शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

औरंगाबाद मनपाच्या भ्रष्टाचाराला आॅडिटचे सुरक्षा कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:25 IST

महापालिका आणि अनियमितता हे समीकरण मागील तीन दशकांपासून रूढ झाले आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला ब्रेक लागावा या उदात्त हेतूने शासन दरवर्षी नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाचे एक पथक पाठवून लेखापरीक्षण करीत असते. औरंगाबाद महापालिकेत मागील काही वर्षांपासून ए.जी. नागपूर कार्यालयाचे तीन ठराविक अधिकारी-कर्मचारी लेखापरीक्षणास येत आहेत.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिका आणि अनियमितता हे समीकरण मागील तीन दशकांपासून रूढ झाले आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला ब्रेक लागावा या उदात्त हेतूने शासन दरवर्षी नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाचे एक पथक पाठवून लेखापरीक्षण करीत असते. औरंगाबाद महापालिकेत मागील काही वर्षांपासून ए.जी. नागपूर कार्यालयाचे तीन ठराविक अधिकारी-कर्मचारी लेखापरीक्षणास येत आहेत. या पथकाने आजपर्यंत एकही महाघोटाळा उघडकीस आणलेला नाही. लेखापरीक्षणाची निव्वळ औपचारिकता हे पथक पूर्ण करीत आहे. दरवर्षी ठराविक अधिकारीच का पाठविण्यात येतात? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.नागपूर महालेखाकार कार्यालयाचे पथक अलीकडेच महापालिकेत दाखल झाले आहे. एखाद्या व्हीआयपी शिष्टमंडळाचे राजशिष्टाचाराने स्वागत होते त्या पद्धतीने या पथकाला सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. पथकातील प्रत्येक सदस्याची ‘सोय’ महापालिकेने यथोचित केली आहे. दररोज वेगवेगळ्या विभागाचे लेखापरीक्षण हे पथक करीत आहे. या पथकात वरिष्ठ लेखापरीक्षक आर.के. जांभूळकर, आर.एल. श्रीवास्तव, सहायक लेखापरीक्षक (पान २ वर)दरवर्षी असंख्य घोटाळे तरी...नागपूर महालेखाकार कार्यालयाने राज्यातील इतर महापालिकांमधील अनियमितता, भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. या विभागाचे पथक आले म्हटले तर अधिकारी व कर्मचारी थरकाप करतात. औरंगाबाद महापालिकेत असे अजिबात घडत नाही. आजपर्यंत एकही मोठा घोटाळा या पथकाच्या हाती लागलेला नाही.४वास्तविक पाहता दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे महापालिकेत होतात. मागील वर्षीच तत्कालीन आयुक्तांनी चार मोठे घोटाळे उघडकीस आणून दोषींवर कारवाईचा बडगाही उगारला होता. नागपूर महालेखाकार कार्यालयाला हे घोटाळे दिसत नाहीत का? हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.शासनाने गांभीर्य दाखवावेमहापालिकेच्या लेखापरीक्षणासाठी शासनानेच खास पथक पाठवायला हवे. दरवर्षी महापालिकेत तेच पथक, तेच कर्मचारी येणार असतील तर खरोखर लेखापरीक्षण अजिबात होणार नाही. पथक आणि मनपा अधिकाºयांचा संवाद हळूहळू दृढ होऊ लागतो. नको ती युती होते. यावर अंकुश ठेवण्याचे काम शासनाचे आहे.-समीर राजूरकर, माजी नगरसेवक