शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

शहरातील पुलांचे आॅडिट

By admin | Updated: August 10, 2016 00:28 IST

औरंगाबाद : महाड येथील घटनेनंतर शहरातील जीर्ण पुलांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मकाई गेट, पाणचक्की, बारापुल्ला गेट

औरंगाबाद : महाड येथील घटनेनंतर शहरातील जीर्ण पुलांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मकाई गेट, पाणचक्की, बारापुल्ला गेट येथील पुलांसह शहरातील सर्वच लहान-मोठ्या पुलांचे आॅडिट करण्यात येणार आहे. औरंगाबादेतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आॅडिटची व्यवस्था नसल्यास पुण्याच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगची (सीओईपी) मदत घेण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त पुढे म्हणाले की, शहरात तीन मोठे पूल आहेत. त्यांची सध्याची क्षमता काय आहे, हे तपासण्यात येईल. जड वाहनांसाठी हे पूल धोकादायक तर नाहीत, या दृष्टीने आपण नंतर निर्णय घेणारच आहोत. मागील दोन महिन्यांपासून महापौरांच्या आढावा बैठकीत खड्ड्यांचा विषय चर्चेला येतो. महापौर तुपे यांनी सांगितले की, प्रत्येक बैठकीत आम्ही प्रशासनाला हे विचारणे योग्य नाही. अखेर खड्डे बुजवायचे आहेत किंवा नाहीत हे सांगा. कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी मेटल आणि मुरूम टाकण्याचे अंदाजपत्र तयार करण्यात आल्याचे नमूद केले. तीन ते चार दिवसांत कामही सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. क्रांतीचौक उड्डाणपुलावर खूप खड्डे झाल्याचा मुद्दा नगरसेवक राजू वैद्य यांनी उपस्थित केला. मनपा अधिकाऱ्यांनी उड्डाणपूल आपल्याकडे हस्तांतरित झालाच नाही, म्हणून हात वर केले. रस्ते विकास महामंडळाने कंत्राटदाराकडून करून घ्यायला हवेत. यासंदर्भात महामंडळाला पत्र देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. पुंडलिकनगर येथील रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे, लवकरच काम सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.बैठकीला उपमहापौर प्रमोद राठोड, विरोधी पक्षनेते अयूब जागीरदार,राजू वैद्य, बापू घडामोडे, भाऊसाहेब जगताप, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त रवींद्र निकम, अयूब खान, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्धीकी, दीपाराणी देवतराज, संजय पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.