शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कमी टक्क्यांच्या केंद्रांवर लक्ष

By admin | Updated: September 14, 2014 00:22 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनजागृती विभागाने कंबर कसली आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनजागृती विभागाने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या जिल्ह्यातील १२७ मतदान केंद्रांवर या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या केंद्रांवर जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी संबंधित ठिकाणी ग्रामसभा आणि वॉर्ड बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मतदारांत जागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर स्वीप सेलची स्थापना करण्यात आली आहे. औरंगाबादेत स्वीप सेलची धुरा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्याचा या सेलचा प्रयत्न आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय अशा मतदान केंद्रांची यादी तयार करून तेथे ग्रामीण भागात ग्रामसभा आणि शहरात वॉर्ड बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांमध्ये सर्वाधिक ३३ मतदान केंद्रे ही वैजापूर विधानसभा मतदारसंघात आहेत, तर सर्वात कमी मतदान झालेले १ मतदान केंद्र हे सिल्लोड मतदारसंघात आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये २६३० मतदान केंद्रे होती. त्यापैकी १२७ मतदान केंद्रांवर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेले आहे. या सर्व मतदान केंद्रांवर यावेळी निश्चितपणे शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न असल्याचे वासुदेव सोळंके यांनी सांगितले.