शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

औरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या चौपदरीकरणाला बसणार खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:46 IST

जगप्रसिद्ध लेण्यांकडे जाणाºया औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली खरी; मात्र सदरील रस्त्याचे एका बाजूचे साडेसात मीटर रुंदीचे काम पूर्ण करून घेतल्यानंतर पुढे दुसºया टप्प्यातील कामाचे जे होईल ते होईल, अथवा ते काम रेंगाळेल, त्याबाबत नंतर बघू, अशी मानसिकता या रस्त्यासाठी काम करणाºया अधिकारी आणि यंत्रणेची झाली आहे.

ठळक मुद्देपुढे काय होईल ते होईल : पैशांअभावी एका बाजूने रस्ता करून घेणार, अधिकाऱ्यांची मानसिकता

औरंगाबाद : जगप्रसिद्ध लेण्यांकडे जाणाºया औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली खरी; मात्र सदरील रस्त्याचे एका बाजूचे साडेसात मीटर रुंदीचे काम पूर्ण करून घेतल्यानंतर पुढे दुसºया टप्प्यातील कामाचे जे होईल ते होईल, अथवा ते काम रेंगाळेल, त्याबाबत नंतर बघू, अशी मानसिकता या रस्त्यासाठी काम करणाºया अधिकारी आणि यंत्रणेची झाली आहे. दीड वर्षापासून पर्यटक, शासकीय कर्मचारी, सामान्य नागरिक त्या रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड यातना सहन करीत आहेत. रस्त्याच्या कामाला पैसा आणि गती देण्यासाठी अजून कुठलीही मुदत बांधकाम विभागाच्या राज्य महामार्ग बांधणी विभागाने निश्चित केलेली नाही. परिणामी जुनाच रस्ता बरा होता, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.कंत्राटदाराने कमी दराने काम घेतल्यामुळे त्याला या कामातून काही मिळणार नाही. अतिशय अवघड परिस्थितीतून तो काम करीत आहे. त्याने समभाग विक्रीला काढले आहेत. त्यामुळे पुढील काम होईल की नाही याची शाश्वती नाही. जेवढे सध्या झाले आहे, त्यातील अडीच कि़मी. काम झाले की, एक बाजू पूर्ण होईल. उर्वरित कामाचे पुढे जे काय व्हायचे ते होईल. कारण बांधकाम विभागाच्या राज्य महामार्ग बांधणी विभागाकडून हे काम केले जात आहे. त्याची सर्व सूत्रे मुंबईतून हलतात. स्थानिक कार्यालयाकडे काहीही अधिकार नसल्यामुळे येथील अधिकारी कागदी घोडे नाचवून मोकळे होत असल्याचे एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.कंत्राटदाराला काम करणे जडअजिंठा ते सिल्लोडच्या कामाला मंजुरी मिळणे बाकी आहे. सध्या कंत्राटदार चहाला महाग झाला आहे. तिन्ही बीडस् बाजारात विकायला काढले आहेत. नॅशनल हायवेचे काम करताना पूर्ण अटी व शर्थी पाळाव्याच लागतात. मुळात ऋत्विक एजन्सी ही कंत्राटदार कंपनी एव्हिएशनची कामे करणारी कंपनी आहे. त्यांना रस्त्याच्या कामांचा अनुभव आहे की नाही, याबाबत साशंकता आहे. घेताना कमी दराने काम घेतले; परंतु आता ऋत्विक एजन्सीला काम करणे जड चालले आहे, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. एका बाजूने साडेसात मीटर रस्ता आणि मुरमाचा भराव टाकून काम पूर्ण करून घेण्यात येईल. आळंदपर्यंत रस्ता होत आला आहे. ऋत्विक एजन्सीबरोबर नव्याने करार होणे बाकी आहे. त्या कंपनीचा कुठलाही जबाबदार कर्मचारी औरंगाबादच्या कार्यालयात येत नाही. त्यामुळे कराराची संचिका रेंगाळली आहे. सुधारित अंदाजपत्रकानुसार नव्याने करार झाल्यानंतर त्या कामाची मुदत ठरेल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad transportरस्ते वाहतूक