शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

औरंगाबादच्या विमानसेवेची ‘उंच भरारी’; प्रवाशांची संख्या २ महिन्यांत झाली दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 12:54 IST

हैदराबादपाठोपाठ आता १६ डिसेंबरपासून बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराची दक्षिण भारताबरोबरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. 

ठळक मुद्देप्रत्येक महिन्यात प्रवाशांची संख्या  उत्तरोतर वाढतच गेली.

औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या ९ महिन्यांनंतर विमानसेवेला प्रवासी संख्येचे बूस्टर मिळाले आहे. औरंगाबादच्याविमान प्रवाशांच्या संख्येत अवघ्या २ महिन्यांत दुपटीने वाढ झाली आहे. शहरात महिनाभरातील विमानाच्या प्रवासी संख्येने ९ हजारांवरून २० हजारांवर झेप घेतली आहे.

कोरोना संसर्गाच्या संकटामुळे तब्बल ३ महिने देशातील विमानसेवा बंद होती. औरंगाबादहून सर्वप्रथम १९ जूनपासून इंडिगोने दिल्ली - औरंगाबाद - दिल्ली ही विमानसेवा सुरू केली. त्यानंतर एअर इंडियाचेही उड्डाण सुरू झाले. सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून औरंगाबाद दिल्ली, मुंबई आणि हैदराबादला हवाई सेवेने जोडले गेले आहे. हैदराबादपाठोपाठ आता १६ डिसेंबरपासून बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराची दक्षिण भारताबरोबरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.  कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या ३ महिन्यांनंतर विमानसेवा सुरू केल्यानंतर प्रारंभी जूनच्या १२ दिवसांत अवघ्या ४८९ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे कंपन्यांनी विमानाच्या फेऱ्याही घटविल्या होत्या; परंतु जुलै महिना सुरुवात होताच विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली.

प्रत्येक महिन्यात प्रवाशांची संख्या  उत्तरोतर वाढतच गेली.  सप्टेंबर महिन्यात  विक्रमी ९ हजार ३६३  प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. अवघ्या २ महिन्यांत नोव्हेंबरमध्ये प्रवासी संख्येत दुप्पट वाढ झाली. या महिन्यात २० हजार ४३८ प्रवाशांनी औरंगाबादहून विमान प्रवास केला.त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, की, औरंगाबाद आंतरराष्ट्रीय   विमानतळावरील प्रवासी संख्येत वाढ होत आहे. ही समाधानकारक बाब आहे.

विमानसेवा वाढीसाठी प्रयत्नविमानतळ प्राधिकरण आणि इतर सदस्य औरंगाबादहून अन्य शहरांसाठी विमानसेवा सुरू होईल, यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रवाशांचा सुरक्षित विमान प्रवासावर विश्वास वाढत आहे. - डी. जी. साळवे, संचालक, विमानतळ

विमान प्रवाशांची संख्या४८९ जून ३,४९९ जुलै ६,१७६ ऑगस्ट ९,३६३ सप्टेंबर१५,०५९ ऑक्टोबर२०,४३८ नोव्हेंबर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादairplaneविमानAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन