शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

शहराच्या पाणीपुरवठ्याचे लवकरच ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:05 AM

औरंगाबाद : शहरात विविध वसाहतीमध्ये पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. तीन दशके महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षांनी पाणी प्रश्नावर ओरड ...

औरंगाबाद : शहरात विविध वसाहतीमध्ये पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. तीन दशके महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षांनी पाणी प्रश्नावर ओरड सुरू केली. त्यामुळे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पाणीपुरवठ्याचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

शहरासाठी राज्य शासनाने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी किमान ३ वर्ष लागणार आहेत. दरम्यानच्या काळात सध्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शहरात आणल्या जाणाऱ्या पाण्यात वाढ करण्याच्या दृष्टीने पांडेय यांनी महापालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. सध्या पाण्याची मागणी वाढली आहे, परंतु वाढत्या मागणीनुसार पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यातच विविध राजकीय पक्ष महापालिका प्रशासनाकडे अतिरिक्त पाण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे जायकवाडीहून औरंगाबाद शहरात नेमके पाणी किती येते, शहरात कोणत्या भागात पाणी कमी पडते, पाण्याची गळती होते का, पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने काय करता येईल या संदर्भात ऑडिट करण्याचे आदेश पांडेय यांनी दिल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंह देखील उपस्थित होते. पाण्याच्या ऑडिटचे काम प्राधिकरणाने करावे असे पांडेय यांनी सांगितले. त्याला अजयसिंह यांनी सहमती दर्शवली. पाणी पुरवठ्याच्या सध्याच्या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या कशा दूर केल्या जाऊ शकतील याबद्दल देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सूचना करावी असे पांडेय यांनी बैठकीच्या दरम्यान स्पष्ट केल्याचे पानझडे म्हणाले.

फ्लो मीटर तपासणे अत्यंत गरजेचे

अधीक्षक अभियंता अजयसिंह म्हणाले, पाणी पुरवठा योजनेवरील फ्लो मीटर बंद असल्याची माहिती मिळाली आहे. फ्लो मीटर सुरु आहेत का ते प्रथम तपासावे लागेल. हे मीटर बंद असतील तर ऑडिट करताना अडथळे येऊ शकतील, वॉटर ऑडिटसाठी फ्लो मीटर कार्यान्वित असणे गरजेचे आहे.