतिक्ंिवटल, तूर डाळ ६००० ते ६३०० रुपये, उडीद डाळ ४००० ते ५२०० रुपये, मूग डाळ ६८०० ते ७३०० रुपये तर मसूर डाळ ४९०० ते ५२०० रुपये प्रतिक्ंिवटलवर स्थिर होते. औरंगाबाद जाधववाडी येथील अडत बाजारात येणाऱ्या मक्याची आवक संपुष्टात आली आहे.

दुष्काळामुळे पेराच कमी असल्याने ज्वारी, गव्हाच्या पिकावर याचा परिणाम होणार असून फेब्रुवारी महिन्यात ज्वारी, गव्हाची आवक किती होईल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिक आवकवर अवलंबून असलेल्या अडत  बाजारातील व्यवहार बंद पडायच्या मार्गावर आहे.  यापुढील सर्व मदार परपेठेतील आवकवर अवलंबून राहणार असल्याचे येथील व्यापाऱ्यांली सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी