शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

औरंगाबाद @४३ अंश; तापमानाचा ४० वर्षांनंतर जूनमध्ये विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 20:21 IST

१९७९ मधील तापमानाची बरोबरी

ठळक मुद्देआगामी आठवडाभर तापमान ४० ते ४२ अंशांदरम्यान उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट

औरंगाबाद :  शहराच्या तापमानात अवघ्या एका दिवसात २.३ अंशांनी वाढ होऊन रविवारी कमाल तापमानाने ४३ अंश सेल्सिअस असा जून महिन्यातील उच्चांक गाठला. शहरात १० जून १९७९ इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ४० वर्षांनंतर याच विक्रमी तापमानाची पुन्हा एकदा बरोबरी झाली. काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या सूर्यामुळे औरंगाबाद शहर ‘सूर्यबाद’ बनत असल्याची चर्चा नागरिकांत सुरूआहे.

चिकलठाणा वेधशाळेत रविवारी (दि. २) कमाल तापमान ४३.० आणि किमान तापमान २५.० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. शहरात शनिवारी ४०.७ अंश तापमान नोंदविले गेले होते. एकाच दिवसात तापमानात मोठी वाढ झाली. एप्रिल महिन्यानंतर तापमानाने कमाल ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता. संपूर्ण मे महिन्यात तापमान ४० ते ४२ अंशांदरम्यान नोंदविले गेले. १ जून रोजी तापमान चाळिशीवर आले. त्यामुळे नागरिकांना आता उकाड्यापासून दिलासा मिळेल,अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र, अद्यापही सूर्य तळपतच आहे. रविवार खऱ्या अर्थाने ‘सनडे’ ठरला. उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे. 

उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पाहायला मिळाला. सायंकाळनंतरही प्रचंड उकाडा होता. जून महिन्यातील विक्रमी तापमानाने औरंगाबादकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हापासून, उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी दुपारी आणि सायंकाळी थंडपेय पिण्यासाठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळाले.

तापमान चाळिशी पुढेचआगामी आठवडाभर तापमान ४० ते ४२ अंशांदरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करताना नागरिकांना आणखी काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबादHeat Strokeउष्माघात