शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

कमी टक्क्यांच्या केंद्रांवर लक्ष

By admin | Updated: September 14, 2014 00:22 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनजागृती विभागाने कंबर कसली आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनजागृती विभागाने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या जिल्ह्यातील १२७ मतदान केंद्रांवर या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या केंद्रांवर जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी संबंधित ठिकाणी ग्रामसभा आणि वॉर्ड बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मतदारांत जागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर स्वीप सेलची स्थापना करण्यात आली आहे. औरंगाबादेत स्वीप सेलची धुरा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्याचा या सेलचा प्रयत्न आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय अशा मतदान केंद्रांची यादी तयार करून तेथे ग्रामीण भागात ग्रामसभा आणि शहरात वॉर्ड बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांमध्ये सर्वाधिक ३३ मतदान केंद्रे ही वैजापूर विधानसभा मतदारसंघात आहेत, तर सर्वात कमी मतदान झालेले १ मतदान केंद्र हे सिल्लोड मतदारसंघात आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये २६३० मतदान केंद्रे होती. त्यापैकी १२७ मतदान केंद्रांवर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेले आहे. या सर्व मतदान केंद्रांवर यावेळी निश्चितपणे शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न असल्याचे वासुदेव सोळंके यांनी सांगितले.