शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

जि.प.आरक्षण सोडतीकडे लक्ष

By admin | Updated: October 1, 2016 01:10 IST

जालना : मिनी मंत्रालय म्हणून समजली जाणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

जालना : मिनी मंत्रालय म्हणून समजली जाणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. गट वा गण राखीव झाल्यास आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची चिंता अनेकांना भेडसावत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात याची मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येत आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रवारी किंंवा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यामुळे ग्रामीण भागात राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. आरक्षणात कुणाचे गड राहणार कुणाचे जाणार याबाबतचे तर्कवितर्क लावले जात आहेत. ५ आॅक्टोबरला जि.प.ची जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितींची त्या त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे आपल्या सर्कलमधील व गणातील आरक्षण काय असणार, याकडे इच्छुकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे एक प्रकारे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून याकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे या निवडणुकीवर बारकाई लक्ष असते. या निवडणुकीच्या यश अपयशावरून पुढील राजकीय गणिते अवलंबून असतात. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला वेगळेच महत्व आहे. सध्या केंद्र आणि राज्यात सत्तांतर करून मतदारांनी प्रस्थापितांना धक्का दिला आहे. त्यामुळे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा निवडणुकीचे महत्त्व अधोरेखित होते. आतापासून अनेकांनी आपल्या सर्कलमध्ये मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. कोणता उमेदवार सक्षम आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराची त्या त्या राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरू झाली आहे.आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५६ गट आणि १०२ गण निश्चीत झाले आहेत. घनसावंगी, मंठा, जाफराबाद आणि बदनापूर हे तालुके नगरपंचायत झाल्याने गावे कमी झाली आहेत. २०१२ सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत जिल्हा परिषदेत एक गट वाढला आहे. तर पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. जि.प. मध्ये सध्या सत्ताधारी सेना-भाजपाची या निवडणुकीत युती होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीबाबत संभ्रम आहे. जि. प.वर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अनेक राजकीय धुरीनांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात आठ गट अनुसूचित जातीसाठी तर एक गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने उमेदवारांचा निवडून येताना कस लागणार आहे. (प्रतिनिधी)